शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

‘टाटां’च्या धरणांतील पाण्याने दोन कोटी लोकांचा प्रश्न मिटेल

By admin | Updated: May 29, 2016 01:18 IST

पुणे जिल्ह्यातील टाटांच्या सहा धरणांतील पाण्यामुळे दुष्काळी भागातील दोन कोटी लोकांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. याशिवाय हे पाणी शेतीसाठी वापरले

सोलापूर : पुणे जिल्ह्यातील टाटांच्या सहा धरणांतील पाण्यामुळे दुष्काळी भागातील दोन कोटी लोकांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. याशिवाय हे पाणी शेतीसाठी वापरले तर ४ लाख एकर एवढे प्रचंड क्षेत्र अतिरिक्त सिंचनाखाली येईल. त्यामुळे सामाजिक दायित्वाच्या भावनेतून आपण यासाठी आवाज उठवत आहोत, असे युवा सामाजिक कार्यकर्ते व जलअभ्यासक प्रफुल्ल कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे असणारे कदम यांनी टाटा धरणांतील पाण्यात उतरून अभिनव जलसत्याग्रह केल्यानंतर त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष गेले. नुकतीच त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयात भेट देऊन आंदोलनामागची भूमिका सविस्तर विशद केली. उच्च न्यायालयाने पाणी ही समाजाची राष्ट्रीय संपत्ती असल्याचे स्पष्ट करताना ती टाटा अथवा कोणाची खासगी मालमत्ता नसल्याचे म्हटले आहे, याकडे लक्ष वेधले असता कदम म्हणाले की, पाण्याचे नैसर्गिक स्थान व जलकायदे यामध्ये ही बाब अंतर्भूत होतीच. परंतु उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे ही बाब अधिक स्पष्ट झाली. टाटा कराराकडे राज्य सरकारने आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने या दृष्टीनेच पाहिले पाहिजे. माझा प्रस्ताव असा आहे की, टाटा या पाण्यातून जेवढी वीज निर्माण करते तेवढ्या विजेचा पर्याय टाटाला उपलब्ध करून द्यायचा जो सहज उपलब्ध आहे आणि टाटांच्या धरणातील सर्व पाणी कायमस्वरूपी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला पाइपलाइनद्वारे पिण्यासाठी तसेच गरजेनुरूप शेतीसाठी व अन्य उद्योगांसाठीही वापरायचे. (प्रतिनिधी )कदम यांच्या प्रमुख नऊ मागण्या- टाटाच्या मालकीच्या धरणातील पाणी दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा.- टाटा करारपत्राची वैधता व योग्यता तपासण्यासाठी कायदेतज्ज्ञांची (जलतज्ज्ञांची नव्हे) व अनुभवी प्रशासकांची समिती नेमावी.- दुष्काळी भागाला टाटाचे पाणी उपलब्ध होण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधण्यासाठी अभ्यास गट नेमावा.- संभाव्य ५०० मेगावॅट अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचा पर्यायी आराखडा तयार करण्यासाठी ऊर्जा विभागाला आदेश द्यावेत.- उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे योग्य व इष्टतम वापरासाठी आराखडा बनविण्यासाठी पाणीपुरवठा व जलसंपदा विभागाला संयुक्तपणे आदेश द्यावेत.- अवजल पाण्याचा लाभ होणाऱ्या भागासाठी पर्यायी नियोजनासाठी जलसंपदा विभागाला आदेश द्यावेत.- टाटा पॉवर कंपनीचेही नुकसान होणार नाही या दृष्टीने चर्चा करण्यासाठी कुशल अभ्यासगट नेमावा.- कृष्णा खोरे महामंडळाच्या जलआराखड्यामध्ये सदर मागणी प्रस्तावाचा तत्काळ समावेश करावा आणि या सर्व विषयाचे सनियंत्रण, समन्वय व अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृती समिती नेमावी.