शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

१९ वर्षांत प्रथमच आले नळाला पाणी

By admin | Updated: June 12, 2015 00:45 IST

भंडारमाची ग्रामस्थांमध्ये आनंदोत्सव : जलसंधारणांमुळे गावाची टॅँकरमुक्तीकडे वाटचाल -- गूज न्यूज

सातारा : कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियानांतर्गत गावात सिमेंट नालाबांध मार्च २०१५ मध्ये पूर्ण करण्यात आला. परिणामी मेमध्ये झालेल्या वळवाच्या पावसामुळे सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचा जलस्तर वाढून १९ वर्षांत मे महिन्यात प्रथमच नळातून पाणी वाहू लागले. गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे भंडारमाचीची वाटचाल आता टँकरमुक्तीकडे सुरू आहे. सुमारे एक हजार लोकसंख्या असणाऱ्या भंडारमाचीची ओळख दुष्काळग्रस्त म्हणून आहे. पाणी टंचाईच्या काळात जिल्ह्यात सर्वप्रथम भंडारमाचीला टँकरने पाणीपुरवठा केला जायचा. या गावामध्ये कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियानांतर्गत सन २०१४-१५ मध्ये तीन सिमेंट नालाबांध, २४ शेततळे, २२ इलेट्रिक मोटरपंप संच, शेतकरी अभ्यास दौरा, एक शेतीशाळा, शंभर एकरवर पीक प्रात्यक्षिके, शेतकरी गट प्रमुखांचे प्रशिक्षण आदी कामे करण्यात आली. लोकसहभागातून गाव तलावातील १५३ घनमीटर गाळ काढल्यामुळे उन्हाळी पावसात हा गाव तलाव पूर्ण क्षमतेने भरला. गावामध्ये २४ शेततळी पूर्ण करण्यात आली. या शेततळ्यास अस्तरीकरण करून पावसाळ्यामध्ये पाणी साठवण्यात येणार आहे. याचा उपयोग पिकाला संरक्षित पाणी देण्यासाठी होणार आहे. यंदा मे महिन्यात प्रथमच विहिरींचा जलस्तर वाढल्याने भंडारमाची गावात १९ वर्षांनंतर नळाला पाणीपुरवठा झाल्याचे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भंडारमाचीमध्ये झालेल्या जलसंधाणाच्या कामाबाबत शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीपाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे. (प्रतिनिधी)पाणीच-पाणी चोहीकडेनालाबांधमुळे गावामधील नळपाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना सध्या भरपूर पाणी मिळत आहे. गावामध्ये ३५० हेक्टर कंपार्टमेंट बंडिंगचे काम झाले आहे. या कामामुळे भूजल पातळी वाढविण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. गावातील विहिरींची पाणीपातळी चार ते पाच फुटांनी वाढली आहे. ग्रामस्थांचे श्रमदान, कृषी विभागाच्या योजना यांच्या संगमातून जलसंधारणाचा खराखुरा परिणाम गावात पाहायला मिळत आहे. - जितेंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दरवर्षी गावामध्ये दुष्काळ असायचा. गावामध्ये टँकर यायचा आणि पाणी भरण्यासाठी गर्दी व्हायची; पण यंदाच्या मे महिन्यात प्रथमच नळाला पाणी मिळाले आणि तेही भरपूर. आमचं गाव आता दुष्काळ मुक्तीकडे वाटचाल करत आहे, याचा आनंद वाटतो. - प्रमिला जगदाळे, महिला ग्रामस्थकृषी विभागामार्फत झालेल्या नालाबांधमुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पातळी १५ ते १६ फुटांनी वाढली आहे. निश्चितपणे भविष्यात भंडारमाची गाव टँकरमुक्त होईल. - अजित जाधव, ग्रामसेवकमाझ्या विहिरीला पाणीच नसायचे. त्यामुळे दहा मिनिटे देखील मोटार चालत नव्हती. मार्चमध्ये झालेल्या नालाबांधमुळे माझ्या विहिरीला पाणी वाढले आहे. त्यामुळे आता शेतीला मुबलक पाणी मिळू शकेल.- रामचंद्र मदने, शेतकरी