शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
5
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
6
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
7
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
8
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
9
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
10
दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार
11
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
12
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
13
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
14
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
15
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
16
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
17
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
18
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
19
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
20
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?

पाणीपट्टी निवासी दराने आकारा!

By admin | Updated: April 7, 2017 03:14 IST

मीरा-भाईंदरमध्ये अनेक खाजगी रूग्णालय व दवाखाने सुरू आहेत

भार्इंदर : मीरा-भाईंदरमध्ये अनेक खाजगी रूग्णालय व दवाखाने सुरू आहेत. पालिकेने त्यांना बंधनकारक केलेल्या अग्निशमनरोधक यंत्राच्या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे कायद्यानुसार आवश्यक नाही. तसेच पालिका आकारत असलेली पाणीपट्टी व्यावसायिक दराऐवजी निवासी दराने वसूल करावा अशा मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मीरा-भार्इंदर शाखेने महापौर गीता जैन व आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्याकडे केली आहेत. पालिकेने शहरातील प्रत्येक खाजगी आस्थापनांना त्यातील अग्निशमनरोधक यंत्रणेसाठी ना हरकत दाखला दिला जातो. या दाखल्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे पालिकेने बंधनकारक केले आहे. मात्र यात शहरातील खाजगी रूग्णालये, नर्सिंग होम व दवाखान्यांना दिलेल्या ना हरकत दाखल्याचे नूतनीकरण उच्च न्यायालयासह राज्य सरकारच्या आदेशानुसार बंधनकारक नसतानाही पालिकेने त्या दाखल्याचे नूतनीकरण करणे आवश्यक असल्याचा दावा येथील डॉक्टरांनी केला आहे. दरवर्षीचे नूतनीकरण रद्द करुन सुरूवातीला दिलेली परवानगीच ग्राह्य धरावी, अशी मागणी डॉक्टरांनी ंकेली आहे. तसेच रुग्णालयांसह नर्सिंग होम व दवाखान्यांना पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा व्यावसायिक कारणास्तव वापरण्यात येत नसून तो रूग्णांसाठीच वापरला जातो. व्यावसायिक दराने वसूल होणारी पाणीपट्टी निवासी दराने वसूल करावी. त्याचप्रमाणे रूग्णालयांना मालमत्ता करातही सूट देण्याची मागणी केली. अलिकडेच काही ठिकाणी उद्भवलेल्या वादामुळे रहिवासी राहत असलेल्या इमारतींमधील नर्सिंग होममध्ये रूग्णांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था करावी, असा फतवा रालिकेने काढला. परंतु, सुरुवातीपासून इमारतीतील नर्सिंग होममध्ये ये-जा करण्यासाठी असलेला मार्ग एकच आहे. सूडाच्या भावनेने स्वतंत्र मार्गाची मागणी काही असंतुष्ट समाजघटकांकडून केली जात आहे. यामुळे स्वतंत्र मार्गासाठी पालिकेला प्रस्तावित मार्गाचा नकाशा पुर्नमान्यतेसाठी सादर करावा लागणार आहे. त्यात वेळेचा व पैशाचा मोठा अपव्यय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मार्गाला जैसे थे ठेवावे, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)पाण्याचा वापर होतो रूग्णांसाठीयाबाबत शाखेचे अध्यक्ष डॉ. राजीव अग्रवाल म्हणाले, रूग्णालयाला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे व्यावसायिकीकरण केले जात नाही. त्याचा केवळ रूग्णांसाठी वापर केला जातो. तर खाजगी शाळांचा वापर व्यावसायिकीकरणासाठी होत असतानाही त्यांना निवासी दराने तर रूग्णालयांना व्यावसायिक दराने पाणीपट्टी व मालमत्ता कर आकारण्यात येतो. याप्रकरणी राज्य सरकारसह उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही पालिकेकडून रूग्णालयांची पिळवणूक होत आहे. ती थांबविण्यात यावी, अशी मागणी केली आहे.