शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

राखीव साठ्यातून पाणी उचलणे लवकरच थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:55 IST

धरण क्षेत्रांत पावसाची दमदार हजेरी; पाणीपातळी १३ टक्क्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांत चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत धरणांतील पाण्याची पातळी १३ टक्के झाली आहे. परिणामी येत्या काही दिवसांत राखीव साठ्यातून पाणी उचलणे बंद होणे अपेक्षित आहे. याबाबत महापालिका प्रशासन लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने प्रशासनाने अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठा उचलण्यास १० जूनपासून सुरुवात केली होती. 

यंदा मे महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी साधारणपणे ७ जूननंतर पावसाला सुरुवात होते. मे महिन्यात फक्त मुंबईच नव्हे, तर धरण क्षेत्रांतही पाऊस झाला. आताही जूनमध्ये पावसाचा जोर चांगला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. एरवी जुलैमध्ये भरणारा पवई तलावही यंदा जूनमध्ये वाहू लागला आहे. धरणांतील पाण्याची पातळी वाढत असून, त्यात आणखी काही टक्के वाढ झाली तर राखीव साठ्यातून पाणी उचलणे बंद केले जाईल, असे सांगण्यात आले.

...तर धरणेही आधीच भरण्याची शक्यता धरणांतील पाणीसाठा १० टक्क्यांच्या खाली गेल्यास राखीव साठ्यातून पाणी उचलले जाते. मात्र, पावसाला आता सुरुवात झाली आहे. अजून पावसाचे चार महिने शिल्लक आहेत. पाऊस दमदार झाला तर यंदा सर्व धरणे अपेक्षेपेक्षा आधीच भरण्याची शक्यता आहे. एक-दोन दिवसांमध्ये धरण क्षेत्रांत किती पाऊस होत आहे, पाण्याच्या पातळीत किती वाढ होत आहे, याचा अंदाज घेऊन राखीव साठ्यातून पाणी उचलणे बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासन घेऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. 

एक लाख ९० हजार दशलक्ष लिटर साठा पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांत मिळून पाणीसाठा जवळपास १३ टक्के एवढा झाला आहे. मागील वर्षी हे प्रमाण फक्त पाच टक्के होते. या सर्व धरणांमध्ये मिळून एक लाख ९०  हजार ७४१ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. मागील वर्षी हे प्रमाण ७७ हजार ४४० दशलक्ष लिटर एवढे होते. 

टॅग्स :Mumbaiमुंबई