शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

राज ठाकरेंकडून अटींचं उल्लंघन? कारवाई होणार? गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचं सूचक विधान, म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2022 10:07 IST

Raj Thackeray Aurangabad Sabha: राज ठाकरेंच्या कालच्या सभेत पोलिसांनी घातलेल्या अटींचं उल्लंघन झालं आहे का, तसेच राज ठाकरेंनी भाषणातून अटींचं उल्लंघन झालं आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे, त्यापार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. 

पुणे - मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या राज ठाकरे यांनी काल औरंगाबाद येथे सभा घेऊन याबाबत आपली भूमिका अधिक स्पष्ट केली होती. त्यावेळी चार तारखेपासून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आदेश त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले. दरम्यान, राज ठाकरेंच्या कालच्या सभेत पोलिसांनी घातलेल्या अटींचं उल्लंघन झालं आहे का, तसेच राज ठाकरेंनी भाषणातून अटींचं उल्लंघन झालं आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे राज ठाकरेंवर कारवाई होणार का असा सवाल विचारला जात आहे, त्यापार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, भोंग्यांसंदर्भातील निर्णय हा काही राज ठाकरेंनी घ्यायचा नाही आहे. कालच्या सभेमध्ये त्यांनी फक्त पवार साहेबांवर टीका करणं आणि समाजा समाजामध्ये भावना भडकतील कशा, द्वेश निर्माण होईल याचाच प्रयत्न केला. कालचं भाषण पोलीस ऐकतील. त्यानंतर काय आक्षेपार्ह आहे काय नाही याबाबत निर्णय घेतील आणि त्यावर अंतिम निर्णय घेतील, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगतले.

राज ठाकरेंच्या सभेत पोलिसांच्या अटींचं पालन झालं नसल्याबाबत वळसे-पाटील म्हणाले की, या संदर्भात औरंगाबादचे पोलीस कमिशनर आज त्या संदर्भातील व्हिडीओ पाहतील. त्यात अटीशर्तींचं कुठे कुठे उल्लंघन झालं याचा आढावा घेतील. कायदेशीर सल्ला घेतील. त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवतील. त्यानंतर वरिष्ठ त्याबाबत निर्णय घेतील. दरम्यान, सर्व समाजाला आवाहन आहे की, त्यांनी समाजात शांतता, सलोखा ठेवण्याचं काम करावं. कुणीही तापवातापवी पेटवापेटवीचं काम करत असेल तर त्यांना साथ देऊ नये, असे आवाहनही वळसे-पाटील यांनी केलं. 

दरम्यान, राज ठाकरेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचाही वळसे पाटील यांनी समाचार घेतला, ते म्हणाले की, राज ठाकरेंनी शरद पवारांवर आरोप केल्याने त्यांच्यावर काही परिणाम होईल असं नाही. पवार साहेबांचं राजकीय आणि सामाजिक जीवन महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. त्यांनी नेहमी विकासाचं काम केलेलं आहे. समाजाला एकत्र ठेवण्याचं, उभं करण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्यामाध्यमातून हजारो निर्णय झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला आजची समृद्धी मिळाली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे सांगण्याला काहीच कार्यक्रम नाही ते असे आरोप करतात.

दुसरं काही सांगायला नसल्याने शरद पवारांच्या नास्तिकतेचा मुद्दा उपस्थित केला गेला. घटनेनुसार प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे पवार हे नास्तिक आहेत हा मुद्दा होऊ शकत नाही. त्याच्याऐवजी राज्यातील बेरोजगार मुलांच्या नोकरीबाबत, शेतकऱ्यांबाबत काही बोलायला हवं होतं. पेट्रोल-डिझेलच्या महागाईबाबत बोलायला पाहिजे. राज ठाकरेंचं कालचं सगळं भाषण हे शरद पवार आणि भोंगे या दोन विषयांच्या बाहेर गेलं नाही. त्यांच्याकडे सांगण्यासाठी कुठलाही कार्यक्रम नाही. त्यांनी साधी बालवाडी चालवलेली नाही. त्यामुळे भाषणं करणं आणि समाजात तेढ निर्माण करणं एवढंच काम त्यांच्याकडे आहे. शरद पवार हे नास्तिक आहे किंवा काय याचं ते प्रदर्शन करत नाही. ते मुख्यमंत्री असताना अनेकदा भीमाशंकरला आलेले आहेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण