शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

१९ वर्षांत प्रथमच आले नळाला पाणी

By admin | Updated: June 12, 2015 00:45 IST

भंडारमाची ग्रामस्थांमध्ये आनंदोत्सव : जलसंधारणांमुळे गावाची टॅँकरमुक्तीकडे वाटचाल -- गूज न्यूज

सातारा : कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियानांतर्गत गावात सिमेंट नालाबांध मार्च २०१५ मध्ये पूर्ण करण्यात आला. परिणामी मेमध्ये झालेल्या वळवाच्या पावसामुळे सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचा जलस्तर वाढून १९ वर्षांत मे महिन्यात प्रथमच नळातून पाणी वाहू लागले. गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे भंडारमाचीची वाटचाल आता टँकरमुक्तीकडे सुरू आहे. सुमारे एक हजार लोकसंख्या असणाऱ्या भंडारमाचीची ओळख दुष्काळग्रस्त म्हणून आहे. पाणी टंचाईच्या काळात जिल्ह्यात सर्वप्रथम भंडारमाचीला टँकरने पाणीपुरवठा केला जायचा. या गावामध्ये कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियानांतर्गत सन २०१४-१५ मध्ये तीन सिमेंट नालाबांध, २४ शेततळे, २२ इलेट्रिक मोटरपंप संच, शेतकरी अभ्यास दौरा, एक शेतीशाळा, शंभर एकरवर पीक प्रात्यक्षिके, शेतकरी गट प्रमुखांचे प्रशिक्षण आदी कामे करण्यात आली. लोकसहभागातून गाव तलावातील १५३ घनमीटर गाळ काढल्यामुळे उन्हाळी पावसात हा गाव तलाव पूर्ण क्षमतेने भरला. गावामध्ये २४ शेततळी पूर्ण करण्यात आली. या शेततळ्यास अस्तरीकरण करून पावसाळ्यामध्ये पाणी साठवण्यात येणार आहे. याचा उपयोग पिकाला संरक्षित पाणी देण्यासाठी होणार आहे. यंदा मे महिन्यात प्रथमच विहिरींचा जलस्तर वाढल्याने भंडारमाची गावात १९ वर्षांनंतर नळाला पाणीपुरवठा झाल्याचे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भंडारमाचीमध्ये झालेल्या जलसंधाणाच्या कामाबाबत शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीपाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे. (प्रतिनिधी)पाणीच-पाणी चोहीकडेनालाबांधमुळे गावामधील नळपाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना सध्या भरपूर पाणी मिळत आहे. गावामध्ये ३५० हेक्टर कंपार्टमेंट बंडिंगचे काम झाले आहे. या कामामुळे भूजल पातळी वाढविण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. गावातील विहिरींची पाणीपातळी चार ते पाच फुटांनी वाढली आहे. ग्रामस्थांचे श्रमदान, कृषी विभागाच्या योजना यांच्या संगमातून जलसंधारणाचा खराखुरा परिणाम गावात पाहायला मिळत आहे. - जितेंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दरवर्षी गावामध्ये दुष्काळ असायचा. गावामध्ये टँकर यायचा आणि पाणी भरण्यासाठी गर्दी व्हायची; पण यंदाच्या मे महिन्यात प्रथमच नळाला पाणी मिळाले आणि तेही भरपूर. आमचं गाव आता दुष्काळ मुक्तीकडे वाटचाल करत आहे, याचा आनंद वाटतो. - प्रमिला जगदाळे, महिला ग्रामस्थकृषी विभागामार्फत झालेल्या नालाबांधमुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पातळी १५ ते १६ फुटांनी वाढली आहे. निश्चितपणे भविष्यात भंडारमाची गाव टँकरमुक्त होईल. - अजित जाधव, ग्रामसेवकमाझ्या विहिरीला पाणीच नसायचे. त्यामुळे दहा मिनिटे देखील मोटार चालत नव्हती. मार्चमध्ये झालेल्या नालाबांधमुळे माझ्या विहिरीला पाणी वाढले आहे. त्यामुळे आता शेतीला मुबलक पाणी मिळू शकेल.- रामचंद्र मदने, शेतकरी