शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
2
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
3
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
4
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
5
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
6
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
7
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
8
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
9
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
10
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
11
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
12
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
13
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
14
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
15
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
16
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
17
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
18
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
19
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड

मच्छीमार नौकांसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प

By admin | Updated: May 16, 2016 04:37 IST

पाण्याचा भीषण दुष्काळ आणि मुंबई महानगरपालिकेने मुंबईत केलेली पाणीकपात यांच्या कातरीत मुंबईतील मच्छीमार समाज सापडला आहे.

मनोहर कुंभेजकर,  

मुंबई-राज्यात असलेला पाण्याचा भीषण दुष्काळ आणि मुंबई महानगरपालिकेने मुंबईत केलेली पाणीकपात यांच्या कातरीत मुंबईतील मच्छीमार समाज सापडला आहे. त्यामुळे खोल समुद्रात जाणाऱ्या मच्छीमार नौकांना पाणीपुरवठा करणे ही मच्छीमारांची मोठी समस्या बनली आहे. यावर मात करत वेसावे कोळीवाड्यातील बाजार गल्ली कोळी जमात संस्थेच्या सुमारे ४५० सभासदांनी एकमताने निर्णय घेऊन आणि सामाजिक बांधिलकी जपत नाममात्र दरात वेसावे समुद्रकिनारी वेसावकरांना आधारवड ठरणारा आणि राज्यातील समुद्रकिनारी असलेला पहिलाच जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केला आहे. रोज २४ तास हा जलशुद्धप्रकल्प सुरू असतो आणि येथील मच्छीमार बांधवांनादेखील यामुळे रोजगार मिळाला आहे. येथील मच्छीमार नौकांसाठी गरजेनुसार या प्रकल्पातून शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. या प्रकल्पातून शुद्धीकरण केलेले पाणी थेट समुद्रकिनारी शाकारलेल्या मच्छीमार नौकांच्या पाण्याच्या कॅनमध्ये भरल्यामुळे मच्छीमारांची दमछाक थांबली आहे. मासेमारीसाठी जाणाऱ्या २० ते २२ मच्छीमार नौकांना या प्रकल्पाचा लाभ होत आहे.समुद्रकिनारी बाजारगल्लीजवळ १५ बाय १२च्या केबिनमध्ये सुमारे २० फुटी एक कूपनलिका बांधण्यात आली आहे. त्यामधून अद्ययावत जलशुद्धीकरण यंत्राद्वारे एका तासाला सुमारे ४५०० हजार लीटर पाणी तयार होते. येथील ५ हजार लीटरच्या टाक्यांमध्ये हे पाणी साठवले जाते. त्यामध्ये शुद्ध पाण्याचे प्रमाण सुमारे ३००० लीटर इतके असते. टाकाऊ पाणी येथील समुद्रकिनाऱ्यावरील सध्या सुरू असलेल्या मत्स्यविभागाच्या चौथऱ्याच्या कामासाठी व अन्य बांधकामासाठी वापरले जाते. मढच्या मच्छीमार नौकादेखील येथील शुद्ध पाण्याचा लाभ घेतात. तर येथील गरजू नागरिकांना वापरण्यासाठी आणि लग्नसराईसाठी सामाजिक बांधिलकी जपत मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो, अशी माहिती बाजार गल्ली कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष पराग भावे यांनी दिली. पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि येथील स्थानिक नगरसेवक यशोधर (शैलेश) फणसे यांचे सहकार्य मिळाल्याचे भावे यांनी सांगितले.