शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

जायफळापासून वेदनाशामक औषधाची निर्मिती

By admin | Updated: October 4, 2016 08:50 IST

इगतपुरी तालुक्यातील प्राचार्य डॉ. योगेश उशीर आणि डॉ. सुदर्शन सिंग यांनी जायफळापासून वेदनाशामक औषधाची निर्मिती केली आहे.

लक्ष्मण सोनवणे, ऑनलाइन लोकमत

बेलगाव कुऱ्हे (नाशिक), दि. ४ -  मनुष्य जन्माला येतो तेव्हापासून अनेक छोट्या मोठ्या आजारांचा प्रतिकार त्याला करावा लागतो. त्यातच काही भयानक आजारांवर गोरगरिबांना आर्थिक झळ ही अजिबात परवडणारी नसते. गरीब रुग्णांमध्ये ईश्वराचे अस्तित्व समजणाऱ्या एका प्राचार्यांना आरोग्यवर्धक जायफळापासून एका विशेष संशोधनातून वेदनाशामक औषधाची निर्मिती करण्यास मोठे यश मिळाले आहे.इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील एसएमबीटी डी फार्मसी सेवाभावी ट्रस्टमधील प्राचार्य डॉ. योगेश विष्णुपंत उशीर आणि डॉ. सुदर्शन सिंग यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टरकीचे शिक्षण देताना फावल्या वेळात त्यांनी ‘टॉपिकल जेल फॉर्म्युलेशन आॅफ टायमेटिन’ या विषयावर पेटंटची नोंदणी करून दोन वर्षांच्या अथक परिश्रमातून वेदनाशामक या परिपूर्ण औषधाची यशस्वीरीत्या निर्मिती केली आहे. त्यांनी शोधलेले टायमेटीनचे मलम हे औषध अनेक आजारांवर रामबाण व गुणकारी ठरले आहे. या महत्त्वाच्या औषधाची सहज उपलब्धता, सोपी निर्मितीपद्धती आणि वापरण्यास सोईस्कर असल्याने आरोग्यक्षेत्रातील विविध थरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.डॉ. उशीर व डॉ. सिंग औषधनिर्माण क्षेत्रात अनेक वर्षांपासून संशोधन करत आहेत. या संशोधनात त्यांना असे आढळून आले की, दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या आणि निसर्गातून सहज उपलब्ध होणाऱ्या जायफळात ‘टायमेटिन’ हा घटक आहे आणि तो शरीरातील वेदना, चमक तसेच सुजही कमी करतो. जायफळातील टायमेटीन विलग करून त्याचे जेल फॉर्म्युलेशन अर्थात मलम बनविल्याने रु ग्णांना सहजतेने वापरता येऊ शकते आणि कमीत कमी दरात सर्वसामान्यांना उपलब्धही होऊ शकते. या त्यांच्या रु ग्णांप्रति आत्मीयतेतून त्यांनी पुढील तपासणी केली. संशोधनात्मक तपासणीनंतर सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यांनी विलग केलेले टायमेटिन जलद गतीने त्वचेद्वारे रक्तात प्रवेश करते आणि लवकरात लवकर शरीरातील चमक किंवा वेदना शमवते. तसेच शरीरावरील सुजही कमी करते. या औषधाचे शरीरावर घातक परिणाम होत नाहीत, असे निकष त्यांनी केलेल्या विस्तारपूर्वक संशोधनातून समोर आले आहेत. दि. २० जून २०१६ रोजी भारतीय पेटंट कार्यालयात नोंद केलेल्या या शोधाचा पेटंट क्र मांक आयएन 201621021529/ एमयूएम असा आहे. तालुक्यातील धामणगाव येथील एसएमबीटी इन्स्टिट्यूट आॅफ डी फार्मसीमधून केलेले हे संशोधन व पहिले यशस्वी पेटंट अनेक रु ग्णांसाठी वरदान ठरले आहे. सदर विषयावर त्यांचे गेल्या दोन वर्षापासून निरंतर संशोधन सुरू होते. आगळ्यावेगळ्या जायफळाच्या वेदनाशामक औषध निर्मितीमुळे आर्थिक दुर्बल घटकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या संशोधनाला जिद्द व आत्मविश्वासाने अखेर अथक परिश्रमातून त्यांच्या मेहनतीला फळ मिळाले आहे.

औषधनिर्माणशास्त्रज्ञ म्हणून सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करणे ही मी माझी नैतिक जबाबदारी मानतो. येत्या काळात भयानक आजारांपासून रु ग्णांना वाचविण्यासाठी सोईस्कर तसेच अधिक गुणकारी औषधे कशी बनवता येतील यावर पुढील संशोधनात आमचा भर असेल जेणेकरून सर्व थरांतील रु ग्णांना मदत व्हावी. -डॉ. योगेश उशीर, प्राचार्य