शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

सामान्यांच्या कोंडमाऱ्याला व्यंगचित्रातून वाट

By admin | Updated: May 5, 2016 06:29 IST

सामान्य माणसाच्या कोंडमाऱ्याला वाट करून देण्याचे माध्यम म्हणजे व्यंगचित्रे. अनेक हिंसाचार व्यंगचित्राच्या माध्यमातून टाळता येतात. व्यंगचित्र ही कला गेल्या काही वर्षांत अनवधानाने दुर्लक्षित राहिली

- मंगेश तेंडुलकरज्येष्ठ व्यंगचित्रकारसामान्य माणसाच्या कोंडमाऱ्याला वाट करून देण्याचे माध्यम म्हणजे व्यंगचित्रे. अनेक हिंसाचार व्यंगचित्राच्या माध्यमातून टाळता येतात. व्यंगचित्र ही कला गेल्या काही वर्षांत अनवधानाने दुर्लक्षित राहिली आहे. ही कला पत्रकारितेचाच एक भाग; मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात ‘व्यंगचित्र’ हा शब्दच नाही. पूर्वीचा काळ पाहिला, तर व्यंगचित्रे चितारताना एक वैचारिक मुक्तता होती. मात्र, आता चारही बाजूंनी व्यंगचित्रकारांवर दडपण आले आहे. पूर्वी समाजात राजकीय सहिष्णुता पाहायला मिळायची. संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष गुण्यागोविंदाने नांदायचे, हसत-खेळत व्यंगचित्रांना सामोरे जायचे. हे चित्र आता पाहायला मिळत नाही. राजकीय असहिष्णुतेमुळे समाजातील वातावरण ढवळून निघत आहे. सध्याच्या काळात सामाजिक, धार्मिक असहिष्णुतेने जोर धरला आहे. या दडपणाखाली व्यंगचित्र रेखाटायचे म्हटले, तर त्याचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा विचार व्यंगचित्रकाराला करावा लागतो. कोण जाणे, त्या व्यंगचित्राचा काय अर्थ काढला जाईल? इतकी विध्वंसक परिस्थिती उद्भवली आहे. ‘व्यंगचित्रातून परिस्थिती बिघडली तर, तीवर कोण नियंत्रण ठेवणार?’ असा विचार करावा लागतो. कलेच्या क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञानाने शिरकाव केला आहे. अ‍ॅनिमेशन हे त्याचेच एक रूप. व्यंगचित्रांत काही करू पाहताना झपाट्याने पैसे मिळविण्याचे साधन बनलेले अ‍ॅनिमेशन आकर्षित करते. नाव आणि प्रसिद्धीच्या भोवऱ्यात तरुण व्यंगचित्रकार गर्तेत जातो. अशा वेळी गरज असते ती पाठिंब्याची, प्रोत्साहनाची. सध्याच्या काळ हा अटीतटीच्या स्पर्धेचा आहे. या स्पर्धेत पुढे जाण्याऐवजी व्यंगचित्रकार जागच्या जागी राहिले, तर ते गोल-गोल फिरत राहतील आणि नुकसान त्यांच्याच पदरी पडेल. नवीन व्यंगचित्रकाराला लवकर प्रोत्साहन मिळत नाही. अशी परिस्थितीच कायम राहिली, तर व्यंगचित्र चितारणारे किती काळ तग धरू शकतील, हा प्रश्न आहेच. आजकाल संगणकारवर व्यंगचित्रे सहज तयार करता येतात. नेत्याचा फोटो स्कॅन केला, की त्यावर आधारित रेखाचित्र काढायचे. ज्यांना प्रत्यक्षात व्यंगचित्रे चितारता येत नाहीत, ते अशा माध्यमातून प्रसिद्धी मिळवू पाहतात. यामुळेच मूळ व्यंगचित्रकला लोप पावण्याची भीती अधिक गहिरी होत आहे. अशा पद्धतीने माणूसच माणसाची गरज संपवू पाहत असेल, तर तो किती काळ उभारी धरणार? कलेसमोर अनेक संकटे, आव्हाने आ वासून उभी आहेत. या आव्हानांना तोंड देऊन पुढे जाईल तोच टिकेल. आव्हाने असणे केव्हाही चांगलेच; त्यात स्वत:च्या कामावर श्रद्धा असलेले कलाकारच टिकतील. नवोदित व्यंगचित्रकार आव्हाने पेलू शकत नाहीत. त्यांना प्रवाहात आणणे ही वृत्तपत्रे आणि नियतकालिकांची जबाबदारी आहे. व्यंगचित्रे रेखाटणे म्हणजे कुणाचे चारित्र्यहनन नव्हे. आता व्यंगचित्र रेखाटणाऱ्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हादेखील दाखल होतो. त्याला देशाबद्दल आत्मीयता वाटली नसती, तर त्याने व्यंगचित्रेच रेखाटली नसती. सरकारप्रणीत दहशतवाद निर्माण करण्याचाच हा प्रयत्न. त्याचाच परिणाम या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात होत आहे. कलेला मोकळीक मिळाल्याशिवाय ती वृद्धिंगत कशी होणार? कारण, व्यंगचित्रकार कधीच स्वत:ची मते व्यक्त करीत नाही. सरकारदरबारी व्यंगचित्रकला दुर्लक्षित झाली आहे. पाठ्यपुस्तकांतूनही व्यंगचित्रे हद्दपार झाली आहेत. खिलाडू वृत्ती बाद होत आहे. व्यंगचित्रे राजकीय नेत्यांना नकोशी असतात. त्यामुळे व्यंगचित्रकारांचे पाय मागे खेचले जातात. सर्वसामान्यांनी या कलेचे महत्त्व समजून तिला पाठिंबा दिल्यास व्यंगचित्रे पुन्हा ताकदीने दिसू लागतील. कलेचे दरवाजे बंद झाले, तर नवीन कलाकार आत येणार तरी कसा? त्यामुळेच नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. चांगल्या हेतूने कलेची आराधना केल्यास ती नक्कीच प्रसन्न होईल आणि पुन्हा फुलू लागेल, असा विश्वास वाटतो.