शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देतबसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
3
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
4
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
5
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
6
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
7
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
8
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
9
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
10
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
11
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
12
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
13
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
14
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
15
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
16
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
17
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
18
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
19
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
20
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?

निवडीतच हेराफेरी!

By admin | Updated: December 12, 2015 02:52 IST

स्मार्ट सिटीच्या नावाखाली राज्य सरकारने केंद्राच्या निकषांत बदल करून १०० पैकी सर्वाेच्च गुण मिळालेल्या शहरांना डावलण्यात आले असून, कमी गुण मिळालेल्या शहरांची निवड केली गेली

नागपूर : स्मार्ट सिटीच्या नावाखाली राज्य सरकारने केंद्राच्या निकषांत बदल करून १०० पैकी सर्वाेच्च गुण मिळालेल्या उल्हासनगर, नांदेड आणि पिंपरी-चिंचवड या शहरांना डावलण्यात आले असून, कमी गुण मिळालेल्या शहरांची निवड केली गेली. केंद्रानेदेखील देशातल्या प्रमुख पाच राज्यांच्या राजधान्यांना स्मार्ट सिटी योजनेतून वगळले आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.गुण कमी-जास्त करण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याचे कोठेही नमूद नसताना, राज्य सरकारने हे गुण १०० ऐवजी ६० केले. राज्याचे ४० गुण वेगळे ठरवले गेले आणि राज्याला ज्या शहरांची निवड करायची होती त्यांचा त्यात समावेश करता यावा, यासाठी या ४० गुणांचा वापर करून घेतला गेला. राज्य सरकारने एकतर केंद्राची फसवणूक केली असून, हे सगळे ढोंग आहे असेही चव्हाण म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)पिंपरी-चिंचवडला वगळण्यामागे देखील गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त करीत चव्हाण म्हणाले, सुरुवातीला पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांचे गुण वेगवेगळे दिले गेले. ३० जुलैला झालेल्या बैठकीत केंद्राकडे प्रस्ताव पाठवताना दोन्ही शहरांचा एकत्रित प्रस्ताव पाठवला गेला. त्यानंतर पुन्हा एकदा पुणे शहराची स्वतंत्र प्रवेशिका पाठवण्यात आली. म्हणजेच राज्य सरकारने १० ऐवजी ११ शहरांच्या प्रवेशिका केंद्राला पाठवल्या. यातही १० प्रवेशिकांवर नगरविकास विभागाच्या सचिवांची सही आणि तारीख आहे.नगरविकास विभागाचा खुलासा स्मार्ट सिटी निवडीची संपूर्ण प्रक्रिया केंद्र शासनाचे निकष व मंत्रिमंडळाच्या पूर्वमान्यतेने संपूर्णपणे पारदर्शीपणे केली आहे. -वृत्त/७> लोकसंख्येचे निकष डावललेदेशातील प्रमुख तीन राज्यांत महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या ५ कोटी ८ लक्ष, उत्तर प्रदेशची ४ कोटी ४५ लक्ष आणि तामिळनाडूची ३ कोटी ५० लक्ष आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या १३ शहरांची निवड होणे अपेक्षित होत; पण प्रत्यक्षात १० शहरांची निवड केली गेली. त्याउलट उत्तर प्रदेशातल्या १३ आणि तामिळनाडूतल्या १२ शहरांची निवड केली. हे करताना शाब्दिक फेरफार करून महाराष्ट्रातील शहरांची संख्या कमी केल्याचा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला. अंतिम गुण तपासले असता कल्याण-डोंबिवलीचा क्रमांक १२ वा होता. मुंबईचा १४ वा आणि औरंगाबादचा १७ वा क्रमांक असताना या शहरांना पहिल्या १० मध्ये स्थान दिले गेले आणि उल्हासनगरचा चौथा, नांदेड वाघाळाचा ७वा आणि पिंपरी-चिंचवडचा १०वा क्रमांक असताना या शहरांना मुद्दाम डावलण्यात आल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.