शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

वाशिम जिल्हा परिषद : काँग्रेस-राकाँ तीन तर एका जागेवर सेना विजयी

By admin | Updated: July 8, 2016 18:11 IST

वाशिम जिल्हा परिषद विषय समितीच्या निवडणुकीत काँग्रेस व राकाँच्या प्रत्येकी दोन सदस्यांनी बंडखोरी केल्याने एका जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय सुकर झाला

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. ८ : वाशिम जिल्हा परिषद विषय समितीच्या निवडणुकीत काँग्रेस व राकाँच्या प्रत्येकी दोन सदस्यांनी बंडखोरी केल्याने एका जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय सुकर झाला. उर्वरीत तीन जागेवर काँग्रेसचे दोन तर राकाँच्या एका उमेदवाराचा विजय झाला. सभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १२ जुलै रोजी संपुष्टात येत असल्याने ८ जुलै रोजी ही निवडणूक घेण्यात आली.जिल्हा परिषदेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १७, शिवसेना १०, राष्ट्रवादी काँग्रेस आठ, भाजपा व अपक्ष प्रत्येकी सहा, भारिप-बमसं तीन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक असे पक्षीय बलाबल आहे. अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने अपक्षांच्या मदतीने जिल्हा परिषदेची सत्ता मिळविली होती. २९ जून रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने अध्यक्ष तर राकाँने उपाध्यक्ष पद काबीज केले होते.

यामुळे चार विषय समितीच्या सभापतीपदाची निवडणूक काँग्रेस-राकाँ-अपक्ष व भारिप-बमसंची आघाडी सहज जिंकेल, असा अंदाज वर्तविला जात होते. प्रत्यक्ष मतदानाला सुरूवात झाल्यानंतर मात्र सभागृहात काँग्रेसच्याच काही सदस्यांनी वेगळेच ह्यराजकारणह्ण शिजविले. दुपारी ३ वाजता हात उंचावून मतदानाला सुरूवात झाली. प्रथम समाजकल्याण समिती सभापती पदासाठी मतदान झाले असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पानुताई दिलीप जाधव यांनी भाजपाच्या रत्नप्रभा घुगे यांचा सात मताने पराभव केला.

जाधव यांना २९ तर घुगे यांना २२ मते मिळाली. महिला व बालकल्याण विषय समिती सभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या यमुनाबाई सिताराम जाधव यांनी शिवसेनेच्या रेखा सुरेश मापारी यांचा दोन मताने पराभव केला. जाधव यांना २७ तर मापारी यांना २४ मते मिळाली. दोन विषय समितीच्या सभापतीसाठी काँग्रेसचे सुधीर गोळे व राजेश जाधव, शिवसेनेचे विश्वनाथ सानप आणि राकाँचे देवेंद्र ताथोड निवडणूक रिंगणात होते. सर्वाधिक २७ मते घेऊन सुधीर गोळे विजयी झाले. दुसऱ्या पदासाठी काँग्रेसच्या दोन सदस्यांनी सेनेच्या उमेदवाराला मतदान केल्याने आणि काँग्रेसच्या एका सदस्याचे मतदान अवैध ठरल्याने शिवसेनेचे विश्वनाथ सानप एका मताने विजयी झाले.

सानप यांना २५ तर राजेश जाधव यांना २४ व देवेंद्र ताथोड यांना २३ मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसचे विकास गवळी व सुखदेव मोरे या दोन सदस्यांनी सेनेचे विश्वनाथ सानप यांना मतदान केले तर काँग्रेसच्या ज्योती गणेशपूरे यांनी तीन उमेदवारांना मतदान केल्याने त्यांचे मत अवैध ठरविण्यात आले. यामुळे सेनेच्या उमेदवाराचा विजय सुकर झाला. राकाँचे देवेंद्र ताथोड व मिना भोने हे दोन सदस्य सेना-भाजपा युतीसोबत गेल्याचा फटकाही काँग्रेस-राकाँ युतीला बसला.