शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

हवाई वाहतुकीच्या ‘व्हिजन २०४०’ची आज होणार घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 06:04 IST

सुरेश प्रभू यांची माहिती : उडान योजना आंतरराष्ट्रीय स्तरावर राबविणार

मुंबई : भारतातील हवाई वाहतूक क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. या विस्तारणाऱ्या क्षेत्रातील सर्व संबंधितांना एका व्यासपीठावर आणून याबाबत चर्चा करण्यासाठी ग्लोबल एव्हिएशन समिटचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवारी त्याला प्रारंभ होईल. या वेळी हवाई वाहतूक क्षेत्राचा आढावा घेऊन, ‘व्हिजन २०४०’ची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

‘उडान’ योजना आंतरराष्ट्रीय स्तरावर राबविण्याबाबत चर्चा सुरू असून, लवकरच ही योजना आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू करण्याचे सुतोवाच प्रभू यांनी केले.

या परिषदेत जगातील ८६ देशांचे हवाई वाहतूक क्षेत्रातील विविध घटकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, अशा प्रकारची ही जगातील पहिलीच परिषद असल्याचा दावा त्यांनी केला. भारताला एव्हिएशन हब बनविण्यासाठी धोरण या वेळी जाहीर करण्यात येईल. त्याशिवाय हवाई मालवाहतुकीचे धोरणदेखील जाहीर करण्यात येईल. ‘उडान’ योजनेद्वारे राबविण्यात आलेल्या उपायांची व त्याला मिळालेल्या प्रतिसाद जनतेसमोर ठेवण्यात येणार आहे. देशात तेथे अद्याप विमानसेवा सुरू झालेली नाही, त्या ठिकाणी ही सेवा सुरू करण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याची माहिती प्रभू यांनी दिली. या वेळी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव चौबे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे उपस्थित होते.रत्नागिरी-सिंधुदुर्ग ‘उडान’मध्ये समाविष्टबोइंगच्या अहवालानुसार भारताला दरवर्षी २,३०० विमानांची गरज भासणार आहे. त्यामुळे त्यांची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी भारतातच सुविधा व तंत्रज्ञ उपलब्ध होण्याची गरज आहे. एव्हिएशन क्षेत्राच्या विविध कररचनेबाबत केंद्रीय अर्थमंत्रालयासोबत चर्चा सुरू असून, त्यांच्या सहकार्याने प्रश्न सोडविले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापुढील काळात विमानतळांचा विकास राज्य व केंद्र सरकार संयुक्तपणे करणार आहे. विमान प्रवासाची क्षमता व्यापक करण्यात येईल, ज्या ठिकाणी विमानतळ नसेल. मात्र, समुद्र असेल त्या ठिकाणी समुद्री विमानाच्या माध्यमातून विमान प्रवासाची सुविधा पुरविण्यात येईल. रत्नागिरी व सिंधुदुर्ग विमानतळाला लवकरच ‘उडान’मध्ये समाविष्ट करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.

टॅग्स :airplaneविमानSuresh Prabhuसुरेश प्रभू