शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

नसलेल्या ग्रा.पं.साठी पाणीपुरवठा योजना

By admin | Updated: June 9, 2017 02:47 IST

उपअभियंता आर.एस.माळी यांनी अस्तित्वात नसलेल्या कावाडे ग्रामपंचायतीच्या नावे एकाच कामाची दोन अंदाजपत्रके तयार केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : तालुक्यातील उमटे धरणामधील भ्रष्टाचाराचे प्रकरण ताजे असतानाच अलिबागच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी उपअभियंता आर.एस.माळी यांनी अस्तित्वात नसलेल्या कावाडे ग्रामपंचायतीच्या नावे एकाच कामाची दोन अंदाजपत्रके तयार केली. सरकारी निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे आपले पोर्टलवरून दिली आहे.ग्रामस्थ मच्छिंद्र पाटील यांनीही याबाबत आधी तक्रार केली होती. त्यावर काहीच कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी आर.एस.माळी यांच्याविरुध्द मधुकर ठाकूर यांनी २१ सप्टेंबर २०१६ रोजी तक्र ार करून त्यांचा पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार तत्काळ काढून घ्यावा, अशी मागणी केली होती. परंतु जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ठाकूर यांना १९ डिसेंबर २०१६ रोजी पत्र लिहून रिक्त पदे भरल्यावर माळी यांचा कार्यभार काढून घेण्यात येईल असे कळविले होते. याच माळी यांचे उमटे धरणामधील कंत्राटदाराला कामे न करता ३ कोटी रुपयांचे बिल अदा करणे, अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतींच्या नावे बिले काढणे असे पराक्र म उघडकीस आले आहेत. दीड वर्षापूर्वी तर मापगाव पाणीपुरवठा योजनेमध्ये बनावट कागदपत्रे तयार केल्याबद्दल माळी यांच्याविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. असे असतानाही खोटी बिले काढून विविध पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची पोटे भरण्यासाठी माळी यांना या ठिकाणी कार्यरत ठेवल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. त्यांच्याकडील पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार काढून न घेण्यास तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारीही जबाबदार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.कावाडे येथील शौचालयासाठी पाण्याची लाइन टाकणे, टाकी बांधणे अशा कामांसाठी अलिबाग उपविभागाने ग्रामपंचायत कावाडे जी ग्रामपंचायत अस्तित्वातच नाही तिच्या नावे प्रभारी उप अभियंता माळी यांनी पत्र दिले आहे. त्याचप्रमाणे काम पूर्ण झाल्याचेही प्रमाणपत्र दिले आहे. >पत्र लिहिलेली ग्रामपंचायत अस्तित्वातच नाहीबिल शेकापच्या माजी सभापती असणाऱ्या मुलाच्या नावे असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. कावाडे येथील पाणीपुरवठा योजनेबाबतच्या या पत्रावर जावक क्र मांक नाही, तारीख नाही, पत्र लिहिलेली ग्रामपंचायत अस्तित्वातच नाही. या सर्व प्रकारावरून पाणीपुरवठा विभागाचा कारभार कसा अनागोंदी चालला आहे हे सिध्द होते. कावाडे येथील शौचालयासाठी पाण्याची लाइन टाकणे, टाकी बांधणे अशा कामांसाठी अलिबाग उपविभागाने ग्रामपंचायत कावाडे जी ग्रामपंचायत अस्तित्वातच नाही तिच्या नावे प्रभारी उप अभियंता माळी यांनी पत्र दिले.