शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नसलेल्या ग्रा.पं.साठी पाणीपुरवठा योजना

By admin | Updated: June 9, 2017 02:47 IST

उपअभियंता आर.एस.माळी यांनी अस्तित्वात नसलेल्या कावाडे ग्रामपंचायतीच्या नावे एकाच कामाची दोन अंदाजपत्रके तयार केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : तालुक्यातील उमटे धरणामधील भ्रष्टाचाराचे प्रकरण ताजे असतानाच अलिबागच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी उपअभियंता आर.एस.माळी यांनी अस्तित्वात नसलेल्या कावाडे ग्रामपंचायतीच्या नावे एकाच कामाची दोन अंदाजपत्रके तयार केली. सरकारी निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे आपले पोर्टलवरून दिली आहे.ग्रामस्थ मच्छिंद्र पाटील यांनीही याबाबत आधी तक्रार केली होती. त्यावर काहीच कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी आर.एस.माळी यांच्याविरुध्द मधुकर ठाकूर यांनी २१ सप्टेंबर २०१६ रोजी तक्र ार करून त्यांचा पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार तत्काळ काढून घ्यावा, अशी मागणी केली होती. परंतु जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ठाकूर यांना १९ डिसेंबर २०१६ रोजी पत्र लिहून रिक्त पदे भरल्यावर माळी यांचा कार्यभार काढून घेण्यात येईल असे कळविले होते. याच माळी यांचे उमटे धरणामधील कंत्राटदाराला कामे न करता ३ कोटी रुपयांचे बिल अदा करणे, अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतींच्या नावे बिले काढणे असे पराक्र म उघडकीस आले आहेत. दीड वर्षापूर्वी तर मापगाव पाणीपुरवठा योजनेमध्ये बनावट कागदपत्रे तयार केल्याबद्दल माळी यांच्याविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. असे असतानाही खोटी बिले काढून विविध पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची पोटे भरण्यासाठी माळी यांना या ठिकाणी कार्यरत ठेवल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. त्यांच्याकडील पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार काढून न घेण्यास तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारीही जबाबदार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.कावाडे येथील शौचालयासाठी पाण्याची लाइन टाकणे, टाकी बांधणे अशा कामांसाठी अलिबाग उपविभागाने ग्रामपंचायत कावाडे जी ग्रामपंचायत अस्तित्वातच नाही तिच्या नावे प्रभारी उप अभियंता माळी यांनी पत्र दिले आहे. त्याचप्रमाणे काम पूर्ण झाल्याचेही प्रमाणपत्र दिले आहे. >पत्र लिहिलेली ग्रामपंचायत अस्तित्वातच नाहीबिल शेकापच्या माजी सभापती असणाऱ्या मुलाच्या नावे असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. कावाडे येथील पाणीपुरवठा योजनेबाबतच्या या पत्रावर जावक क्र मांक नाही, तारीख नाही, पत्र लिहिलेली ग्रामपंचायत अस्तित्वातच नाही. या सर्व प्रकारावरून पाणीपुरवठा विभागाचा कारभार कसा अनागोंदी चालला आहे हे सिध्द होते. कावाडे येथील शौचालयासाठी पाण्याची लाइन टाकणे, टाकी बांधणे अशा कामांसाठी अलिबाग उपविभागाने ग्रामपंचायत कावाडे जी ग्रामपंचायत अस्तित्वातच नाही तिच्या नावे प्रभारी उप अभियंता माळी यांनी पत्र दिले.