शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पाणलोट भ्रष्टाचारात कृषी खात्याला जाग

By admin | Updated: February 13, 2015 01:29 IST

महाड तालुक्यातील खर्डी गावात ‘एकात्मिक पाणलोट विकास’ योजनेंतर्गत केलेल्या बेकायदा कामांमुळे १२ एकर जमीनीचे नुकसान झाल्याचे

अलिबाग : महाड तालुक्यातील खर्डी गावात ‘एकात्मिक पाणलोट विकास’ योजनेंतर्गत केलेल्या बेकायदा कामांमुळे १२ एकर जमीनीचे नुकसान झाल्याचे आणि त्यात २२ लाख ८२ हजार ७८३ रुपयांच्या भ्रष्टाचारा झाल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर रायगडचा कृषि विभाग खडबडून जागा झाला आहे. महाडच्या राजकीय क्षेत्रातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचे रायगड जिल्हा कृषी अधिक्षक के. बी. तरकसे यांनी सांगितले. पुणे येथील ‘वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणे’कडून ही योजना राबवली गेली आहे.हे काम करताना शेतकरी महाडीक यांची परवानगी का घेण्यात आली नाही, योजनेत नेमके किती काम झाले आणि निधीचे वितरण योग्य प्रकारे झाले की नाही याची चौकशी करण्यात येणार आहे. ही योजना खर्डी, चापगाव, वरंडोली, वाळसुरे, कोतूर्डे, नेराव, कोंझर, पूनाडे व घेराकिल्ला या नऊ गावांसाठी आहे. तीन कोटी रुपयांची ही योजना २०१०-११ मध्ये सुरू झाली आहे. ग्रामसमिती व वनराई संस्थेच्या माध्यमातून ती सुरू आहे. जलपातळी, पीक वृद्धीचा अहवाल नाहीरायगड जिल्ह्यात या २१ पाणलोट विकास योजनांच्या माध्यमातून झालेल्या कामांवर आता पर्यंत ६० कोटी पैकी ४५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यांतून गेल्या चार वर्षांत भातशेती क्षेत्रातआणि भात उत्पादनात किती वाढ झाली, भूगर्भातील जलपातळीत वाढ होवून किती गावांतील पाणी टंचाई दूर झाली, या बाबतचा कोणताही अहवाल जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी कार्यालया कडे नाही. निधीच्या वापरा बाबतचे लेखा परीक्षण अहवाल देखील उपलब्ध नाहीत. (प्रतिनिधी)