शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

म्हाडा अर्जदारांना ‘रिफंड’ची प्रतीक्षा

By admin | Updated: June 30, 2014 01:35 IST

म्हाडाची यंदाची घराची सोडत होऊन 5 दिवसांचा अवधी उलटूनही अद्याप ‘रिफंड’बाबत काहीच हालचाल करण्यात आलेली नाही.

मुंबई : म्हाडाची यंदाची घराची सोडत होऊन 5 दिवसांचा अवधी उलटूनही अद्याप ‘रिफंड’बाबत काहीच हालचाल करण्यात आलेली नाही. रक्कम त्यांच्या खात्यावर कधी जमा होणार, याबाबत वेबसाइट किंवा अर्जदारांच्या ई-मेल, मोबाइलवर काहीही माहिती देण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे सुमारे 92 हजारांवर अयशस्वी अर्जदारांमध्ये चिंता लागून राहिली आहे. हक्काची रक्कम कधी मिळणार, याच्या प्रतीक्षेत असून त्याबाबत गेल्या वर्षीप्रमाणो मनस्ताप देऊ नये, अशी इच्छा त्यांच्यातून व्यक्त होत आहे. त्यांचे सुमारे तब्बल 227 कोटीे 19 लाख रुपये परत करावयाचे आहेत. विजेत्यांचे 6 कोटी 8क् लाख म्हाडाकडे राहणार आहेत.  
म्हाडाने मुंबई व विरार-बोळीज आणि वेंगुल्र्यामध्ये बांधलेल्या 2641 सदनिकांची गेल्या बुधवारी संगणकीय सोडत काढण्यात आली. त्यातील विजेत्यांना आनंद गगनात मावेना झाला आहे. मात्र, अयशस्वी ठरलेल्यांमध्ये नाराजी असून फॉर्मसोबत भरलेली रक्कम त्वरित मिळण्यासाठी प्रय}शील आहेत. सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार लॉटरीसाठी इच्छुक असलेल्या 93 हजार 13क् जणांकडून सुमारे 234 कोटींवर अनामत रक्कम मिळाली आहे. त्यापैकी विजेत्या ठरलेल्यांची रक्कम जवळपास 6 कोटी 8क् लाख 82,5क्क् आहे. ती वगळता 227 कोटी 19 लाख 17,5क्क् रुपये संबंधित अर्जदारांच्या बॅँक खात्यांवर परत करावयाचे आहेत. हा व्यवहार अॅक्सिस बॅँकेमार्फत करण्यात आला असून 26 जूनला सोडतीनंतर बॅँकेला विजेत्यांची नावे कळविण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त  उर्वरित  अर्जदारांनी त्यांनी फार्ममध्ये नमूद केलेल्या बॅँक खात्यावर रक्कम जमा करावयाची सूचना केली असली तरी त्यासाठी कालमर्यादा निश्चित केलेली नाही. 
गेल्या वर्षी झालेल्या सोडतीमध्ये ‘रिफंड’बाबत अधिका:यांच्या सावळ्या गोंधळामुळे व तांत्रिक चुकीमुळे 5क् हजारांवर अर्जदारांना मनस्ताप सहन करावा लागला होता. काहीही चूक नसताना त्यांना विलंबाने रक्कम मिळाली़ काही जणांच्या खात्यावर दोन-दोन वेळा रक्कम जमा करण्याचा ‘प्रताप’ अॅक्सिस बॅँकेकडून झाला होता. त्यातून जवळपास 17 लाख रुपये म्हाडाला परत मिळाले नाहीत. मात्र, स्वत:ची चूक असल्याने म्हाडाने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असे तत्त्व बाळगून हा खर्च सोसला.
या वेळी असा प्रकार घडू नये, यासाठी योग्य दक्षता घेण्यात आली असली तरी डिपॉङिाट खात्यावर जमा होईर्पयत नागरिकांचे समाधान होणार नाही. अयशस्वी अर्जदारांना ‘रिफंड’च्या मुदतीबाबत मुंबई मंडळाच्या पणन विभागाच्या उपमुख्याधिकारी अपर्णा सोमाणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाइल उचलला नाही. त्याबाबत मेसेज केला असता त्याला प्रतिसाद दिला नाही.  (प्रतिनिधी)
 
 मुंबई मंडळाकडून गेल्या वर्षी 31 मे रोजी झालेल्या सोडतीमधील अयशस्वी अर्जदारांचे डिपॉङिाट परत करण्यामध्ये म्हाडा व अॅक्सिस बॅँकेने मोठा घोळ केला होता, त्यामुळे नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळण्यास महिना, दीड महिन्याचा अवधी लागला. त्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने या वेळी विशेष खबरदारी घेतली असली तरी रक्कम त्यांच्या बॅँक खात्यामध्ये जमा करण्याबाबत ठोस कालावधी जाहीर केलेला नाही.