शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

‘त्या’ गावात सकाळी ९ वाजता होते सूर्यदर्शन

By admin | Updated: August 24, 2014 01:09 IST

मावळत्या सूर्यासाठी ब्रिटन, उगवत्या सूर्यासाठी जपान आणि मध्यरात्री उगवणाऱ्या सूर्यासाठी नॉर्वे प्रसिद्ध आहे. परंतु विदर्भात असे एक गाव आहे जेथे गेल्या एक दशकापासून सकाळी ९ वाजता सूर्योदय होतो.

मोहन भोयर - तुमसरमावळत्या सूर्यासाठी ब्रिटन, उगवत्या सूर्यासाठी जपान आणि मध्यरात्री उगवणाऱ्या सूर्यासाठी नॉर्वे प्रसिद्ध आहे. परंतु विदर्भात असे एक गाव आहे जेथे गेल्या एक दशकापासून सकाळी ९ वाजता सूर्योदय होतो. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील हे छोटेसे गाव आहे बाळापूर. मानवनिर्मित टेकड्यांमुळे या गावात सकाळी ९ वाजता सूर्योदय होतो. तुमसर तालुका मुख्यालयापासून ३५ कि़मी. अंतरावर बाळापूर (हमेशा) नावाचे लहानसे गाव आहे. सातपुडा पर्वत रांगात वसलेल्या या गावात बाराही महिने सूर्याची किरणे सकाळी ९ वाजतानंतर दिसतात. या गावाजवळच मॅगनीजची खुली खाण आहे. ही खाण ब्रिटिशकालीन असून हा संपूर्ण परिसर नैसर्गिक खनिज संपत्तीने नटलेला आहे. १०२ वर्षे जुन्या असलेल्या या खाणीवर केंद्र शासनाची मालकी आहे. खाण खुली असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग करण्यात येते. रोज शेकडो टण भुसभुशीत माती आणि दगड बाहेर निघतात. ही माती आणि दगडाचे ढिगारे गावाच्या पूर्व, उत्तर आणि दक्षिण बाजूला टाकले जात असल्याने महाकाय उंचच उंच टेकड्या तयार झालेल्या आहेत. त्यामुळे तिन्ही ऋतूत सकाळी ९ वाजेपर्यंत सूर्याची किरणे गावात पोहोचतच नाहीत. ब्लास्टिंग आणि डम्पिंगमुळे गावात नेहमी धूळ असते. ही धूळ नाकातोंडाद्वारे शरीरात जाते. परिणामी नागरिकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. अनेकांना क्षयरोगाने ग्रासले असून या परिसरातील पाण्यात क्षार असल्यामुळे अनेकांचे दात पिवळे पडले आहेत. त्यांना हाडाचे विकारही जडले आहेत.खाण क्षेत्र वाढलेया खाणीत सुमारे १ हजार २०० कामगार कार्यरत आहेत. खाणीचे निश्चित क्षेत्र किती हे अधिकाऱ्यांनाच माहीत नाही. मॅगनीज दिसेल तिथे उत्खनन सुरू आहे. त्यामुळे खाणीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. २०० वर्षे पुरेल इतके मॅगनीज भूगर्भात आहे. या परिसरात जस्ट्रोपा नावाची वनस्पती लावण्याचे निर्देश शासनाने मॉईलला दिले आहेत. जस्ट्रोपोमुळे वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास मदत होते. परंतु, या परिसरात ही वनस्पती कुठेच दिसत नाही. अपघाताची प्रतीक्षागावाला भेट दिली असता मानवनिर्मित माती व दगडांची उंचच उंच दरड गावात प्रवेश करताच दिसून येते. ही दरड अत्यंत धोकादायक आहे. यामुळे संपूर्ण बाळापूर हे गाव गडप होण्याची भीती आहे. मॉईल प्रशासनाने येथे उपाययोजना केली नाही तर माळीणची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावकऱ्यांचे पुनर्वसन नाहीमॉईल प्रशासनाने कामगारांचे अन्यत्र पुनर्वसन केले नाही. मॉईलच्या प्रदूषणामुळे शेती नापीक झाली आहे. रोजगारासाठी गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी शहराकडे धाव घेतली आहे. खाण मंत्रालयानेही दखल घेतलेली नाही. स्थानिक बेरोजगार तथा शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी न देता परप्रांतीयांनाच स्थान दिले आहे.