शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

म्हाडा अर्जदारांना ‘रिफंड’ची प्रतीक्षा

By admin | Updated: June 30, 2014 01:35 IST

म्हाडाची यंदाची घराची सोडत होऊन 5 दिवसांचा अवधी उलटूनही अद्याप ‘रिफंड’बाबत काहीच हालचाल करण्यात आलेली नाही.

मुंबई : म्हाडाची यंदाची घराची सोडत होऊन 5 दिवसांचा अवधी उलटूनही अद्याप ‘रिफंड’बाबत काहीच हालचाल करण्यात आलेली नाही. रक्कम त्यांच्या खात्यावर कधी जमा होणार, याबाबत वेबसाइट किंवा अर्जदारांच्या ई-मेल, मोबाइलवर काहीही माहिती देण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे सुमारे 92 हजारांवर अयशस्वी अर्जदारांमध्ये चिंता लागून राहिली आहे. हक्काची रक्कम कधी मिळणार, याच्या प्रतीक्षेत असून त्याबाबत गेल्या वर्षीप्रमाणो मनस्ताप देऊ नये, अशी इच्छा त्यांच्यातून व्यक्त होत आहे. त्यांचे सुमारे तब्बल 227 कोटीे 19 लाख रुपये परत करावयाचे आहेत. विजेत्यांचे 6 कोटी 8क् लाख म्हाडाकडे राहणार आहेत.  
म्हाडाने मुंबई व विरार-बोळीज आणि वेंगुल्र्यामध्ये बांधलेल्या 2641 सदनिकांची गेल्या बुधवारी संगणकीय सोडत काढण्यात आली. त्यातील विजेत्यांना आनंद गगनात मावेना झाला आहे. मात्र, अयशस्वी ठरलेल्यांमध्ये नाराजी असून फॉर्मसोबत भरलेली रक्कम त्वरित मिळण्यासाठी प्रय}शील आहेत. सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार लॉटरीसाठी इच्छुक असलेल्या 93 हजार 13क् जणांकडून सुमारे 234 कोटींवर अनामत रक्कम मिळाली आहे. त्यापैकी विजेत्या ठरलेल्यांची रक्कम जवळपास 6 कोटी 8क् लाख 82,5क्क् आहे. ती वगळता 227 कोटी 19 लाख 17,5क्क् रुपये संबंधित अर्जदारांच्या बॅँक खात्यांवर परत करावयाचे आहेत. हा व्यवहार अॅक्सिस बॅँकेमार्फत करण्यात आला असून 26 जूनला सोडतीनंतर बॅँकेला विजेत्यांची नावे कळविण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त  उर्वरित  अर्जदारांनी त्यांनी फार्ममध्ये नमूद केलेल्या बॅँक खात्यावर रक्कम जमा करावयाची सूचना केली असली तरी त्यासाठी कालमर्यादा निश्चित केलेली नाही. 
गेल्या वर्षी झालेल्या सोडतीमध्ये ‘रिफंड’बाबत अधिका:यांच्या सावळ्या गोंधळामुळे व तांत्रिक चुकीमुळे 5क् हजारांवर अर्जदारांना मनस्ताप सहन करावा लागला होता. काहीही चूक नसताना त्यांना विलंबाने रक्कम मिळाली़ काही जणांच्या खात्यावर दोन-दोन वेळा रक्कम जमा करण्याचा ‘प्रताप’ अॅक्सिस बॅँकेकडून झाला होता. त्यातून जवळपास 17 लाख रुपये म्हाडाला परत मिळाले नाहीत. मात्र, स्वत:ची चूक असल्याने म्हाडाने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असे तत्त्व बाळगून हा खर्च सोसला.
या वेळी असा प्रकार घडू नये, यासाठी योग्य दक्षता घेण्यात आली असली तरी डिपॉङिाट खात्यावर जमा होईर्पयत नागरिकांचे समाधान होणार नाही. अयशस्वी अर्जदारांना ‘रिफंड’च्या मुदतीबाबत मुंबई मंडळाच्या पणन विभागाच्या उपमुख्याधिकारी अपर्णा सोमाणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाइल उचलला नाही. त्याबाबत मेसेज केला असता त्याला प्रतिसाद दिला नाही.  (प्रतिनिधी)
 
 मुंबई मंडळाकडून गेल्या वर्षी 31 मे रोजी झालेल्या सोडतीमधील अयशस्वी अर्जदारांचे डिपॉङिाट परत करण्यामध्ये म्हाडा व अॅक्सिस बॅँकेने मोठा घोळ केला होता, त्यामुळे नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळण्यास महिना, दीड महिन्याचा अवधी लागला. त्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने या वेळी विशेष खबरदारी घेतली असली तरी रक्कम त्यांच्या बॅँक खात्यामध्ये जमा करण्याबाबत ठोस कालावधी जाहीर केलेला नाही.