शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु, नदीकिनारी गावांना दक्षतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 22:06 IST

पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला असून ५ दरवाजे १ मीटरने उघडले आहेत.

ऑनलाइन लोकमतठाणे दि २१: पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला असून ५ दरवाजे १ मीटरने उघडले आहेत. भातसा धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु.पा. सोनवणे यांनी यासंदर्भात शहापूर, भिवंडी, कल्याणच्या तहसीलदारांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत असे प्रांत अधिकारी डॉ संतोष थिटे यांनी सांगितले आहे. यामुळे शहापूर तालुक्यातील माहुली किल्ला व धबधबा, विहीगाव येथील अशोका किल्ला, भातसा व तानसाच्या ५०० मीटर परिसरात पर्यटकांना जाण्यापासून प्रतिबंध करण्यात आला आहे.  आज सकाळी ९ पासून भातसा धरणाची पातळी १३४.७६ मीटर एवढी झाली. धरणाची पाणी पातळी जलाशय प्रचालन सूचीनुसार नियमित ठेवण्यासाठी दरवाजे कोणत्याही क्षणी उघडावे लागणार असून परिणामत: भातसा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु होऊ शकतो.भातसा नदीच्या आसपासच्या गावांवर याचा परिणाम होऊ शकतो. शहापूर-किन्हवली रस्त्यावरील सापगाव पूल तसेच सापगाव व नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांनी दक्षता घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. वाहत्या पाण्यात प्रवेश करू नये तसेच अधिक काळजी घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.शनिवार आणि रविवारची गर्दी लक्षात घेऊन हा प्रतिबंधात्मक आदेश बजावण्यात आला आहे. माहुली येथे काही दिवसांपूर्वीच २ युवकांचा धबधब्यात वाहून जाऊन मृत्यू झाला होता. धरणाचा पाणीसाठा वाढला की धरणाचे दरवाजे यांत्रिकरित्या आपोआप उघडले जातात परिणामत: धबधब्यांच्या ठिकाणी पाण्यात अचानक मोठी वाढ होऊन पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.या प्रतिबंधात्मक आदेशामुळे आता या परिसरांतील धबधब्यात पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पाण्यात उतरणे, ५०० मीटर परिसरात वाहने घेऊन जाण्यास बंदी राहील. पावसामुळे धोकादायक झालेल्या ठिकाणी किंवा कठड्यांवरून मोबाईलद्वारे सेल्फी काढणे, छायाचित्रे काढणे, चित्रीकरण करणे, याठिकाणी मद्यप्राशन करणे, मद्य बाळगणे यास पुढील आदेश होईस्तोवर बंदी आणण्यात आली आहे.