शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

दिव्यातील रहिवाशांना तो पुरवतोय पाणी

By admin | Updated: May 19, 2016 03:40 IST

सध्या ठाणे जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा अधिक प्रमाणात सोसाव्या लागत आहेत.

अजित मांडके,

ठाणे- सध्या ठाणे जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा अधिक प्रमाणात सोसाव्या लागत आहेत. ठाण्यापेक्षा कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील रहिवाशांना अधिक फटका बसतो आहे. कपातीच्या काळात येथील रहिवाशांना पाणी मिळावे म्हणून दिव्यातील जलमित्र निलेश पाटील याने पुढाकार घेतला असून साबे गावात कोरड्या विहिरीत टँकरद्वारे पाणी टाकून सुमारे ३०० कुटुंबांना मोफत पाणी उपलब्ध करुन देण्याचे मोलाचे कार्य सुरु केले आहे. ठाणे शहराला आठवड्यातून दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. तर कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात तीन दिवस पाणीकपात आहे. मात्र, त्यानंतरही पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे रहिवाशांना काटकसरीने पाणी वापरावे लागते. तर दिव्यातील अनेक भागांना आजही रेल्वे लाईन क्रॉस करुन पाणी आणावे लागते. विहिरीदेखील कोरड्या झाल्याने रहिवाशांचे हाल होतात. त्यामुळे पाण्याची बचत करण्याचा सल्ला निलेश पाटील हे देत आहेत. येथील गावांना पाणीकपातीच्या काळात पाणी उपलब्ध होत नसल्याने त्यांनी स्वखर्चातून महिनाभरापासून कोरड्या विहिरीत टँकरद्वारे पाणी टाकण्यास सुरुवात केली आहे. बुधवार आणि शुक्रवारी टँकरद्वारे पाणी विहिरीत टाकण्याचे काम ते करतात. आतापर्यंत सुमारे १ लाख लीटर पाणी त्यांनी रहिवाशांना उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे ते साबे गावाचे जलमित्रच ठरले आहेत. समाजसेवेचा हा वसा त्यांनी वडिलांकडून घेतला असून, तो आजही सुरुच ठेवला आहे.