शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विठू पावला चंद्रभागेतीरी तंबूंना मुभा

By admin | Updated: July 22, 2015 01:57 IST

नदी प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्या, असे सांगत उच्च न्यायालयाने पंढरपूरमध्ये चंद्रभागेतीरी तंबू उभारण्यास मंगळवारी सशर्त परवानगी दिली

मुंबई : नदी प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्या, असे सांगत उच्च न्यायालयाने पंढरपूरमध्ये चंद्रभागेतीरी तंबू उभारण्यास मंगळवारी सशर्त परवानगी दिली. त्यामुळे यंदाच्या आषाढीसाठी अपेक्षित असलेल्या सुमारे १४ लाख वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाने ही परवानगी दिली. चंद्रभागेतीरी तंबू ठोकण्यास न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने बंदी घातली होती. त्यानुसार शासनाने येथून १ किमी अंतरावर ६५ एकर भूखंडावर वारकऱ्यांना तंबू उभारून पूजा करता येईल, अशी व्यवस्था केली. मात्र विठोबाचे दर्शन घेतल्यानंतर वाळवंटात पूजा करण्याची प्रथा आहे. आता पावसाळा सुरू आहे. त्यामुळे तंबू न उभारता पूजा करताना पाऊस आल्यास आमची तारांबळ उडेल. पाऊस पडला नाही तरी तंबूशिवाय भर उन्हात पूजा करणे अशक्य आहे. तेव्हा वाळवंटात तंबू उभारण्यास परवानगी द्यावी असे निवेदन वारकऱ्यांनी सोलापूर व पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्याची दखल घेत ही बंदी तात्पुरती उठवण्यासाठी राज्य शासनाने मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्याणी यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला. त्यावर आदेश देत न्यायालयाने आधीचा बंदीहुकूम काहीसा शिथिल केला. न्यायालयाने तंबू उभारण्यास मनाई केल्याने वारकऱ्यांची गैरसोय होत आहे; आणि ऐनवेळी लाखांच्या संख्येत असलेल्या वारकऱ्यांना रोखणे शक्य नाही. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. तसेच ७०० वर्षांची परंपरा तत्काळ थांबवणे शक्य नाही. यासाठी शासन जनजागृती करत आहे व पुढे करेल आणि चंद्रभागेतीरी तंबू लागणार नाहीत, याची काळजी घेईल. त्यामुळे यंदाच्या वर्षी २६ ते २९ जुलैपर्यंत येथे तंबू ठोकण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सरकारने अर्जात केली. महत्त्वाचे म्हणजे नदीपात्रात काही खाणार नाही व तेथे घाण करणार नाही, याची हमी आम्ही वारकऱ्यांकडून घेऊ, असेही शासनाने अर्जात नमूद केले. न्यायालयीन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, आषाढी, चैत्री, माघी आणि कार्तिकी या यात्रांसाठी चंद्रभागा नदीच्या पात्रात प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. धार्मिक प्रयोजनार्थ जसे की, भजन, कीर्तन, जागर आणि प्रवचन यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी निश्चित करतील, अशा वर्षातील एकूण २० दिवसांसाठी राहुट्या, तंबू उभारण्यास सवलत दिली आहे. जेणेकरून राज्यातील वारकरी संप्रदायाच्या परंपरा जतन करता येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)