शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु, नदीकिनारी गावांना दक्षतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 22:06 IST

पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला असून ५ दरवाजे १ मीटरने उघडले आहेत.

ऑनलाइन लोकमतठाणे दि २१: पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला असून ५ दरवाजे १ मीटरने उघडले आहेत. भातसा धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु.पा. सोनवणे यांनी यासंदर्भात शहापूर, भिवंडी, कल्याणच्या तहसीलदारांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत असे प्रांत अधिकारी डॉ संतोष थिटे यांनी सांगितले आहे. यामुळे शहापूर तालुक्यातील माहुली किल्ला व धबधबा, विहीगाव येथील अशोका किल्ला, भातसा व तानसाच्या ५०० मीटर परिसरात पर्यटकांना जाण्यापासून प्रतिबंध करण्यात आला आहे.  आज सकाळी ९ पासून भातसा धरणाची पातळी १३४.७६ मीटर एवढी झाली. धरणाची पाणी पातळी जलाशय प्रचालन सूचीनुसार नियमित ठेवण्यासाठी दरवाजे कोणत्याही क्षणी उघडावे लागणार असून परिणामत: भातसा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु होऊ शकतो.भातसा नदीच्या आसपासच्या गावांवर याचा परिणाम होऊ शकतो. शहापूर-किन्हवली रस्त्यावरील सापगाव पूल तसेच सापगाव व नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांनी दक्षता घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. वाहत्या पाण्यात प्रवेश करू नये तसेच अधिक काळजी घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.शनिवार आणि रविवारची गर्दी लक्षात घेऊन हा प्रतिबंधात्मक आदेश बजावण्यात आला आहे. माहुली येथे काही दिवसांपूर्वीच २ युवकांचा धबधब्यात वाहून जाऊन मृत्यू झाला होता. धरणाचा पाणीसाठा वाढला की धरणाचे दरवाजे यांत्रिकरित्या आपोआप उघडले जातात परिणामत: धबधब्यांच्या ठिकाणी पाण्यात अचानक मोठी वाढ होऊन पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.या प्रतिबंधात्मक आदेशामुळे आता या परिसरांतील धबधब्यात पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पाण्यात उतरणे, ५०० मीटर परिसरात वाहने घेऊन जाण्यास बंदी राहील. पावसामुळे धोकादायक झालेल्या ठिकाणी किंवा कठड्यांवरून मोबाईलद्वारे सेल्फी काढणे, छायाचित्रे काढणे, चित्रीकरण करणे, याठिकाणी मद्यप्राशन करणे, मद्य बाळगणे यास पुढील आदेश होईस्तोवर बंदी आणण्यात आली आहे.