शहरं
Join us  
Trending Stories
1
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
2
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
3
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
4
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
5
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
6
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
7
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
8
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
9
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
10
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
11
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
12
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
13
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
14
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
15
भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!
16
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
17
"अभिनेत्यांना सकाळी डाएट फुड अन् रात्री ड्रग्स हवे", पहलाज निहलानींचा खुलासा; अक्षयबद्दल म्हणाले...
18
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
19
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
20
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!

निवडीतच हेराफेरी!

By admin | Updated: December 12, 2015 02:52 IST

स्मार्ट सिटीच्या नावाखाली राज्य सरकारने केंद्राच्या निकषांत बदल करून १०० पैकी सर्वाेच्च गुण मिळालेल्या शहरांना डावलण्यात आले असून, कमी गुण मिळालेल्या शहरांची निवड केली गेली

नागपूर : स्मार्ट सिटीच्या नावाखाली राज्य सरकारने केंद्राच्या निकषांत बदल करून १०० पैकी सर्वाेच्च गुण मिळालेल्या उल्हासनगर, नांदेड आणि पिंपरी-चिंचवड या शहरांना डावलण्यात आले असून, कमी गुण मिळालेल्या शहरांची निवड केली गेली. केंद्रानेदेखील देशातल्या प्रमुख पाच राज्यांच्या राजधान्यांना स्मार्ट सिटी योजनेतून वगळले आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.गुण कमी-जास्त करण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याचे कोठेही नमूद नसताना, राज्य सरकारने हे गुण १०० ऐवजी ६० केले. राज्याचे ४० गुण वेगळे ठरवले गेले आणि राज्याला ज्या शहरांची निवड करायची होती त्यांचा त्यात समावेश करता यावा, यासाठी या ४० गुणांचा वापर करून घेतला गेला. राज्य सरकारने एकतर केंद्राची फसवणूक केली असून, हे सगळे ढोंग आहे असेही चव्हाण म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)पिंपरी-चिंचवडला वगळण्यामागे देखील गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त करीत चव्हाण म्हणाले, सुरुवातीला पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांचे गुण वेगवेगळे दिले गेले. ३० जुलैला झालेल्या बैठकीत केंद्राकडे प्रस्ताव पाठवताना दोन्ही शहरांचा एकत्रित प्रस्ताव पाठवला गेला. त्यानंतर पुन्हा एकदा पुणे शहराची स्वतंत्र प्रवेशिका पाठवण्यात आली. म्हणजेच राज्य सरकारने १० ऐवजी ११ शहरांच्या प्रवेशिका केंद्राला पाठवल्या. यातही १० प्रवेशिकांवर नगरविकास विभागाच्या सचिवांची सही आणि तारीख आहे.नगरविकास विभागाचा खुलासा स्मार्ट सिटी निवडीची संपूर्ण प्रक्रिया केंद्र शासनाचे निकष व मंत्रिमंडळाच्या पूर्वमान्यतेने संपूर्णपणे पारदर्शीपणे केली आहे. -वृत्त/७> लोकसंख्येचे निकष डावललेदेशातील प्रमुख तीन राज्यांत महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या ५ कोटी ८ लक्ष, उत्तर प्रदेशची ४ कोटी ४५ लक्ष आणि तामिळनाडूची ३ कोटी ५० लक्ष आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या १३ शहरांची निवड होणे अपेक्षित होत; पण प्रत्यक्षात १० शहरांची निवड केली गेली. त्याउलट उत्तर प्रदेशातल्या १३ आणि तामिळनाडूतल्या १२ शहरांची निवड केली. हे करताना शाब्दिक फेरफार करून महाराष्ट्रातील शहरांची संख्या कमी केल्याचा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला. अंतिम गुण तपासले असता कल्याण-डोंबिवलीचा क्रमांक १२ वा होता. मुंबईचा १४ वा आणि औरंगाबादचा १७ वा क्रमांक असताना या शहरांना पहिल्या १० मध्ये स्थान दिले गेले आणि उल्हासनगरचा चौथा, नांदेड वाघाळाचा ७वा आणि पिंपरी-चिंचवडचा १०वा क्रमांक असताना या शहरांना मुद्दाम डावलण्यात आल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.