शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

राखीव साठ्यातून पाणी उचलणे लवकरच थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:55 IST

धरण क्षेत्रांत पावसाची दमदार हजेरी; पाणीपातळी १३ टक्क्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांत चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत धरणांतील पाण्याची पातळी १३ टक्के झाली आहे. परिणामी येत्या काही दिवसांत राखीव साठ्यातून पाणी उचलणे बंद होणे अपेक्षित आहे. याबाबत महापालिका प्रशासन लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने प्रशासनाने अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठा उचलण्यास १० जूनपासून सुरुवात केली होती. 

यंदा मे महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी साधारणपणे ७ जूननंतर पावसाला सुरुवात होते. मे महिन्यात फक्त मुंबईच नव्हे, तर धरण क्षेत्रांतही पाऊस झाला. आताही जूनमध्ये पावसाचा जोर चांगला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. एरवी जुलैमध्ये भरणारा पवई तलावही यंदा जूनमध्ये वाहू लागला आहे. धरणांतील पाण्याची पातळी वाढत असून, त्यात आणखी काही टक्के वाढ झाली तर राखीव साठ्यातून पाणी उचलणे बंद केले जाईल, असे सांगण्यात आले.

...तर धरणेही आधीच भरण्याची शक्यता धरणांतील पाणीसाठा १० टक्क्यांच्या खाली गेल्यास राखीव साठ्यातून पाणी उचलले जाते. मात्र, पावसाला आता सुरुवात झाली आहे. अजून पावसाचे चार महिने शिल्लक आहेत. पाऊस दमदार झाला तर यंदा सर्व धरणे अपेक्षेपेक्षा आधीच भरण्याची शक्यता आहे. एक-दोन दिवसांमध्ये धरण क्षेत्रांत किती पाऊस होत आहे, पाण्याच्या पातळीत किती वाढ होत आहे, याचा अंदाज घेऊन राखीव साठ्यातून पाणी उचलणे बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासन घेऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. 

एक लाख ९० हजार दशलक्ष लिटर साठा पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांत मिळून पाणीसाठा जवळपास १३ टक्के एवढा झाला आहे. मागील वर्षी हे प्रमाण फक्त पाच टक्के होते. या सर्व धरणांमध्ये मिळून एक लाख ९०  हजार ७४१ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. मागील वर्षी हे प्रमाण ७७ हजार ४४० दशलक्ष लिटर एवढे होते. 

टॅग्स :Mumbaiमुंबई