शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

समृद्धी महामार्गासाठी मुद्रांक शुल्क माफ

By admin | Updated: June 30, 2017 01:26 IST

राज्याच्या गतिमान विकासासाठी होणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाला मुद्रांक शुल्क माफ करण्याचा

यदु जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याच्या गतिमान विकासासाठी होणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाला मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने गुरुवारी घेतला. आता सोमवारपासून या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनींची खरेदी शेतकऱ्यांकडून करण्यात येणार आहे. आजवर राज्यात कोणत्याही प्रकल्पाला दिला गेला नाही, एवढा आर्थिक मोबदला भूसंपादनासाठी देण्यात येणार आहे. पूर्व-पश्चिम अशा या महामार्गाला राज्य वा राष्ट्रीय महामार्ग ज्या ठिकाणी दक्षिण-उत्तर छेद देतात त्या ठिकाणी टाऊनशिप उभारण्यावर राज्य रस्ते विकास महामंडळाने भर दिला आहे. या महामार्गामध्ये २४ नवनगरांची (टाऊनशिप) उभारणी करण्यात येणार असून त्यातील १५ जागा आता निश्चित करण्यात आल्या आहेत. ही सर्व कृषी समृद्धी केंद्रे असतील. त्यांच्या उभारणीमुळे कृषी माल काही तासांत मुंबईच्या बंदरात आणि त्यानंतर जगाच्या बाजारपेठेत पोहोचू शकेल. या १५ टाऊनशिपसंदर्भातील अधिसूचना नगरविकास विभागाचे उपसचिव संजय सावजी यांनी काढली असून नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.या टाऊनशिपमध्ये लॅण्डपुलिंग फॉर्म्युलाने किंवा खासगी सहभागानेही उभारणी करता येईल. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील बीड नाकझरी, बोरी, खानापूर (अंशत: क्षेत्र), मानकापूर, नागाझरी, रामपूर (अंशत: क्षेत्र) आणि रेनकापूर ही गावे टाऊनशिपमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील सावरगाव माळ, निमखेड, गोळेगाव या गावांचा समावेश असेल. बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील गावंडळा, काबरा, साबरा, फैजलपूर आणि भूमुरा ही गावे मिळून टाऊनशिप बनेल. बाजूच्या जालना जिल्ह्यात जामवाडी, गुंडेवाडी आणि श्रीकृष्णनगर यांची एक टाऊनशिप बनणार आहे. ठाणे जिल्ह्यातील कासगाव, सापगाव, शेलवली आणि खुटघर मिळून टाऊनशिप उभारली जाईल. याच तालुक्यात मौजे फुगळे आणि मौजे वाशाळा यांची दुसरी तर मौजे हिव आणि मौजे रास यांची तिसरी टाऊनशिप होईल. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यामध्ये वडगाव बक्षी, हळदगाव, भानुसली व सावंगी गावांमिळून टाऊनशिप होणार आहे. इतर टाऊनशिप अशा - अमरावती जिल्हा : धामणगाव तालुक्यातील दत्तापूर, जळगाव आर्वी, नारगवंडी, आसेगाव. वाशिम जिल्हा - कारंजा तालुक्यातील शाहा, वाल्हाई, भिलखेडा. मालेगाव तालुक्यातील रिधोरा, सुकांदा, वारंगी, ब्राह्मणवाडा. मंगरूळपीर तालुक्यातील वानोजा, पर. औरंगाबाद जिल्हा - वैजापूर तालुक्यातील घायगाव, जांभरगाव. याच तालुक्यातील हडस पिंपळगाव, करंजगाव, लासूरगाव, शहजतपूर. बाबतार, लाख. अहमदनगर जिल्हा - कोपरगाव, राहाता तालुक्यातील सावळी विहीर, चांदे कासारे. यातील बऱ्याच गावांची अंशत: जमीन सदर टाऊनशिपसाठी वापरण्यात येणार आहे.