शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

लातूर जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचे टँकर बंद

By admin | Updated: August 2, 2016 23:07 IST

गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमान होत नसल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी २६० गावांत ४६० अधिग्रहणांद्वारे तर ७६ गावांत ७९ टँकरद्वारे

पत्रपरिषद : जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांची माहिती

लातूर : गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमान होत नसल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी २६० गावांत ४६० अधिग्रहणांद्वारे तर ७६ गावांत ७९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. तर मनपाद्वारे ७० टँकर बाहेरून पाणी आणण्यासाठी सुरू होते. परंतु, दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे जिल्हा परिषद व मनपाचे बाहेरील सर्व टँकर बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी पत्रपरिषदेत दिली. गेल्या तीन वर्षांपासून लातूर शहरासह जिल्ह्याला अवर्षणग्रस्त परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, अहमदपूर, शिरूर अनंतपाळ, उदगीर, देवणी, जळकोट या दहा तालुक्यांतील ७६ गावांत ७९ टँकरद्वारे तर २६० गावांत ४६० अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला होता. परंतु, गेल्या दोन दिवसांमध्ये ४६७.७७ मि.मी. पाऊस झाल्याने पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ऐतिहासिक विहिरी व इतर स्थानिक जलस्त्रोतांमध्ये पाणी वाढल्याने जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू असलेले सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिकेअंतर्गत लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेले ७० टँकरही बंद करून लातूर शहराला स्थानिक जलस्त्रोतांतून पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे लातूर शहरातील नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. पर्यायी पाण्याची सोय व्हावी म्हणून साई, नागझरी व भंडारवाडी येथून होणारा पाणीपुरवठा रोटेशन पद्धतीने शहराला कायम सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रेल्वेबाबतही लवकरच निर्णय... लातूर शहराला मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा सुरू आहे. हा पाणीपुरवठा आॅगस्ट अखेर सुरू राहणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी स्थानिक जलस्त्रोतांतील पाणीसाठा वाढल्यामुळे चालू असलेल्या रेल्वेच्या पाणीपुरवठ्याबाबतही निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले. यावेळी पत्रपरिषदेला जिल्हा कृषी अधीक्षक प्रतापसिंह कदम, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता रुपाली ठोंबरे, अभियंता सु.ब. चव्हाण आदी उपस्थित होते.

शहरातील पाण्याबाबत नियोजन करू... स्थानिक जलस्त्रोतातील पाणीसाठा वाढला आहे. परंतु, नळाद्वारे पाणी देण्याची रुटिंग लागेपर्यंत काही भागांत रोटेशन पद्धतीने काही टँकर काही दिवसांपुरते सुरू राहणार आहेत. सध्या काही भागांतील पाणी नियोजनाबाबत टँकरवाले गांभीर्याने घेत नसले तरी याबाबत नियोजन करू, असेही ते म्हणाले.

वृक्ष ६ हजार अन् खड्डे १० हजार... २ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत शासनाने १ जुलै रोजी जिल्हाभरात वृक्ष लागवड सुरू केली. यामध्ये महानगरपालिकेला ६ हजारांचे उद्दिष्ट दिले होते. परंतु, जिल्हास्तरावर वाढीव उद्दिष्ट देण्यात आल्याने मनपाने दहा हजार खड्डे घेतले. परंतु, शहरात लावण्यायोग्य झाडे उपलब्ध नसल्याने लागवडीची प्रक्रिया रखडली आहे. परंतु, झाडे उपलब्ध होताच लागवड केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी पत्रपरिषदेत सांगितले.