शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

धरणांना प्रतीक्षा पावसाची

By admin | Updated: June 27, 2016 01:16 IST

पावसाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी अद्यापही दमदार पावसाला सुरुवात झाली नाही.

घोडेगाव : पावसाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी अद्यापही दमदार पावसाला सुरुवात झाली नाही. यामुळे जिल्ह्यातील धरणे रिकामी असून, त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. कुकडी प्रकल्पातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे या प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा राहिला आहे. येत्या काळात चांगला पाऊस न झाल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांना आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. आंबेगाव, जुन्नर, शिरूरबरोबरच सोलापूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतील शेती सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या कुकडी प्रकल्पातील सहा धरणांपैकी चार धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे, तर एकूण ०.४६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी ८.७२ टक्के पाणी होते. तसेच पाऊस चांगला सुरू झाला होता. मात्र, या वर्षी अवघा १७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील १० दिवसांत पाऊस न झाल्यास आणीबाणीची स्थिती निर्माण होऊ शकते. कुकडी प्रकल्पात येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगा, डिंभे, चिल्हेवाडी ही सहा धरणे येतात. यातील माणिकडोह, पिंपळगाव जोगा, डिंभे, चिल्हेवाडी या चार धरणांमध्ये सध्या शून्य टक्के पाणीसाठा आहे. या वर्षी पाऊस कमी पडल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पुरेसे पाणी मिळाले नाही. कुकडी प्रकल्पात कुकडी, मीना, घोड, मांडवी नद्यांवर धरणे बांधण्यात आली आहेत. सध्या या नद्या पूर्ण कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे नदीवर अवलंबून असलेला शेतकरी व पाणी योजना अडचणीत सापडल्या आहेत. मंचरसारख्या मोठ्या गावातही आज पाणीटंचाई निर्माण झाली आहे. (वार्ताहर)चासकमान धरणात ६ टक्के पाणीसाठाचासकमान : चासकमान धरणात पावसाअभावी पाणीसाठा ‘जैसे थे’ स्थितीत आहे. धरणात ६.२७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.चासकमान धरण पाणलोट क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवली असून, १ जूनपासून आत्तापर्यंत धरणक्षेत्रात २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत पावसाची नोंदच झाली नाही. सध्या धरणात धरणात ६.२७टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाचा पश्चिम भाग हा पावसाचे आगार म्हणून ओळखला जात असला, तरी या भागातील भात उत्पादक शेतकरी पावसाअभावी चिंताग्रस्त झाला आहे. सर्वांच्या नजरा फक्त पावसाकडे लागल्या आहेत.(वार्ताहर)>आंबेठाण : दोन दिवसांपासून भामा-आसखेड धरण परिसरात पडत असलेला पाऊस आज सकाळपासून मात्र उघडला होता. परंतु सायंकाळी चारनंतर मात्र तो पुन्हा पडू लागल्याने खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील बळीराजा सुखावला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात किंचितही वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. भामा-आसखेड धरण हे ८.१४ टीएमसी क्षमतेचे आहे. एक जूनपासून धरण क्षेत्रात ३२ मिली पाऊस पडला असून, त्याचा धरणाच्या पाणीसाठ्यावर मात्र किंचितही परिणाम झाला नसून, पाणीसाठा आहे तितकाच आहे. धरणात सध्या जवळपास १.५ टीएमसी पाणीसाठा आहे. तो १८.६३ टक्के इतका आहे.>इंदापूर : पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणात सद्य:स्थितीत केवळ वजा २८.१८ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी आतापर्यंत धरण क्षेत्रात १६६ मिमी पाऊस झाला आहे. इंदापूर तालुक्यात सरासरी पाऊस ३४ टक्के झाला आहे. पुण्यात चांगला पाऊस झाला, तरच उजनीतील पाणी वाढेल. >धरणातील पाणी पातळी (४८५.९२२/ १२०.९६ मीटर), एकूण साठा -(३५. ४७ दशलक्ष घनमीटर, उपयुक्त पाणीसाठा -(वजा ७९८.०९/ वजा २८.१८), टक्केवारी -(वजा ५२. ६० टक्के), बाष्पीभवन ३.८० मिमी