शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

विनाचालक माल ट्रक नाल्यात

By admin | Updated: September 18, 2016 00:48 IST

जेजुरी महामार्गावरील जेजुरीनजीक लवथळेश्वर येथील नाल्यात आज एक मार्गावर उभा असलेला विनाचालक माल ट्रक गेला.

जेजुरी : हडपसर - जेजुरी महामार्गावरील जेजुरीनजीक लवथळेश्वर येथील नाल्यात आज एक मार्गावर उभा असलेला विनाचालक मालट्रक गेला. वाहनचालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केलेला होता. उतारावर असल्याने तो अचानक सुरू होऊन संपूर्ण मार्ग ओलांडून दुसऱ्या बाजूच्या नाल्यात जाऊन थांबला. सुदैवाने मार्गावर गर्दी नव्हती, की समोरून वाहने येत नसल्याने मोठा अनर्थ टळला. तुटलेला पूल, लगतच साचलेले मैलापाणी आणि शेजारीच पुलाच्या दुरुस्तीसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून पडलेले पाइप पाहून परिसरातील नागरिक आणि प्रवाशांनी मात्र याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. कोट्यवधी रुपये निधी खर्चूनही परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याच्या तक्रारीही केल्या. सुमारे ४५ कोटी रुपयांचा निधी खर्चूनही महामार्गावर अजून मोठमोठे खड्डे आहेतच की मार्गावरील धोकादायक पूलही तसेच आहेत. एवढा निधी उपलब्ध असूनही या मार्गावरील दुरुस्त्या अजूनही रखडलेल्याच आहेत. मिळालेल्या निधीतून जागोजागी खराब झालेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले आहे. काही ठिकाणी रुंदीकरण, तर काही पुलांना लोखंडी संरक्षक कठडे उभे केले आहेत.अशा धोकादायक पुलांमुळे मोठा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालण्याची गरज आहे. (वार्ताहर)>अपघाताची ठिकाणे जशीच्या तशीच आहेत. केवळ लहान-मोठ्या दुरुस्त्या व खड्डे बुजवण्याचा प्रकार झाला आहे. महामार्ग असल्याने रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, धोकेदायक पूल, तसेच चढउतार, तसेच ठेवलेले असून यामुळे अपघात कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहेत. लवथळेश्वरनजीकच्या जगतापवस्तीपासून जेजुरी पोलीस ठाण्यापर्यंत सुमारे एक किलोमीटर मार्ग अक्षरश: खड्ड्यांचा बनला आहे. लवथळेश्वर मंदिर, जेजुरी आयसीयू केअर सेंटर हॉस्पिटल, जेजुरीतील मुख्य शिवाजी चौक, मोरगाव चौक आदी ठिकाणी एक-एक फूट खोलीचे खड्डे पडलेले आहेत. लवथळेश्वर येथील माही पेट्रोल पंपालगतचा पूर्णपणे जीर्ण व तुटलेला पूल अत्यंत धोकादायक बनलेला आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्षच होत आल्याने मोठी नाराजी आहे. >शासनाने आळंदी-पंढरपूर या पालखी मार्गाला आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केलेले आहे. त्यासाठी केंद्रीय व राज्यपातळीवरून नियोजन सुरू आहे.यातील हडपसर ते जेजुरीदरम्यान ४१ किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. >महामार्गावरील खड्डे ताबडतोब बुजवण्यात येतील, त्याचबरोबर या पुलाच्या दुरुस्तीबाबत वरिष्ठांशी बोलून योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्या पुलाची दुरुस्ती आवश्यकच आहे.- अभय आवटे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग >नागरिकांचे आरोग्य धोक्यातसंपूर्ण लवथळेश्वर परिसरातील गटारांचे पाणी याच नाल्यात सोडलेले असल्याने ते मैलापाणी याच पुलाखाली साचलेले आहे. परिसरात दुर्गंधी पसरलेली आहेच. शिवाय नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आलेले आहे. जेजुरी नगरपालिकेकडूनही या साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचेही परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे.