शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याला ऐवजाचे मोल!

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

चोरी होऊ नये, म्हणून मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने बँकेत लॉकरमध्ये ठेवतात. तशीच काहीशी स्थिती लातूर शहरातील पाण्याची आहे. तीव्र टंचाईतही ज्यांना टाक्या पाण्याने भरून

- हणमंत गायकवाड,  लातूरचोरी होऊ नये, म्हणून मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने बँकेत लॉकरमध्ये ठेवतात. तशीच काहीशी स्थिती लातूर शहरातील पाण्याची आहे. तीव्र टंचाईतही ज्यांना टाक्या पाण्याने भरून ठेवता आल्या आहेत, त्यांनी हा ऐवज कुलूपबंद करून सुरक्षित ठेवला आहे. गल्ल्या-गल्ल्यांमधून अशा कुलूपबंद पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा होत असताना, दीडशे रुपये प्रति महिना पाणीपट्टी आकारली जात होती. आता दिवसाला एका कुटुंबाला पाण्यावर इतका खर्च करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. शिवाय, विकत घेऊन साठवून ठेवलेल्या पाण्याची चोरी झाल्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून पाण्याच्या टाक्यांना कुलपे लावली आहेत.शहरातील बसवंतपूर, प्रकाशनगर, खाडगाव रोड, संभाजीनगर, गांधीनगर, बौद्धनगर, संत गोरोबा सोसायटी, सिद्धार्थ सोसायटी, क्वाइल नगर, विक्रमनगर, नृसिंहनगर, आवंतीनगर, कपिलनगर, विकासनगर या वसाहतींतून फिरताना कुलूपबंद टाक्या पाहायला मिळतात.गांधीनगर येथील धनराज शिंदे यांनी सांगितले की, ‘मनपाकडून आठ-दहा दिवसाला दोनशे लीटर्स पाणी दिले जाते, परंतु एवढ्यावर भागत नाही. त्यामुळे आम्ही पाणी विकत घेतो. त्यातच विकतच्या पाण्याचीच चोरी झाली. मध्यरात्री, तसेच दुपारच्या वेळी पाणी चोरीला गेले. त्यामुळे आम्ही टाकीला कुलूप लावतो.’ टँकरधारकांकडे पाण्याची मागणी वाढली आहे, त्यामुळे दरही वाढले आहेत. ज्या संस्था-संघटनांकडून पाणी मोफत दिले जाते, ते त्यांच्या नातेवाईक व कार्यकर्त्यांनाच मिळते. सामान्य व मध्यमवर्गीयांना त्याचा लाभ होत नाही. परिणामी, आम्ही पाणी विकत घेऊन कुलूपबंद ठेवतो, असे कपिलनगर येथील सतीश कांबळे यांनी सांगितले. टाक्यांना कुलूप...पाण्याच्या खर्चामूळे नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. शिवाय, विकत घेऊन साठवून ठेवलेल्या पाण्याची चोरी झाल्याचे प्रकारही वाढले आहेत. याची खबरदारी म्हणून लातूर शहरातील सिद्धार्थ सोसायटी, बौद्धनगर, संत गोरोबाकाका सोसायटी, क्वाइलनगर, गांधीनगर येथील अनेकांनी पाणी भरलेल्या आपल्या सिन्टेक्सच्या टाक्यांना कुलूप लावले आहे.चोरी होऊ नये म्हणून घेतली खबरदारी...बसवंतपूर येथील जमाल पठाण, सिद्धार्थ सोसायटीतील नीलूबाई सावळे, बौद्ध नगरातील केरबा सूर्यवंशी, संत गोरोबाकाका सोसायटीतील श्रीकांत शिंदे, विनायक कसबे, योगेंद्र कांबळे, क्वाइलनगर येथील सतीश सरवदे, आनंद कांबळे आदींनी आपल्या पाण्याच्या टाकीला कुलूप लावले आहे. घरातल्याही लोकांकडून पाण्याचा गैरवापर होऊ नये अन् चोरीही होऊ नये, यासाठी कुलूप लावल्याचे त्यांनी सांगितले. वापरासाठी आणि पिण्यासाठी वेगळे... विकतचे पाणी पिण्यासाठी शुद्ध असेल याची खात्री नाही. त्यामुळे शहरातील बहुतांश मध्यमवर्गीय नागरिक पिण्यासाठी जारच्या पाण्याचा वापर करतात, तर वापरण्यासाठी टँकरचे पाणी विकत घेतात. दिवसाला किमान दीडशे रुपये या पाण्यासाठी मोजावे लागत आहेत. त्यामुळे पाण्याचे महत्त्व कळले असून, वापर काटकसरीने सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी साठविलेले पाणी देखरेखीखाली ठेवले आहे.