शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

प्रस्तावित १९ पूल मार्गी लागण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: May 24, 2014 01:08 IST

अकोला जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीच्या तुलनेत पुलांची वानवा जाणवत आहे.

अकोला : जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीच्या तुलनेत पुलांची वानवा जाणवत आहे. या पृष्ठभूमीवर प्रस्तावित १९ पुलांची कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची पार वाट लागली. खड्डेमय झालेल्या रस्त्यांवरून चालताना वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून, वाहतुकीलाही कमालीचा अडथळा निर्माण होत आहे. रस्ते समस्यांसोबतच जिल्ह्यात सध्या अस्तित्वात असलेल्या पुलांची संख्या तोकडी आहे. तसेच काही पुलांची दुरवस्था झाली आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात पूरपरिस्थितीच्या काळात जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याचे प्रसंग घडत असतात. तसेच या समस्येचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात पुलांची वानवा जाणवत असल्याने वाहतुकीची कोंडी होत असून, त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या नवीन पुलांची कामे मार्गी लागण्याची प्रतीक्षा केली जात आहे.** ३२ मोठे; २४२ लहान पूल!सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यात सध्या ३२ मोठे आणि २४२ लहान पूल आहेत. त्यामध्ये राज्य मार्गावर २८ मोठे आणि १४६ लहान पूल आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर ४ आणि लहान ९५ पूल आहेत. याशिवाय राज्य मार्गावर ८५९ रपटे असून, जिल्हा मार्गांवर ८४२ रपटे आहेत.

** गांधीग्राम व डाबकी  पुलाचा प्रश्न मार्गी ! अकोला-आकोट मार्गावरील गांधीग्राम पुलाची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात पूर्णेला पूर आल्यास या पुलावरून पाणी वाहत असते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांना हेलपाटे सहन करावे लागतात. त्यामुळे येथे नवीन पूल बांधण्याची गेल्या अनेक वर्षांची या भागातील नागरिकांची मागणी होती. अखेर गांधीग्रामच्या पुलासह पोचमार्गाच्या कामाला शासनामार्फत गेल्या ऑगस्टमध्ये मंजुरी प्राप्त झाली. पूल आणि रस्त्याच्या कामांसाठी २५ कोटी ६३ लाखांचा निधीदेखील मंजूर झाला. निविदा प्रक्रियेनंतर लवकरच या पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. तसेच केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत अकोला शहरानजीकच्या डाबकी रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी २५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या उड्डाण पुलाचे कामदेखील सुरू होणार आहे. त्यामुळे या दोन्ही पुलांचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.