शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

परीक्षेवर भरारी पथकाची नजर

By admin | Updated: February 28, 2017 02:37 IST

महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे

प्राची सोनवणे,नवी मुंबई- महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. ठाणे, मुंबई, रायगड विभागातील ५५७ केंद्रांवर ३ लाख ४० हजार ४०८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. नियोजित परीक्षा केंद्रांवर कसलाही गैरप्रकार घडू नये, याकरिता दक्षता समितीसह भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, तसेच निरंतर शिक्षणाधिकारी आणि बोर्डाच्या पथकाचा समावेश करण्यात आला आहे.मंगळवारी ११ ते २ या वेळेत इंग्रजीचा पहिला पेपर होणार आहे. परीक्षा कालावधीत कोणताही गैरप्रकार घडू नये याकरिता प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तसेच परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी देखील बोर्डाचे कामकाज सुरू असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. रविवारी पोलीस संरक्षणासह १४ गाड्यांमधून ठाणे, पालघर, रायगड केंद्रावर परीक्षेचे गोपनीय साहित्य पोहोचविण्यात आले तर सोमवारी १३ गाड्यांमधून मुंबई विभागातील सर्व केंद्रावर साहित्य सुरक्षितरीत्या पोहोचविण्यात आले. यावेळी केंद्रसंचालक तसेच परीरक्षकांना परीक्षा नियमांचे पालन, घ्यावयाची काळजी याविषयी सूचना करण्यात आल्या. परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकांशिवाय कोणालाही मोबाइलचा वापर करता येणार नसून, मोबाइल जमा करावे लागतील.>आसनव्यवस्थेची खात्री करागतवर्षीच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडल्याने परीक्षा केंद्र आणि विद्यार्थी संख्येचे गणित अचूक जमविणे अडचणीचे ठरले. विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत व्हावी यादृष्टीने नजीकचे केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र काही केंद्रावर पुरेशी आसन व्यवस्था नसल्याने शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने शेजारील इमारतीमध्ये विद्यार्थ्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली. विद्यार्थी तसेच पालकांनी गोंधळून न जाता वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सहसचिव सुभाष बोरसे यांनी केली आहे. शेजारील इमारतीत बैठक व्यवस्था करण्यात आलेल्या केंद्रांना फलक लावण्याच्या सूचना करण्यात आल्याचेही बोरसे यांनी सांगितले.<शेवटच्या क्षणी ७१ अर्जगेल्या वर्षी परीक्षेत अयशस्वी ठरलेल्या, विषय न सुटलेल्या विद्यार्थ्यांना आदल्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली होती. या संधीचा लाभ घेत ७३६ विद्यार्थ्यांनी दंडात्मक रक्कम भरून मुदतीनंतर अर्ज भरल्याची माहिती राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये रिपिटर्स, श्रेणीसुधार तसेच तुरळक विषय घेऊन बसलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असणार असून अतिविलंब, अतिविशेष, परीक्षा फी वसूल करून परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली असून या विद्यार्थ्यांना त्वरित हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले.