शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

लातूर जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचे टँकर बंद

By admin | Updated: August 2, 2016 23:07 IST

गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमान होत नसल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी २६० गावांत ४६० अधिग्रहणांद्वारे तर ७६ गावांत ७९ टँकरद्वारे

पत्रपरिषद : जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांची माहिती

लातूर : गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमान होत नसल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी २६० गावांत ४६० अधिग्रहणांद्वारे तर ७६ गावांत ७९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. तर मनपाद्वारे ७० टँकर बाहेरून पाणी आणण्यासाठी सुरू होते. परंतु, दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे जिल्हा परिषद व मनपाचे बाहेरील सर्व टँकर बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी पत्रपरिषदेत दिली. गेल्या तीन वर्षांपासून लातूर शहरासह जिल्ह्याला अवर्षणग्रस्त परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, अहमदपूर, शिरूर अनंतपाळ, उदगीर, देवणी, जळकोट या दहा तालुक्यांतील ७६ गावांत ७९ टँकरद्वारे तर २६० गावांत ४६० अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला होता. परंतु, गेल्या दोन दिवसांमध्ये ४६७.७७ मि.मी. पाऊस झाल्याने पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ऐतिहासिक विहिरी व इतर स्थानिक जलस्त्रोतांमध्ये पाणी वाढल्याने जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू असलेले सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिकेअंतर्गत लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेले ७० टँकरही बंद करून लातूर शहराला स्थानिक जलस्त्रोतांतून पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे लातूर शहरातील नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. पर्यायी पाण्याची सोय व्हावी म्हणून साई, नागझरी व भंडारवाडी येथून होणारा पाणीपुरवठा रोटेशन पद्धतीने शहराला कायम सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रेल्वेबाबतही लवकरच निर्णय... लातूर शहराला मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा सुरू आहे. हा पाणीपुरवठा आॅगस्ट अखेर सुरू राहणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी स्थानिक जलस्त्रोतांतील पाणीसाठा वाढल्यामुळे चालू असलेल्या रेल्वेच्या पाणीपुरवठ्याबाबतही निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले. यावेळी पत्रपरिषदेला जिल्हा कृषी अधीक्षक प्रतापसिंह कदम, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता रुपाली ठोंबरे, अभियंता सु.ब. चव्हाण आदी उपस्थित होते.

शहरातील पाण्याबाबत नियोजन करू... स्थानिक जलस्त्रोतातील पाणीसाठा वाढला आहे. परंतु, नळाद्वारे पाणी देण्याची रुटिंग लागेपर्यंत काही भागांत रोटेशन पद्धतीने काही टँकर काही दिवसांपुरते सुरू राहणार आहेत. सध्या काही भागांतील पाणी नियोजनाबाबत टँकरवाले गांभीर्याने घेत नसले तरी याबाबत नियोजन करू, असेही ते म्हणाले.

वृक्ष ६ हजार अन् खड्डे १० हजार... २ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत शासनाने १ जुलै रोजी जिल्हाभरात वृक्ष लागवड सुरू केली. यामध्ये महानगरपालिकेला ६ हजारांचे उद्दिष्ट दिले होते. परंतु, जिल्हास्तरावर वाढीव उद्दिष्ट देण्यात आल्याने मनपाने दहा हजार खड्डे घेतले. परंतु, शहरात लावण्यायोग्य झाडे उपलब्ध नसल्याने लागवडीची प्रक्रिया रखडली आहे. परंतु, झाडे उपलब्ध होताच लागवड केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी पत्रपरिषदेत सांगितले.