शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

राखीव साठ्यातून पाणी उचलणे लवकरच थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:55 IST

धरण क्षेत्रांत पावसाची दमदार हजेरी; पाणीपातळी १३ टक्क्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांत चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत धरणांतील पाण्याची पातळी १३ टक्के झाली आहे. परिणामी येत्या काही दिवसांत राखीव साठ्यातून पाणी उचलणे बंद होणे अपेक्षित आहे. याबाबत महापालिका प्रशासन लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने प्रशासनाने अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठा उचलण्यास १० जूनपासून सुरुवात केली होती. 

यंदा मे महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी साधारणपणे ७ जूननंतर पावसाला सुरुवात होते. मे महिन्यात फक्त मुंबईच नव्हे, तर धरण क्षेत्रांतही पाऊस झाला. आताही जूनमध्ये पावसाचा जोर चांगला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. एरवी जुलैमध्ये भरणारा पवई तलावही यंदा जूनमध्ये वाहू लागला आहे. धरणांतील पाण्याची पातळी वाढत असून, त्यात आणखी काही टक्के वाढ झाली तर राखीव साठ्यातून पाणी उचलणे बंद केले जाईल, असे सांगण्यात आले.

...तर धरणेही आधीच भरण्याची शक्यता धरणांतील पाणीसाठा १० टक्क्यांच्या खाली गेल्यास राखीव साठ्यातून पाणी उचलले जाते. मात्र, पावसाला आता सुरुवात झाली आहे. अजून पावसाचे चार महिने शिल्लक आहेत. पाऊस दमदार झाला तर यंदा सर्व धरणे अपेक्षेपेक्षा आधीच भरण्याची शक्यता आहे. एक-दोन दिवसांमध्ये धरण क्षेत्रांत किती पाऊस होत आहे, पाण्याच्या पातळीत किती वाढ होत आहे, याचा अंदाज घेऊन राखीव साठ्यातून पाणी उचलणे बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासन घेऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. 

एक लाख ९० हजार दशलक्ष लिटर साठा पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांत मिळून पाणीसाठा जवळपास १३ टक्के एवढा झाला आहे. मागील वर्षी हे प्रमाण फक्त पाच टक्के होते. या सर्व धरणांमध्ये मिळून एक लाख ९०  हजार ७४१ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. मागील वर्षी हे प्रमाण ७७ हजार ४४० दशलक्ष लिटर एवढे होते. 

टॅग्स :Mumbaiमुंबई