शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचे टँकर बंद

By admin | Updated: August 2, 2016 23:07 IST

गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमान होत नसल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी २६० गावांत ४६० अधिग्रहणांद्वारे तर ७६ गावांत ७९ टँकरद्वारे

पत्रपरिषद : जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांची माहिती

लातूर : गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमान होत नसल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी २६० गावांत ४६० अधिग्रहणांद्वारे तर ७६ गावांत ७९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. तर मनपाद्वारे ७० टँकर बाहेरून पाणी आणण्यासाठी सुरू होते. परंतु, दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे जिल्हा परिषद व मनपाचे बाहेरील सर्व टँकर बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी पत्रपरिषदेत दिली. गेल्या तीन वर्षांपासून लातूर शहरासह जिल्ह्याला अवर्षणग्रस्त परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, अहमदपूर, शिरूर अनंतपाळ, उदगीर, देवणी, जळकोट या दहा तालुक्यांतील ७६ गावांत ७९ टँकरद्वारे तर २६० गावांत ४६० अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला होता. परंतु, गेल्या दोन दिवसांमध्ये ४६७.७७ मि.मी. पाऊस झाल्याने पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ऐतिहासिक विहिरी व इतर स्थानिक जलस्त्रोतांमध्ये पाणी वाढल्याने जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू असलेले सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिकेअंतर्गत लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेले ७० टँकरही बंद करून लातूर शहराला स्थानिक जलस्त्रोतांतून पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे लातूर शहरातील नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. पर्यायी पाण्याची सोय व्हावी म्हणून साई, नागझरी व भंडारवाडी येथून होणारा पाणीपुरवठा रोटेशन पद्धतीने शहराला कायम सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रेल्वेबाबतही लवकरच निर्णय... लातूर शहराला मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा सुरू आहे. हा पाणीपुरवठा आॅगस्ट अखेर सुरू राहणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी स्थानिक जलस्त्रोतांतील पाणीसाठा वाढल्यामुळे चालू असलेल्या रेल्वेच्या पाणीपुरवठ्याबाबतही निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले. यावेळी पत्रपरिषदेला जिल्हा कृषी अधीक्षक प्रतापसिंह कदम, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता रुपाली ठोंबरे, अभियंता सु.ब. चव्हाण आदी उपस्थित होते.

शहरातील पाण्याबाबत नियोजन करू... स्थानिक जलस्त्रोतातील पाणीसाठा वाढला आहे. परंतु, नळाद्वारे पाणी देण्याची रुटिंग लागेपर्यंत काही भागांत रोटेशन पद्धतीने काही टँकर काही दिवसांपुरते सुरू राहणार आहेत. सध्या काही भागांतील पाणी नियोजनाबाबत टँकरवाले गांभीर्याने घेत नसले तरी याबाबत नियोजन करू, असेही ते म्हणाले.

वृक्ष ६ हजार अन् खड्डे १० हजार... २ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत शासनाने १ जुलै रोजी जिल्हाभरात वृक्ष लागवड सुरू केली. यामध्ये महानगरपालिकेला ६ हजारांचे उद्दिष्ट दिले होते. परंतु, जिल्हास्तरावर वाढीव उद्दिष्ट देण्यात आल्याने मनपाने दहा हजार खड्डे घेतले. परंतु, शहरात लावण्यायोग्य झाडे उपलब्ध नसल्याने लागवडीची प्रक्रिया रखडली आहे. परंतु, झाडे उपलब्ध होताच लागवड केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी पत्रपरिषदेत सांगितले.