शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

गौरी लंकेश यांच्या हत्येविरोधात कलाकारांचा आवाज, म्हणाले मुर्दाडपणे जगण्यापेक्षा बोलायलाच हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 16:06 IST

‘सात नसेल पण निदान एका गोळीची तरी मी तयारी ठेवायला हवी नं ?’, ‘बोलल्याने हत्या होणार असेल आणि न बोलता मुर्दाड जिणं जगायचं असेल तर मला बोलायलाच हवं’, ‘अज्ञातांकडून आणखी एका पुरोगामी आवाजाचा अंत’ अशा स्वरुपात कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करुन संतापाला वाट करुन दिली आहे.

- प्रज्ञा केळकर-सिंग पुणे, दि. ७ - ‘सात नसेल पण निदान एका गोळीची तरी मी तयारी ठेवायला हवी नं ?’, ‘बोलल्याने हत्या होणार असेल आणि न बोलता मुर्दाड जिणं जगायचं असेल तर मला बोलायलाच हवं’, ‘अज्ञातांकडून आणखी एका पुरोगामी आवाजाचा अंत’ अशा स्वरुपात कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करुन संतापाला वाट करुन दिली आहे. गौरी लंकेश यांची हत्या ही दुर्देवी आणि संतापजनक घटना असून, समाज कोणत्या दिशेने चालला आहे, याबाबत कलाकारांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.     कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका गौरी लंकेश यांची मंगळवारी राहत्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी सात गोळया झाडून हत्या केली. पुरोगामी विचारांच्या पुरस्कर्त्या म्हणून गौरी लंकेश यांची ओळख आहे. प्रस्थापितांना लेखणीतून झोडपण्याचा त्यांचा प्रयत्न आणि आवाज यानिमित्ताने दाबण्यात आला आणि सोशल मिडियावर निषेधाची लाट उसळली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यानंतर लंकेश यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याने सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्र्रिया उमटत आहेत. कलाकारांनीही याविरोधात बंड पुकारले असून सोशल मिडियावरुन त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. विवेकाला विवेकाने उत्तर न देता बंदुकीचा वापर करणा-यांचा निषेध नोंदवला जात असून, त्यांचे लेखन थांबले तरी त्यांचे विचार थांबणार नाहीत, हे सत्र आपण किती दिवस सहन करणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.      अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी ‘तुम्ही माझ्या पोस्ट्स, लेख वाचता. सात नसेल पण निदान एका गोळीची तरी मी तयारी ठेवायला हवी नं ?  मला वाटतं हो, ठेवायला हवी. ब-याच जणांनी तशी तयारी ठेवायला हवी असं दिसतंय...’ अशा शब्दांत लंकेश यांच्या हत्येबाबत फेसबूक अकाऊंटवर मराठी आणि इंग्रजीत तीव्र आक्षेप नोंदवला आहे. स्वत:चे विचार परखडपणे मांडणा-यांचा जीव आता सुरक्षित नाही, त्यांची जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, तरी आपण बोलत रहायला हवे, या विचारांना अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. शेकडो जणांनी ही पोस्ट शेअर केली असून, ८००-९०० जणांनी याबाबत निर्भिडपणे आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.     अभिनेता जितेंद्र जोशीने ‘मी एफबी आणि टिवटर बंद केलं होतं. कारण भाषावाद, प्रांतवाद आणि हिंदी/मराठी भाषेविषयी जातीविषयी आपापली टोकाची मतं लोक व्यक्त करताना पाहात होतो. परंतु काल आणखी एक गोळी झाड़ली गेली आणि विचार संपवण्याचा पुन्हा प्रयत्न झाला. मला बोललं पाहिजे. कारण बोलल्याने हत्या होणार असेल आणि न बोलता मुर्दाड जीणं जगायचं असेल तर मला बोलायलाच हवं . निदान काही लोकांनी तरी. सहमत असाल तर हे पोहोचू दया अन्यथा शिव्या शाप आहेतच लोकांकडे’, अशा स्वरुपात भावना व्यक्त करत अतुल कुलकर्णी यांची पोस्टही शेअर केली आहे. जितेंद्रने ‘इतनी आवाजें अनगिनत इच्छाएँ, पल पल का बैर घड़ी घड़ी का बखेड़ा’ ही स्वलिखित कविता फेसबूक अकाऊंटवर शेअर करत समाजातील सद्यस्थितीचे समर्पक वर्णन केले आहे. अभिनेत्री रेणुका शहा यांनीही ‘आणखी एका पुरोगामी आवाजाचा अज्ञातांकडून अंत’ अशा शब्दांत फेसबूकवर संताप व्यक्त केला आहे. गौरी लंकेश यांच्या आत्म्यास शांती लाभो! दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची हत्या कोणी केली? आपल्याला कधी तरी हे कळणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरण