शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर पाणीप्रश्न

By admin | Updated: April 4, 2017 03:29 IST

पनवेल महानगरपालिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून, राजकीय पक्षांकडून वातावरण निर्मिती करण्यात येत आहे.

अरुणकुमार मेहत्रे,

कळंबोली- पनवेल महानगरपालिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून, राजकीय पक्षांकडून वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. शहरातील काही भागात अल्पदाबाने, दिवसभरातून एकदाच तासभरासाठी पाणी येत असल्याने नागरिक हैराण आहेत. त्यामुळे शेकाप आघाडीने हाच प्रश्न अजेंड्यावर ठेवला आहे. ‘दिवसाआड पाणी... किती दिवस तीच कहाणी...’ अशी बॅनरबाजी शेतकरी कामगार पक्षाने सुरू केली असून अशा आशयाचे बॅनर्स शहरात, रेल्वेस्थानकात लावले आहेत. मनसे आणि शिवसेनेकडूनही पाण्याचेच भांडवल करण्यात येत आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीचा विचार करता, शहराला देहरंग धरणातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी असल्याने मागणीप्रमाणे पाणी मिळत नाही. त्यामुळे एमजेपी आणि एमआयडीसीकडून पाणी विकत घ्यावे लागते. मे महिन्यापर्यंत पिण्याचे पाणी मिळावे यासाठी काही भागात आतापासूनच पाणीकपात करण्यात आली आहे. त्यासाठी देहरंग धरणातून अतिशय कमी पाण्याचा उपसा करण्यात येत आहे, तर इतर प्राधिकरणाकडून येणारे पाणी दिवसाआड पनवेलकरांना पुरवले जात आहे. यामुळे पाणीटंचाई भासत असून गतवर्षीही हीच स्थिती होती. नवीन पनवेल, कळंबोली या वसाहतींना एमजेपीकडून मागणीप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. कामोठे नोडलाही नवी मुंबई महापालिकेकडून कमी पाणी दिले जाते. खारघरमधील परिस्थिती फारशी वेगळी नाही. समाविष्ट केलेल्या गावांचा प्रश्नच आणखीनच बिकट आहे. दरवर्षी भेडसावणाऱ्या पाणीसमस्येवर खरेतर सर्वपक्षांनी एकत्र येऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र राजकीय पक्षांकडून पाणीप्रश्नाचे भांडवल करण्यात येत आहे. रेल्वे स्थानक, चौकाचौकात, एनएमएमटी, रिक्षांवर सुध्दा स्टिकर लावले आहे. माजी नगराध्यक्ष संदीप पाटील आणि माजी नगरसेवक सुनील बहिरा यांनी प्रभाग क्र मांक १७ आणि २० मध्ये पाण्याचा मोफत टँकर सुरू केला आहे. त्या टँकरवर सुध्दा ‘दिवसाआड पाणी, किती दिवस तीच कहाणी’ असा बॅनर लावण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्र मांक १७ आणि १८ मधील उमेदवार अतुल चव्हाण आणि यतीन देशमुख यांच्याकडून किती वर्षे पाणीप्रश्न प्रलंबित, आता बदल हवा अशा आशयाचा संदेश सोशल मीडियात फिरत आहे.