शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

दिव्यातील रहिवाशांना तो पुरवतोय पाणी

By admin | Updated: May 19, 2016 03:40 IST

सध्या ठाणे जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा अधिक प्रमाणात सोसाव्या लागत आहेत.

अजित मांडके,

ठाणे- सध्या ठाणे जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा अधिक प्रमाणात सोसाव्या लागत आहेत. ठाण्यापेक्षा कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील रहिवाशांना अधिक फटका बसतो आहे. कपातीच्या काळात येथील रहिवाशांना पाणी मिळावे म्हणून दिव्यातील जलमित्र निलेश पाटील याने पुढाकार घेतला असून साबे गावात कोरड्या विहिरीत टँकरद्वारे पाणी टाकून सुमारे ३०० कुटुंबांना मोफत पाणी उपलब्ध करुन देण्याचे मोलाचे कार्य सुरु केले आहे. ठाणे शहराला आठवड्यातून दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. तर कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात तीन दिवस पाणीकपात आहे. मात्र, त्यानंतरही पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे रहिवाशांना काटकसरीने पाणी वापरावे लागते. तर दिव्यातील अनेक भागांना आजही रेल्वे लाईन क्रॉस करुन पाणी आणावे लागते. विहिरीदेखील कोरड्या झाल्याने रहिवाशांचे हाल होतात. त्यामुळे पाण्याची बचत करण्याचा सल्ला निलेश पाटील हे देत आहेत. येथील गावांना पाणीकपातीच्या काळात पाणी उपलब्ध होत नसल्याने त्यांनी स्वखर्चातून महिनाभरापासून कोरड्या विहिरीत टँकरद्वारे पाणी टाकण्यास सुरुवात केली आहे. बुधवार आणि शुक्रवारी टँकरद्वारे पाणी विहिरीत टाकण्याचे काम ते करतात. आतापर्यंत सुमारे १ लाख लीटर पाणी त्यांनी रहिवाशांना उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे ते साबे गावाचे जलमित्रच ठरले आहेत. समाजसेवेचा हा वसा त्यांनी वडिलांकडून घेतला असून, तो आजही सुरुच ठेवला आहे.