शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

CAA Protest: मराठवाड्यामध्येही हिंसक वळण; जाळपोळीच्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 06:34 IST

अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि बीडमध्ये पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनाची धार राज्यातही तीव्र झाली असून शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चांनी महाराष्ट्र दणाणून गेला. मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोली येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले.

अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि बीडमध्ये पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. औरंगाबाद आणि नांदेडमध्ये मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात शांततेत आंदोलन झाले. आंदोलनासाठी नागरिक उस्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते. त्यातही तरुणांची संख्या लक्षवेधी होती.

औरंगाबादेत विविध मुस्लीम आणि दलित संघटनांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत एल्गार पुकारला. या मोर्चात अक्षरश: जनसागर उसळला होता. शहरात कडकडीत बंद होता. बीडमध्ये मोर्चेकऱ्यांनी बसवर दगडफेक केल्याने पोलिसानी अश्रूधुराच्या ४ नळकांड्या फोडल्या. यात ८ ते १० पोलीस आणि होमगार्ड जखमी झाले.

कळमनुरी येथे ४ एसटी बसेस फोडल्या. यामध्ये दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. दुपारी नवीन बसस्थानकासमोर मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी लाठीमार केला. अश्रूधुराचे नळकांडेही फोडले. त्यानंतर जमाव पांगला गेला. दिवसभर शहरात कडकडीत बंद होता. परभणीसह जिल्ह्यात पाथरी, पूर्णा, पालम येथे मोर्चा काढण्यात आला. परभणी शहरात मोर्चेकरी परतत असताना काही जणांनी मनपाच्या अग्नीशन दलाच्या गाडीवर (पान १२ वर) दगडफेक केली. दुचाकी वाहनांचेही नुकसान केले.

नांदेडात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले़ हजारोंच्या संख्येने नागरिकांनी तब्बल सव्वातीन तास जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठाण मांडले होते़ लातूर जिल्ह्यातील निलंगा, औराद शहाजानी आणि किनगाव येथ मोर्चा काढण्यात आला़ निलंगा येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, मिरज, सोलापूर, फलटण येथे आंदोलन झाले. मिरजेत संविधान बचाव कृती समितीतर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. मुस्लिम कार्यकर्ते उस्फुर्तपणे हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. कोल्हापूरात बहुजन क्रांती मोर्चासह विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पुण्यात निघालेल्या मोर्चात आंदोलकांनी ‘भारत में हम किराएदार नहीं बराबर के हिस्सेदार हैं !, ‘सेव्ह कॉन्स्टिट्यूशन रिजेक्ट कॅब’ असे लिहिलेले फलक हातात धरले होते.

अहमदनगर शहर, संगमनेर, राहाता, कोपरगाव, जामखेड शहरात संविधान बचाओ मोर्चा काढण्यात आला. खान्देशात जळगाव, भुसावळ, अमळनेर, जामनेर, धुळे व शहाद्यात मोर्चे काढण्यात आले. रायगड जिल्ह्यात पनवेल आणि मानगाव येथे तर ठाणे जिल्ह्यात भिवंडीतही आंदोलन झाले.नाागपुरातही प्रचंड मोर्चामुस्लीम समाजाचा लक्षवेधी रोष नागपुरकरांनी अनुभवला. हिवाळी अधिवेशनानिमित्त सरकार नागपुरात असताना आंदोलनासाठी प्रचंड मोठ्या संख्येने मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला. मुस्लीम समाजाची ही वज्रमुठ सरकारसाठी एक ईशारा असल्याची भावना मोर्चेकºयांनी व्यक्त केली.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक