शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विश्वनाथ घाणेगावकरचा हेका..."वोटकर" चा धर ठेका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 17:29 IST

पुण्यात शिक्षण घेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील विश्वनाथ घाणेगावकर आणि त्याच्या टीमने तयार केलेला "किसी को भी कर पर वोट कर" हे रॅप साँग सोशल मिडियावर वायरल होत आहे. "वोट से बदल कल" असे सांगताना मतपेटीतून तुम्ही भविष्य घडवू शकता, असा संदेश यातून देण्यात आला आहे.  तसेच मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.

मुंबई – लोकसभा निवडणुकीत सर्वांनी मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे यासाठी अनेक मार्गाने मतदार जागृती करण्यात येत आहे. यासाठी प्रशासन जेवढे प्रयत्न करत आहे, तेवढ्याच प्रमाणात युवक आणि युवती देखील अनोख्या मार्गाने मतदार जागृतीसाठी पुढाकार घेताना दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील विश्वनाथ घाणेगावकर या तरुणाने देखील यात खारीचा वाटा उचलला आहे. नुकताच अभिनेता रणवीर सिंहचा गल्ली बॉय चित्रपट येऊन गेला. त्यात रॅप म्युझीकवर प्रकाश टाकण्यात आला. त्यामुळे तरुणांमध्ये रॅप सॉन्गची क्रेझ वाढली आहे. तोच धागा पकडून विश्वनाथ याने आपल्या मित्रांच्या साथीत तरुणांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न रॅप सॉन्गच्या माध्यमातून केला आहे. 

निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळी शक्कल लढवत असतात. केवळ  राजकीय पक्षांचे उमदेवार नव्हे तर, निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे सुद्धा विविध माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येते. जिल्हा प्रशासन वृत्तपत्रात जाहिरात देऊन, पथनाट्यच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असते.  मात्र आता मतदारांपर्यंत एका क्षणात पोहचवण्याची क्षमता सोशल मिडीयामध्ये आहे.

लोकशाही बळकट करण्यासाठी चांगले उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. पण यासाठी नागरिकांनी मतदान करणे अपेक्षित आहे. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी वेगवेगळ्याप्रकारे योजना राबवून जिल्हा प्रशासन जनजागृती करत असताना सामाजिक भान म्हणून काही युवक यात आपले योगदान देत आहेत. 

पुण्यात शिक्षण घेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील विश्वनाथ घाणेगावकर आणि त्याच्या टीमने तयार केलेला "किसी को भी कर पर वोट कर" हे रॅप साँग सोशल मिडियावर वायरल होत आहे. "वोट से बदल कल" असे सांगताना मतपेटीतून तुम्ही भविष्य घडवू शकता, असा संदेश यातून देण्यात आला आहे.  तसेच मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. कुणालाही करा, पण मतदान करा, अस या गाण्याचे बोल सांगतात.  या रॅप साँगला फेसबुक आणि यु ट्यूबवर पसंती मिळत आहे. 

सरकार लाखो रुपये खर्च करून मतदान करण्यासाठी जाहिरात बाजी करत आहे. मात्र लोकांपर्यंत लवकर पोहचेल आणि तरुणांना आवडेल अशा पद्धतीने मतदान जनजागृतीसाठी हे गीत बनवल्याचे विश्वानाथने सांगितले. 

या गाण्याचे दिग्दर्शन अविनाश मल्होत्रा, लिरीक्स विश्वनाथ घाणेगावकर, म्युझिक दिग्दर्शन ऋषीकेश बनसोडे, रत्नदीप कांबळे यांनी केले. तसेच गाण्यासाठी सागर पांढरे, सुमीत बाविस्कर, दिनेश जाधव, अक्षय आणि ऋषीकेश दळवी यांचे सहकार्य लाभले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदानSocial Viralसोशल व्हायरल