शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

‘उल्हास’चा पाणीपुरवठा सुरळीत

By admin | Updated: June 29, 2016 02:50 IST

जिल्ह्यात गेले पाच दिवस सुरू असलेल्या पावसामुळे उल्हासनदीत बऱ्यापैकी पाणी साठा निर्माण झाला आहे.

सुरेश लोखंडे,

ठाणे- जिल्ह्यात गेले पाच दिवस सुरू असलेल्या पावसामुळे उल्हासनदीत बऱ्यापैकी पाणी साठा निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी आदी शहरांचा दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.या शहराना पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात अद्याप १८०.०३ पैकी केवळ १६.३१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे, तर उल्हासनदीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्रा धरणात ३३९.१४ पैकी फक्त १९.०६ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. धरणांमधील या अल्प पाणी साठ्यामधून शहरांना सुरळीत पाणीपुरवठा करणेच शक्य नाही. पण या धरणांच्या खाली असलेल्या नदी, नाल्याचे पाणी उल्हासदीसह मोहने बंधारा, जांभूळ आदी बंधाऱ्यांमध्ये बऱ्यापैकी साठलेले असल्यामुळे त्याचा रोजच्या पाणी पुरवठ्यासाठी वापर केला जात आहे.पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणांऐवजी उल्हासनदी खोऱ्यात व माळशेज घाटात बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. या परिसरातील पावसाचे पाणी उल्हासनदीच्या उपनद्या, नाल्यांव्दारे आल्यामुळे उल्हासनदीच्या पात्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. वाहून जाणाऱ्या या पाण्याचा वापर टेमघर व एमआयडीसीकडून दैनंदिन पाणी पुरवठ्यासाठी केला जात आहे. यामुळे सध्या तरी या यंत्रणांकडून ठिकठिकाणच्या शहरांना होणारा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली आहे. आठवड्यातून पाच दिवस पाणीपुरवठा बंद न करता ती कपात टप्प्याटप्प्याने मागे घेतली जात आहे. >मध्य रेल्वे वेळेत : गेले दोन दिवस कोलमडलेले मध्य रेल्वेचे वेळापत्रक मंगळवारी मात्र दिवसभर सुरळीत होते. कर्जतसह कसारा मार्गावरील सीएसटीला जाणाऱ्या सर्व लोकल वेळेनुसार धावत होत्या. सकाळच्या पहिल्या सत्रात १० मिनिटे विलंबाने धावणाऱ्या लोकल दुपारनंतर वेळेवर धावल्या. त्यामुळे लाखो चाकरमान्यांना परतीच्या प्रवासात फारसा त्रास झाला नाही. संध्याकाळच्या तिसऱ्या सत्रात लोकल वेळेत धावल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण होते. >भातसातील २५ एमएलडी पाण्यावरून मीरा-भाईंदर व ठाणे महापालिकेत संघर्षभार्इंदर - मीरा-भार्इंदर शहराला भातसा धरणातील २५ एमएलडी पाणी मिळण्याबाबतचा प्रस्ताव मंगळवारच्या महासभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ठाणे शहराच्या कोट्यातून मागितलेले पाणी देण्यास ठाणे महापालिकेने विरोध केला असल्याने मीरा-भार्इंदर व ठाणे महापालिकेत संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. शहराला स्टेम व एमआयडीसीकडून दररोज मिळणारा पाणीपुरवठा प्रत्येकी ८६ व ५० एमएलडी इतका आहे. यातील एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सध्या १० एमएलडी कपात लागू आहे. ही कपात स्टेमकडून भरून काढली जात आहे. ठाणे महापालिकेच्या कोट्यातून अतिरिक्त १५ एमएलडी पाणीसुद्धा स्टेममार्फतच देण्यात येत आहे. मात्र ही तात्पुरती सोय असून पुरेशा पावसानंतर हा अतिरिक्त पाणीपुरवठा खंडीत होणार आहे.अलीकडेच भातसा धरणातून ठाणे पालिकेला मिळालेल्या ५० एमएलडी पाण्यापैकी ५ एमएलडी पाणी मीरा-भार्इंदरला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी शहराला मुंबई महापालिकेकडून मिळणारे ५ एमएलडी पाणी गेल्या २ वर्षांपासून बंद आहे. ते पुन्हा सुरु करण्यासाठी प्रशासन मुंबई महापालिकेकडे सतत पाठपुरावा करीत आहे. बारवीतून पावसाळ््यात विसर्ग होणारे पाणी मीरा-भार्इंदरला वळते करण्याचा ठराव दोन वर्षापूर्वीच्या महासभेत मंजूर झाला होता.२००९ मध्ये शहराला सूर्या धरणातून ११८ व राज्य शासनाने मंजूर केलेले १०० अशी एकूण २१८ एमएलडी पाणीपुरवठा योजना एमएमआरडीएमार्फत राबविण्यात येत आहे. ती वनविभागाच्या लालफितशाही कारभारात अडकली आहे.शहराला शासनानेच मंजूर केलेल्या अतिरिक्त पाणीपुरवठ्यातून ७५ एमएलडी पाणी देण्यास एमआयडीसीने मान्यता दिल्याने त्याचे काम सध्या सुरु आहे. हे पाणी शहराला मिळण्यास दोन वर्षे लागणार आहे. त्यातच मौजे पिसे बंधाऱ्यातून २५ एमएलडी पाणी मिळावे, असा प्रस्ताव सादर केला.हा ठराव भाजपाचे गटनेते शरद पाटील यांनी मांडला असता त्याला सर्वानुमते मान्यता मिळाली. हा पाणीपुरवठा ठाणे पालिकेच्या कोट्यातून मिळणे अपेक्षित आहे मात्र ते देण्यास ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे पालिकेसह शासनाचेच उंबरठे झिजवावे लागण्याची शक्यता आहे. पावसामुळे पाणी समस्येला काहीअंशी पूर्णविराम मिळाला आहे. ठाण्यासह, मीरा-भार्इंदर, भिवंडीला पाणीपुरवठा करणाऱ्या शहाड-टेमघर यंत्रणेकडून वाहून जाणारे २९६ एमएलडी पाणी दररोज उचलण्यात येत आहे.या आधी त्यांच्याकडून केवळ २६० एमएलडी पाणी उचलण्यात येत होते. एमआयडीसी देखील ही पध्दत वापरत असल्यामुळे त्यांच्याकडून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरसह परिसरातील गावाना आता दररोज पाणीपुरवठा केला जात आहे.