शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

कौमार्य सिद्ध न झाल्याने वधूला माहेरी पाठविले!

By admin | Updated: June 2, 2016 02:38 IST

लग्नानंतर जातपंचायतीने घेतलेल्या कौमार्याच्या कथित चाचणीत नववधू दोषी आढळली, असा ठपका ठेवत जातपंचायतीने लग्न रद्द ठरविल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील

संगमनेर/नाशिक : लग्नानंतर जातपंचायतीने घेतलेल्या कौमार्याच्या कथित चाचणीत नववधू दोषी आढळली, असा ठपका ठेवत जातपंचायतीने लग्न रद्द ठरविल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील (अहमदनगर) घुलेवाडी येथील वधूबाबत घडला. मात्र ‘अंनिस’चा पाठपुरावा व प्रसारमाध्यमांच्या दणक्यामुळे बुधवारी वधूचा स्वीकार करत तिचा पती व सासरच्या मंडळींनी तिला पुन्हा नांदण्यासाठी नेले.घुलेवाडीतील एका तरुणीचा २२ मे रोजी नाशिकच्या तरुणाशी विवाह झाला. विवाहानंतर दुसऱ्या दिवशी वधूच्या माहेरीच जात पंचायतीने तिच्या कौमार्याची कथित चाचणी घेतली. त्यात वराने व जातपंचायतीने तिला दोषी ठरवत तिचा स्वीकार करण्यास नकार दिला. लग्न रद्द ठरवून वधूला माहेरीच सोडून वऱ्हाडी परतले. मुलाच्या कुटुंबीयांनी वधूच्या अंगावरील सोनेही काढून घेतले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) जिल्हा कार्याध्यक्षा अ‍ॅड. रंजना गवांदे यांना हे प्रकरण समजले. त्यांनी तातडीने नववधूची भेट घेवून हा प्रश्न जात पंचायत विरोधी समितीचे कृष्णा चांदगुडे यांच्या मदतीने ऐरणीवर आणला. या विषयीचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येताच जात पंचायतीवर टीकेची झोड उठली.महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने पोलीस उपमहानिरीक्षकांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर बुधवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक डॉ. अजय देवरे, पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे व अ‍ॅड. गवांदे यांनी विवाहितेच्या घरी भेट देऊन वास्तव जाणून घेतले. पोलिसांनी तिला धीर देत नवरदेवाशी संपर्क साधून त्याला संगमनेरला बोलाविले. त्यानुसार पाच वाजता नवरदेव घुलेवाडीत आला. विवाहितेच्या घरात नातेवाईकांची बैठक होऊन त्याने गैरसमजातून झालेल्या घटनेची माफी मागत पत्नीस नांदायला नेण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला. अखेर पोलीस बंदोबस्तात नववधू सासरी रवाना झाली. (प्रतिनिधी) च्लग्नानंतर पंचांनी एक पांढरेशुभ्र वस्त्र नवदाम्पत्याला देऊन मंडपाशेजारच्या खोलीत जाण्यास सांगितले. काही वेळेनंतर जात पंचायत बसली. पंचांनी विचारणा केल्यावर नवऱ्या मुलाने सर्वांसक्षम आत घडलेल्या प्रसंगाचे हुबेहूब वर्णन केले. पंचांनी एक धक्कादायक प्रश्न विचारला, ‘माल खरा निघाला की खोटा?’ त्यावर नवऱ्या मुलाने हातातील पांढरे वस्त्र पंचांकडे दिले. पंचांनी ते बघितले. त्यावर रक्ताचा डाग नव्हता. तेवढ्यातच मुलाने ‘माल खोटा..खोटा.. खोटा’ असे म्हटले. या वाक्याने सगळीकडे शांतता पसरली. वधूपित्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलीने आक्रोश करून मी पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत असल्याने असे घडले असेल, असे जीव तोडून सांगितले. वडिलांनीदेखील सगळ्यांना विनवणी केली. मात्र पंचांनी हेका सोडला नाही.घडलेल्या प्रकरणाबाबत वधू आणि वर पक्षात आपसात समझोता झालेला आहे. त्यांची या प्रकरणाविषयी कुठलीही तक्रार नाही. दोघांचे तसे जबाब पोलीस डायरीला नोंदवून घेतले आहेत. - गोविंद ओमासे, पोलीस निरीक्षकवधू-वर पक्षातील लोकांची बैठक झाली. आपणावरील दबावामुळे हा प्रकार घडल्याचे नवऱ्या मुलाने सांगितले. वधूला नांदविण्यास सासरची मंडळी तयार असल्याने आपसातील चर्चेतून हे प्रकरण तडीस लागले आहे. जातपंचायतींनी अशा अघोऱ्या व अशास्त्रीय प्रथा थांबविण्याची गरज आहे. - अ‍ॅड. रंजना गवांदे, कार्याध्यक्षा अंनिस