शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

पाणीप्रश्नावर पवार-विखे एकत्र!

By admin | Updated: February 2, 2015 04:42 IST

राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहणा-या शरद पवार व राधाकृष्ण विखे यांनी महाराष्ट्राचे पाणी गुजरातला पळवण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाविरोधात एकत्रित लढा देण्याचा निर्धार शिर्डीत व्यक्त केला़

शिर्डी : राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहणा-या शरद पवार व राधाकृष्ण विखे यांनी महाराष्ट्राचे पाणी गुजरातला पळवण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाविरोधात एकत्रित लढा देण्याचा निर्धार शिर्डीत व्यक्त केला़दमणगंगा व नारपार खोऱ्यातील पाणी गुजरातकडे वळवण्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात बैठक घेऊन राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णयही उभयतांनी घेतला़ डाळिंब उत्पादकांच्या परिषदेसाठी आलेल्या माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यात येथे चर्चा झाली. पवारांनी जिल्ह्यातील शेती व पाणीप्रश्नाची माहिती घेतली़ गुजरातला पाणी पळवण्याबाबतची माहिती अतिशय गांभीर्याने जाणून घेतली. प्रवरा सामाजिक अभ्यास मंडळ व महाराष्ट्र पाणी परिषदेने याचा सविस्तर अभ्यास केल्याची माहिती विखे यांनी दिली़ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, आ. वैभव पिचड आदी चर्चेत सहभागी झाले होते.दमण खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रापैकी ६२ व नारपार खोऱ्यातील ५२ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे़ हे पाणी गुजरातला वळवण्यापूर्वी महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गोदावरी व तापी या तुटीच्या खोऱ्यात वळवावे लागेल़ मात्र राज्य शासनाने याबाबत एकतर्फी निर्णय करण्याची भूमिका घेतली आहे़ पाणी कराराच्या संदर्भातील मसुदा शासनाने जाहीर करावा, ही मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे विखे यांनी पवारांना सांगितले. एकत्रित बैठक घेऊन राज्य व केंद्र शासनाशी बोलू, असे आश्वासन पवार यांनी दिले़दारणा, भंडारदरा धरणांबरोबरच विखे यांनी पवारांना त्याचा न्यायालयीन लढा, जलसंपदा नियमन प्राधिकरणाने सुरू केलेले दावे, पेरू, डाळिंब उत्पादकांच्या समस्या, उसाचे कमी झालेले क्षेत्र आदींवर चर्चा केली़ (प्रतिनिधी)