शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Nisarga Cyclone: श्रीवर्धन-हरिहरेश्वरला सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 12:03 IST

रायगड, पालघरमधून बोटी माघारी बोलावल्या : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन सज्ज

अलिबाग/पालघर : रायगड, पालघर किनारपट्टी आणि दमणला बुधवारी, ३ जूनला असलेला चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत. रायगडच्या श्रीवर्धन- हरिहरेश्वर किनारपट्टीला हे वादळ आदळेल, असा सध्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागांसह किनारपट्टी परिसरातील दुकाने, कारखाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अरबी समुद्रात मंगळवारी चक्रीवादळ तयार होण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त करताच जिल्हा प्रशासन सकाळपासूनच कामाला लागले. राज्याचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे-निंबाळकर यांनी किनारपट्टी भागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची सायंकाळी तातडीने व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली.

चक्रीवादळाचा सामना करताना घ्यायची खबरदारी आणि उपाय योजना याबाबत चर्चा झाली. बैठक उशिरापर्यंत सुरू होती. ही बैठक संपल्यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्स बोलवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे व पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनीही उपाययोजनांची माहिती दिली. वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोस्ट गार्ड, आयएमआरडी, राज्य आपत्कालीन यंत्रणेशी आपण सतत संपर्कात असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्यात येत असल्याचे निवासी जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी सांगितले.

रेशनिंग दुकाने बंदकिनारपट्टी भागात ३ जूनला रेशनिंग दुकाने व किरकोळ केरोसिन परवानाधारकांची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवशी अन्नधान्याचे वितरण होणार नाही.रायगडमध्ये हेल्पलाइन : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी आपत्कालीन प्रसंगी कोस्टल हेल्पलाइन क्र मांक १०९३ व पोलीस नियंत्रण कक्ष ७४४७७११११० वर अथवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी सांगितले.ठाणे, पालघरच्या ५७७ बोटी अद्यापही समुद्रातमासेमारी बंदी कालावधी सुरू झालेला असतानाही पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ५७७ मच्छीमार बोटी समुद्रात असल्याने कोस्टगार्डमार्फत त्यांना माघारी आणण्याचे काम सुरू झाले आहे.तारापूरचे कारखाने उद्या बंदतारापूर एमआयडीसीसह सर्व औद्योगिक कारखाने बुधवारी बंद ठेवण्याबाबत टीमा संघटनेशी बोलणे झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.मुंबईत पावसाची हजेरीमुंबई : सोमवारी पहाटे मुंबई शहरासह उपनगरात विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या मान्सूनपूर्व सरींमुळे वातावरणात दिवसभर गारवा निर्माण झाला. चेंबूर, कुर्ला, सायन अंधेरी, दादरसह दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम मुंबई अशा बहुतांश सर्वच ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पावसाने नंतर विश्रांती घेतली असली तरी मुंबई शहर आणि उपनगरावर दिवसभर ढग दाटून आले होते.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळcycloneचक्रीवादळ