शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

१९ वर्षांत प्रथमच आले नळाला पाणी

By admin | Updated: June 12, 2015 00:45 IST

भंडारमाची ग्रामस्थांमध्ये आनंदोत्सव : जलसंधारणांमुळे गावाची टॅँकरमुक्तीकडे वाटचाल -- गूज न्यूज

सातारा : कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियानांतर्गत गावात सिमेंट नालाबांध मार्च २०१५ मध्ये पूर्ण करण्यात आला. परिणामी मेमध्ये झालेल्या वळवाच्या पावसामुळे सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचा जलस्तर वाढून १९ वर्षांत मे महिन्यात प्रथमच नळातून पाणी वाहू लागले. गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे भंडारमाचीची वाटचाल आता टँकरमुक्तीकडे सुरू आहे. सुमारे एक हजार लोकसंख्या असणाऱ्या भंडारमाचीची ओळख दुष्काळग्रस्त म्हणून आहे. पाणी टंचाईच्या काळात जिल्ह्यात सर्वप्रथम भंडारमाचीला टँकरने पाणीपुरवठा केला जायचा. या गावामध्ये कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियानांतर्गत सन २०१४-१५ मध्ये तीन सिमेंट नालाबांध, २४ शेततळे, २२ इलेट्रिक मोटरपंप संच, शेतकरी अभ्यास दौरा, एक शेतीशाळा, शंभर एकरवर पीक प्रात्यक्षिके, शेतकरी गट प्रमुखांचे प्रशिक्षण आदी कामे करण्यात आली. लोकसहभागातून गाव तलावातील १५३ घनमीटर गाळ काढल्यामुळे उन्हाळी पावसात हा गाव तलाव पूर्ण क्षमतेने भरला. गावामध्ये २४ शेततळी पूर्ण करण्यात आली. या शेततळ्यास अस्तरीकरण करून पावसाळ्यामध्ये पाणी साठवण्यात येणार आहे. याचा उपयोग पिकाला संरक्षित पाणी देण्यासाठी होणार आहे. यंदा मे महिन्यात प्रथमच विहिरींचा जलस्तर वाढल्याने भंडारमाची गावात १९ वर्षांनंतर नळाला पाणीपुरवठा झाल्याचे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भंडारमाचीमध्ये झालेल्या जलसंधाणाच्या कामाबाबत शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीपाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे. (प्रतिनिधी)पाणीच-पाणी चोहीकडेनालाबांधमुळे गावामधील नळपाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना सध्या भरपूर पाणी मिळत आहे. गावामध्ये ३५० हेक्टर कंपार्टमेंट बंडिंगचे काम झाले आहे. या कामामुळे भूजल पातळी वाढविण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. गावातील विहिरींची पाणीपातळी चार ते पाच फुटांनी वाढली आहे. ग्रामस्थांचे श्रमदान, कृषी विभागाच्या योजना यांच्या संगमातून जलसंधारणाचा खराखुरा परिणाम गावात पाहायला मिळत आहे. - जितेंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दरवर्षी गावामध्ये दुष्काळ असायचा. गावामध्ये टँकर यायचा आणि पाणी भरण्यासाठी गर्दी व्हायची; पण यंदाच्या मे महिन्यात प्रथमच नळाला पाणी मिळाले आणि तेही भरपूर. आमचं गाव आता दुष्काळ मुक्तीकडे वाटचाल करत आहे, याचा आनंद वाटतो. - प्रमिला जगदाळे, महिला ग्रामस्थकृषी विभागामार्फत झालेल्या नालाबांधमुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पातळी १५ ते १६ फुटांनी वाढली आहे. निश्चितपणे भविष्यात भंडारमाची गाव टँकरमुक्त होईल. - अजित जाधव, ग्रामसेवकमाझ्या विहिरीला पाणीच नसायचे. त्यामुळे दहा मिनिटे देखील मोटार चालत नव्हती. मार्चमध्ये झालेल्या नालाबांधमुळे माझ्या विहिरीला पाणी वाढले आहे. त्यामुळे आता शेतीला मुबलक पाणी मिळू शकेल.- रामचंद्र मदने, शेतकरी