पुणे : पावसाअभावी सध्या राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी उपशावर निर्बंध घालण्याच्या सूचना शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.राज्यात अनेक तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. यासाठी खास अध्यादेश काढून ज्या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला त्या ठिकाणी महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियमानुसार भूगर्भातील पाणी वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत असलेल्या परिसरात ५०० मीटर अंतरामध्ये विहिरीचे खोदकाम करण्याची परवानगी न देणे, खासगी विहिरीतील पाणी उपशावर बंदी घालणे, पाण्याची स्थिती खूपच गंभीर असल्यास १ मीटर परिसरात पाणी उपशावर निर्बंध घालणे, भूजल पातळी २ मीटरपेक्षा अधिक खाली गेली आहे, अशा गावांचा आराखडा तयार करवा, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
पाणीउपशावर निर्बंध
By admin | Updated: October 3, 2015 03:47 IST