शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

राष्ट्रवादीत बदलाचे वारे..

By admin | Published: August 10, 2014 2:17 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षपद आता खारिज करण्यात येणार असून, प्रत्येक महसूल विभागासाठी एक याप्रमाणो प्रभारी नेमण्यात येणार आहेत.

यदु जोशी - मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षपद आता खारिज करण्यात येणार असून, प्रत्येक महसूल विभागासाठी एक याप्रमाणो प्रभारी नेमण्यात येणार आहेत. पक्षाच्या प्रत्येक आघाडीला (सेल) अध्यक्ष असेल पण सेल आणि पक्ष यांच्यात समन्वयाची जबाबदारी एका पदाधिका:यांकडे दिली जाईल. 
पक्षाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा येत्या दोन दिवसांत होणार आहे. कार्यकारिणीच्या स्वरूपाबद्दल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी  ‘लोकमत’ला माहिती दिली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गळती लागू नये म्हणून ठिकठिकाणची नाराजी दूर करण्याची जबाबदारी प्रमुख सहा नेत्यांना देण्यात आली असल्याचे ते म्हणाले. 
केसरकर संपर्कात
उद्योगमंत्री नारायण राणो यांच्याविरुद्ध बंडाचे निशाण फडकविल्याने आमदार दीपक केसरकर यांना राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात आले होते. केसरकर यांचे निलंबन मागे घेतले जाईल, असे संकेत तटकरे यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मला ते भेटून गेले. लवकरच त्यांच्याविषयी निर्णय घेऊ, असे तटकरे म्हणाले. 
काँग्रेसने कारवाई केली का?
काँग्रेसच्या विरोधात बंड केलेल्यांना पुन्हा जवळ करण्याचा अर्थ त्यांच्या बंडखोरीला राष्ट्रवादीचे अप्रत्यक्ष समर्थन होते, असा होत नाही का, या प्रश्नात तटकरे म्हणाले की, काँग्रेसने आमच्या उमेदवारांविरुद्ध बंड केलेल्यांवर कारवाईदेखील केली नाही. त्यांच्या उमेदवारांविरुद्ध त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी कारवाया केल्या पण त्यांच्यावरही कारवाई झाली नाही. त्यांचे विजय सावंत, रामप्रसाद बोर्डीकर यांना त्यांनी धक्काही लावला नाही. आम्ही विजयकुमार गावितांना मंत्रिपदावरून हटविले. केसरकरांना कारणो दाखवा नोटीस बजावली. काँग्रेसने काहीच केले नाही, असा टोला तटकरे यांनी हाणला. विदर्भात पाच जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादीची भाजपासोबत असलेली अभद्र 
युती तोडण्याचा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत अनेकदा 
होऊनही त्याची अंमलबजावणी 
होत नाही, याकडे लक्ष वेधले 
असता तटकरे म्हणाले की, 
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक तातडीने घेण्याविषयीचे पत्र मी उद्या मुख्यमंत्र्यांना देणार आहे. या बैठकीत सदर मुद्दय़ावर चर्चा करू. 
 
च्राष्ट्रवादीच्या सर्व 62 आमदारांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देणार का, या प्रश्नात तटकरे म्हणाले की, ‘सिटिंग-गेटिंग’ फॉम्यरुला राहील, असे ठरलेले नाही. त्यातील काही जागांवर नवे चेहरे दिले जातील. पक्षाचे काही नेते पक्षाबाहेर आपापल्या संघटना चालवितात. त्याचा पक्षाला फायदा होतो आणि तोटाही. या संघटनांबाबत पक्षाचा धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
च्राष्ट्रवादीतून मोठय़ा प्रमाणात नेते, कार्यकर्ते भाजपा-शिवसेनेत जात असल्याचे चित्र निर्माण केले जात असले तरी ते खरे नाही. काही लोक जात आहेत पण त्यांचा लवकरच भ्रमनिरास होईल. येत्या काही दिवसांत चक्र उलटे फिरेल आणि भाजपा, शिवसेनेचे नेते राष्ट्रवादीत येत असल्याचे पाहायला मिळेल, असा दावा तटकरे यांनी केला.