शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
4
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
5
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
6
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
7
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा
8
अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही 
9
रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?
10
झोमॅटो आणि स्विगीच्या ग्राहकांना बसणार फटका? डिलिव्हरी शुल्कावर लागणार नवा कर
11
मुरूम कशासाठी उपसला? कुर्ड गावातील नागरिकांनी सत्य सांगितले; अजितदादांनी मध्यस्ती करत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते
12
खासदार इंजिनिअर राशिद तिहार कारागृहात ट्रान्सजेंडर्समुळे त्रस्त; 'ते' HIV पॉझिटिव्ह असल्याचा AIP चा दावा
13
Zara, Nike सारख्या सर्व परदेशी ब्रँड्सना सरकारचा झटका; एका निर्णयानं डोकेदुखी वाढली, खरेदीवर परिणाम होणार?
14
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
15
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?
16
Sri Lanka Bus Accident: पर्यटकांची बस थेट १००० फूट खोल दरीत कोसळली; १५ ठार, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
17
राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला नागपूरमध्ये चिंतन शिबिर; कोणकोणत्या विषयांवर होणार चर्चा?
18
६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस
19
Thane: बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण...
20
एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन; एका वर्षासाठी मिळणार अनलिमिटेड बेनिफिट्स, काय-काय आहे?

पाण्यासाठी दाहीदिशा

By admin | Updated: March 22, 2016 04:09 IST

लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांत दुष्काळझळा प्रचंड जाणवत आहेत. तिन्ही जिल्ह्यांतील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. साई बंधारा आणि मांजरा धरण आटल्यामुळे साडेपाच लाख लोकसंख्येचे लातूर

दत्ता थोरे/ विशाल सोनटक्के/ प्रताप नलावडे,लातूर, उस्मानाबाद, बीडलातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांत दुष्काळझळा प्रचंड जाणवत आहेत. तिन्ही जिल्ह्यांतील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. साई बंधारा आणि मांजरा धरण आटल्यामुळे साडेपाच लाख लोकसंख्येचे लातूर शहर ‘टँकर’भरोसे आहे. दुसरीकडे अंतर्गत पाईपलाईनची कामे प्रलंबित असल्याने निम्मे उस्मानाबाद शहर पाण्यासाठी वणवण फिरत आहे. बीड जिल्ह्यात लहान मोठे १४६ प्रकल्प असून त्यातील बहुतांश कोरडे पडले आहेत. जिल्ह्यात केवळ दीड टक्के पाणीसाठा असल्याने येत्या काळात पाण्याची समस्या अधिकच तीव्र होणार आहे. माळकुंजी येथील तेरणा निम्म प्रकल्प आणि पोहरेगाव येथील बंधाऱ्यातून दररोज ५० टँकरने ३० लाख लिटर पाणी आणून लातुरातील जलशुद्धीकरण केंद्र आणि तीन जलकुंभात साठविले जात आहे. जिल्ह्यात प्रकल्पांतील पाणीसाठ्याची स्थिती अत्यंत गंभीर आहे. एकूण १४१ प्रकल्पांपैकी१२० कोरडे आहेत. पाणीसाठा ६९१ द.ल.घ.मी आहे. फक्त २.२०२ दलघमीच पाणी वापरायोग्य आहे. त्यामुळे आता एप्रिल आणि मे हे दोन महिने काढायचे कसे? या चिंतेत जिल्हा आहे. मांजरा आणि साई या दोन्ही धरणस्थळी ३० फुटांचे चर घेण्यात आले आहेत. या चरांमध्ये झऱ्याच्या रुपात आलेले पाणी लातूर शहरासाठी टँकरने आणले जात आहे. शहरात जे सहा जलकुंभ आहेत, त्याद्वारे होणारा पाणीपुरवठा कुणी विस्कळीत करू नये, मोर्चा आणि आंदोलने करून जलकुंभातील पाणी पळवून नेऊ नये, किंवा त्याची नासाडी करू नये, यासाठी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी कलम १४४ लागू केले आहे. लातूर शहरात मनपाचे प्रत्येक प्रभागात दोन प्रमाणे ३५ प्रभागांत ७० टँकर पाणीपुरवठा करीत आहेत. सात दिवसांतून २०० लिटर पाणी प्रत्येक कुटुंबाला देण्याचा प्रयत्न आहे.उस्मानाबादला निधीची गरजउस्मानाबाद जिल्ह्यातील १९४ गावांना टंचाईची झळ सोसावी लागत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाला मराठवाड्याला द्यावयाच्या २३.६६ टीएमसी पैकी कृष्णा पाणीतंटा लवादाने मंजूर केलेले पहिल्या टप्प्यातील ७ टीएमसी पाण्यासाठीच्या कामाला ठोस निधी द्यावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामाला तातडीने निधी देऊ, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी मराठवाडादौऱ्यात दिला होता. त्यानंतर जलसंपदा विभागाने तयार केलेला यासंबंधीचा प्रस्ताव प्रस्ताव नियोजन विभागाकडूनवित्त विभागाकडे गेला आहे. शासनाने निधीची ठोस तरतूद केल्यास ७ टीएमसी पाण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो. त्यामुळे परंडा, भूम तालुक्यासह वाशी आणि उस्मानाबाद तालुक्यातील काही गावांतील टंचाईवर कायमस्वरूपी मात करता येणे शक्य आहे. जिल्ह्यातील १९४ गावे आणि सात वाड्यांसाठी जवळपास २७२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, २५६ विंधन विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आलेले आहे. तरीही नागरिकांचे हाल सुरूच आहेत. परंडा शहरापासून अवघ्या काही किमी अंतरावर सीना-कोळेगाव हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आला. मात्र, तीन वर्षांपासून या प्रकल्पात ठणठणाट आहे. बिंदुसरा धरण कोरडे पडले असून बीड शहराला आता माजलगाव धरणावरच तहान भागवावी लागत आहे. तथापि, या धरणात अवघा ३० दिवस पुरेल इतकाच साठा आहे. जिल्ह्यातील १२०० हातपंपही कोरडे पडले आहेत.विहिरीतून तळाला गेलेले पाणी उपसण्यासाठी गेलेल्या लहान मुलांचा आणि वृद्धांसह तरूण महिलांचाही बळी गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. गेवराई तालुक्यात अवघ्या दीड महिन्यात चार बळी गेले आहेत. मिळेल ते पाणी पिण्याचे प्रमाण वाढल्याने ग्रामीण भागात आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.