शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

CAA Protest: मराठवाड्यामध्येही हिंसक वळण; जाळपोळीच्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 06:34 IST

अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि बीडमध्ये पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनाची धार राज्यातही तीव्र झाली असून शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चांनी महाराष्ट्र दणाणून गेला. मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोली येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले.

अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि बीडमध्ये पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. औरंगाबाद आणि नांदेडमध्ये मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात शांततेत आंदोलन झाले. आंदोलनासाठी नागरिक उस्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते. त्यातही तरुणांची संख्या लक्षवेधी होती.

औरंगाबादेत विविध मुस्लीम आणि दलित संघटनांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत एल्गार पुकारला. या मोर्चात अक्षरश: जनसागर उसळला होता. शहरात कडकडीत बंद होता. बीडमध्ये मोर्चेकऱ्यांनी बसवर दगडफेक केल्याने पोलिसानी अश्रूधुराच्या ४ नळकांड्या फोडल्या. यात ८ ते १० पोलीस आणि होमगार्ड जखमी झाले.

कळमनुरी येथे ४ एसटी बसेस फोडल्या. यामध्ये दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. दुपारी नवीन बसस्थानकासमोर मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी लाठीमार केला. अश्रूधुराचे नळकांडेही फोडले. त्यानंतर जमाव पांगला गेला. दिवसभर शहरात कडकडीत बंद होता. परभणीसह जिल्ह्यात पाथरी, पूर्णा, पालम येथे मोर्चा काढण्यात आला. परभणी शहरात मोर्चेकरी परतत असताना काही जणांनी मनपाच्या अग्नीशन दलाच्या गाडीवर (पान १२ वर) दगडफेक केली. दुचाकी वाहनांचेही नुकसान केले.

नांदेडात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले़ हजारोंच्या संख्येने नागरिकांनी तब्बल सव्वातीन तास जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठाण मांडले होते़ लातूर जिल्ह्यातील निलंगा, औराद शहाजानी आणि किनगाव येथ मोर्चा काढण्यात आला़ निलंगा येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, मिरज, सोलापूर, फलटण येथे आंदोलन झाले. मिरजेत संविधान बचाव कृती समितीतर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. मुस्लिम कार्यकर्ते उस्फुर्तपणे हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. कोल्हापूरात बहुजन क्रांती मोर्चासह विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पुण्यात निघालेल्या मोर्चात आंदोलकांनी ‘भारत में हम किराएदार नहीं बराबर के हिस्सेदार हैं !, ‘सेव्ह कॉन्स्टिट्यूशन रिजेक्ट कॅब’ असे लिहिलेले फलक हातात धरले होते.

अहमदनगर शहर, संगमनेर, राहाता, कोपरगाव, जामखेड शहरात संविधान बचाओ मोर्चा काढण्यात आला. खान्देशात जळगाव, भुसावळ, अमळनेर, जामनेर, धुळे व शहाद्यात मोर्चे काढण्यात आले. रायगड जिल्ह्यात पनवेल आणि मानगाव येथे तर ठाणे जिल्ह्यात भिवंडीतही आंदोलन झाले.नाागपुरातही प्रचंड मोर्चामुस्लीम समाजाचा लक्षवेधी रोष नागपुरकरांनी अनुभवला. हिवाळी अधिवेशनानिमित्त सरकार नागपुरात असताना आंदोलनासाठी प्रचंड मोठ्या संख्येने मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला. मुस्लीम समाजाची ही वज्रमुठ सरकारसाठी एक ईशारा असल्याची भावना मोर्चेकºयांनी व्यक्त केली.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक