शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

वारी निर्बंधमुक्त, मास्क सक्तीचा निर्णय नाही - राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 07:07 IST

Rajesh Tope : हा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला असून पॉझिटिव्हिटी रेट चिंताजनक असल्याचेही मंत्री टोपे यांनी सांगितले. दरम्यान, अद्याप मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुंबई : कोरोनाचे संकट असले तरी आवश्यक खबरदारी घेऊन यंदा वारी होईल, यात कोणतीच अडचण येणार नाही. योग्य ती काळजी घेऊन दिंडी पूर्ण करावी असा तत्त्वत: निर्णय झाल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली. सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला असून पॉझिटिव्हिटी रेट चिंताजनक असल्याचेही मंत्री टोपे यांनी सांगितले. दरम्यान, अद्याप मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर चर्चा झाली. यावेळी आरोग्य विभागाकडून कोविड संदर्भातील सादरीकरणही झाले. या बैठकीनंतर आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड, पालघर या सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला आहे.

काही ठिकाणचा पॉझिटिव्हिटी रेट ५ ते ८ टक्क्यांपर्यंत गेला आहे. ही आकडेवारी काळजी वाढवणारी आहे. या सर्व जिल्ह्यांमधील चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दर १०० चाचण्यांमागे ६ ते ८ टक्के पॉझिटिव्ह येत असले तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण चार टक्के आहे. यामध्ये गंभीर रुग्णांची संख्या नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही. पण या सहा जिल्ह्यांत कोरोना चाचण्या कठोरपणे वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारनेही दिल्या असे मंत्री टोपे यांनी सांगितले. 

राज्यात मास्कसक्तीचा निर्णय झालेला नाही. पण लोकांनी स्वत:हून मास्क घालावे. लोकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी मास्क घालावा. मास्क घातला नाही म्हणून कारवाई होणार नाही. दंड आकारला जाणार नाही. तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्यांनी बूस्टर डोस घ्यावेत. दुसऱ्या डोसनंतर नऊ महिने झाले असतील तर बूस्टर डोस घ्यायला हवा, असे टोपे म्हणाले. 

आषाढी वारीची तयारी पुढे गेलीपुढील महिन्यातील आषाढी वारीबाबत टोपे म्हणाले की, आता वारीची तयारी पुढे गेली आहे. यंदाची वारी होईल त्यात अडचण येणार नाही. वारीत लाखो वारकरी एकत्र येतात, त्यामुळे काळजी घेऊन वारी पूर्ण करावी लागेल, अशी चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली.

     कोरोनाचा नवा व्हेरिएंट अधिक संक्रामक असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे.      चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या अनेक सेलिब्रिटींना लागण झाली आहे. या मंडळींना बीए ४ व बीए ५ या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. तर, राजकीय क्षेत्रातील नेतेही कोरोना पाॅझिटिव्ह होत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत.      सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही ताप येत आहे. त्यांच्या चाचणीचा अहवाल अद्याप आला नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस