शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
4
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
5
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
6
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
7
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
8
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
9
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
10
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
11
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
12
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
13
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
14
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
15
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
16
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
17
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
18
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
19
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
20
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील धरणांत वॉटर स्पोर्ट्सचा थरार , बहरणार जलपर्यटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 06:52 IST

राज्यातील सह्याद्री आणि सातपुडा पर्वतराजीतील निसर्गपर्यटनस्थळे विकसित करून त्याला जोड म्हणून जलसंपदा विभागाच्या ३२५५ धरणांच्या परिसरात रिसॉर्ट, वॉटर स्पोर्ट्ससह नौकानयन, मनोरंजन पार्कचा आनंद पर्यटकांना आता लवकरच घेता येणार आहे.

- नारायण जाधवठाणे  -  राज्यातील सह्याद्री आणि सातपुडा पर्वतराजीतील निसर्गपर्यटनस्थळे विकसित करून त्याला जोड म्हणून जलसंपदा विभागाच्या ३२५५ धरणांच्या परिसरात रिसॉर्ट, वॉटर स्पोर्ट्ससह नौकानयन, मनोरंजन पार्कचा आनंद पर्यटकांना आता लवकरच घेता येणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने यास मंजुरी दिल्यानंतर जलसंपदा विभागाने यासाठीच्या खासगीकरणाचा आधार घेऊन पर्यटनवृद्धीस पोषक असे धोरण सोमवारीच जाहीर केले आहे.याचा सर्वाधिक लाभ समुद्रकिनाऱ्यांसह ठाणे आणि पालघरसह रायगड जिल्ह्याला होणार आहे. कारण, तिन्ही जिल्ह्यांत सह्याद्रीच्या रांगांतील पर्यटनस्थळे, बीचसोबतच जलसंपदा विभागाच्या मालकीची धरणे आहेत. यात काही एमआयडीसी आणि महापालिकांच्या धरणांचाही समावेश आहे. या सर्व ठिकाणी आता खासगीकरणातून जलपर्यटन वाढीस लागून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे जलसंपदा विभागाच्या पाच महामंडळांच्या अधिनियमातील तरतुदी या सारख्याच असल्याने हे राज्यस्तरीय एकत्रित धोरण तयार करण्यात आले आहे.जलसंपदा विभागाच्या या धोरणानुसार या पाचही महामंडळांकडे असलेल्या पर्यटनक्षम जमिनी, विश्रामगृहे, इमारती, वसाहती या खासगी भागीदारी किंवा बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहेत.ही आहेत धोरणेजलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील पर्यटनस्थळांचा विकास करणे. त्यासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. रिसॉर्ट, वॉटर स्पोर्ट्ससह नौकानयन, मनोरंजन पार्क विकसित करणे. कला व हस्तकला केंद्रांची उभारणी करणे. सह्याद्री रांगांमध्ये हिल स्टेशन विकसित करणे. रोप वे विकसित करणे. कॅम्पिंग कॅरावानिंग व तंबूची सोय, प्रदर्शन केंद्र, पर्यटनसुविधा पुरवणे, यासाठी महाराष्ट्र पर्यटन धोरण-२०१६ च्या तरतुदींचा अंगीकार करून त्या यासुद्धा धोरणास लागू करण्यात येणार आहेत.१० ते ३० वर्षांचा राहणार करारजलसंपदा विभागाच्या या धोरणानुसार अ वर्ग पर्यटनस्थळे ही दुरुस्त करून १० वर्षांच्या करारावर देण्यात येणार आहेत. हा करार संपल्यानंतर कंत्राटदारास अजिबात मुदतवाढ न देता नव्याने ई-निविदा मागवल्या जातील.. तर, ब व क वर्ग पर्यटनस्थळे विकासकास ३० वर्षांच्या करारावर देण्यात येतील. त्यांची दुरुस्ती व गुंतवणूक पूर्णत: विकासकाने करयाची आहेत. येथे तो नव्याने त्याच्या सोयीनुसार जलसंपदा विभागाची परवानगी घेऊन बांधकाम करून त्याचा वापर करू शकणार आहे. मात्र, ३० वर्षांचा करार संपल्यानंतर विकासकास मुदतवाढ देण्यात येणार नाही.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र