शहरं
Join us  
Trending Stories
1
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
2
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
3
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
4
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
5
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
6
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
7
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
8
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
9
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
10
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
13
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
14
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
15
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
16
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
17
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
18
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
19
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
20
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...

टेन्टकार्ड्सच्या माध्यमातून जलसाक्षरता

By admin | Updated: May 16, 2016 02:19 IST

जलबचतीची प्रत्यक्ष कृती करणारे ‘लोकमत’ जलमित्र अभियान सोमवार, दि. १६ मेपासून दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करीत असून

मुंबई : सध्याच्या भीषण जलसंकटावर पाण्याची बचत हाच केवळ एकमेव उपाय असल्यामुळे त्यासंदर्भातील जनजागृती आणि जलबचतीची प्रत्यक्ष कृती करणारे ‘लोकमत’ जलमित्र अभियान सोमवार, दि. १६ मेपासून दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करीत असून, या सप्ताहात हॉटेल्समध्ये ग्राहक ज्या ठिकाणी बसून खानपान करतात तेथे ‘जलमित्र’चे टेन्टकार्ड ठेवण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेत टेन्टकार्डच्या माध्यमातून जलसाक्षरता प्रभावीपणे विकसित करण्याचा उद्देश आहे.सहा आठवड्यांच्या जलमित्र अभियानात पहिल्या सप्ताहामध्ये हॉटेलचालक, कर्मचाऱ्यांना जलबचतीचा संदेश देऊन त्यांना या अभियानात सहभागी करून घेण्यात आले. हॉटेल्समध्ये पाणी साठविण्यासाठी ड्रम्स देऊन तेथे जलबचतीचे कार्य सुरू झाले. आजवर राज्यभरात हजारो लिटर्स पाणी या मोहिमेंतर्गत साठविले गेले असून, हॉटेलचालकांनी त्याचा साफसफाई आणि बागांसाठी पुनर्वापरही केला आहे.दुसऱ्या सप्ताहामध्ये ग्राहकांच्या जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे. ग्राहक ज्या टेबलवर बसून उपहार किंवा भोजन घेतात तेथे टेन्टकार्ड ठेवून त्यांना पाणी वाचविण्याचा संदेश दिला जाईल. हॉटेलमध्ये ग्राहक जेव्हा पेयजलाची मागणी करतो तेव्हा वेटर्सकडून त्यांना पूर्ण ग्लास भरून पाणी दिले जाते.ग्राहक बऱ्याचदा ग्लासभर पाणी घेत नाही. त्यामुळे अर्धा ग्लास वाया जातो. ही बाब लक्षात घेऊन आवश्यक तेवढेच पाणी मागा आणि ग्राहकांना देण्याचा संदेश या टेन्टकार्ड्सवर आहे. याशिवाय मोफत मिळणाऱ्या पाण्याची किंमत असल्याची जाणीवही ग्राहकांना करून देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)‘जलमित्र’चे उपक्रममंगल कार्यालयात पाण्याचा वापर जास्त होतो. मात्र, पाणी वाया जाण्याचे प्रमाणही जास्त असते. ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन सातारा जिल्ह्यातील अनेक मंगल कार्यालय मालकांनी पाणीबचतीसाठी नानाविध प्रयोग राबविले आहेत.दैनंदिन व्यवहारात पाण्याचा वापर हॉटेलमध्ये जास्त होतो; म्हणून त्या घटकामध्ये यासंबंधी प्रबोधन व्हावे या हेतूने ‘लोकमत’च्या टीमने कोल्हापूर शहरातील विविध हॉटेल्सना भेटी देत पाणीबचतीबाबत प्रबोधन केले. या उपक्रमास शहरातील हॉटेल व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अकोला येथे ‘जलमित्र अभियान’ला शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांकडून प्रतिसाद लाभत आहे. वाया जाणाऱ्या पाण्याचा त्यांना संचय करता यावा, यासाठी ‘लोकमत’च्या वतीने शनिवार, १४ मे रोजी शहरातील काही हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना पाण्याचे ड्रम वितरित करण्यात आले. >पावसाचा थेंब न् थेंब जमिनीत जिरविणे आता काळाची गरज झाली आहे. त्यासाठी काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. पाणी बचतीसाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेले जलमित्र अभियान कौतुकास्पद आहे. या अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे व हे अभियान चळवळ व्हावी. आतापर्यंत कालव्यांव्दारे सिंचनासाठी दिले जाणारे पाणी ३० ते ५० टक्के वाया जात होते. हे लक्षात घेऊनच भविष्यात सिंचनासाठी पाणी कालव्यांऐवजी बंद पाईपलाईनने देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सूक्ष्मसिंचन धोरण राबविणे, पाण्याचा पुनर्वापर हीदेखील काळाची गरज आहे. - गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री.