शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

विनोद तावडे यांची १९१ कोटींची खरेदी वित्त विभागाने रोखली

By admin | Updated: July 1, 2015 02:20 IST

तीन लाखांपेक्षा जास्त रकमेची खरेदी ई-टेंडरिंगद्वारे करण्याचा राज्य सरकारचा आदेश धाब्यावर बसवून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दर सूचीवर १९१ कोटी रुपयांची खरेदी करण्यास

मुंबई : तीन लाखांपेक्षा जास्त रकमेची खरेदी ई-टेंडरिंगद्वारे करण्याचा राज्य सरकारचा आदेश धाब्यावर बसवून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दर सूचीवर १९१ कोटी रुपयांची खरेदी करण्यास दिलेली प्रशासकीय मंजुरी वित्त विभागाने रोखली. आता हे प्रकरण अंगलट आल्यावर तावडे यांनी शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.विनोद तावडे यांच्या आदेशावरून शिक्षण विभागाने १९१ कोटी रुपयांच्या खरेदीस प्रशासकीय मान्यता दिल्याचे व त्याला वित्त खात्याने आक्षेप घेतल्याचे प्रकरण उघड झाल्याने राज्यातील भाजपाप्रणीत सरकारची नाचक्की झाली. तामिळनाडूतील एका शाळेत आग लागून सुमारे १०० विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला. त्या प्रकरणाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारांना शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवण्याचा आदेश दिला. त्यानुसार राज्यातील जि.प.च्या ६२ हजार १०५ शाळांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे अग्निशमन यंत्रे बसवण्याचा निर्णय झाला होता. मागील सरकारने न्यायालयाच्या आदेशाची काही प्रमाणात अंमलबजावणी केली होती. त्यासाठी तरतूद केलेले १८ कोटी रुपये शिल्लक असल्याने शिक्षणमंत्री तावडे यांनी ११ फेब्रुवारी २०१५ रोजी दर सूचीवर अग्निशमन यंत्रे खरेदी करण्याचा आदेश काढले. प्रत्येकी ८ हजार ३२१ रुपयांना एक या दराने ही यंत्रे खरेदी करण्यात आली. वित्त विभागाने या खरेदीवर आक्षेप नोंदवताच ४ मार्च २०१५ रोजी शिक्षण विभागाने ही खरेदी स्थगित केली. मात्र तोपर्यंत संबंधित कंत्राटदाराने ६ हजार ४७ अग्निशमन यंत्रांच्या खरेदीकरिता ६ कोटी २० लाख रुपये खर्च केले होते. विशेष बाब म्हणजे २ मार्च रोजी एका दिवसात ही सर्व यंत्रे खरेदी केली गेली. शिक्षण विभागाकडे जेमतेम १८ कोटी रुपये शिल्लक असताना या विभागाने सर्व शाळांमध्ये अग्निशमन यंत्रे बसवण्याकरिता १९१ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता कशी दिली हा वित्त विभागाचा मुख्य आक्षेप आहे. आदेश २००९मधील असताना २०१५मध्ये खरेदी करताना फायर आॅडिट करून ही यंत्रे बसवण्याची आता सुचलेली कल्पना अगोदर कशी सुचली नाही आणि ज्या कंत्राटदाराला दरसूचीवर हे काम दिले त्याने स्वत: पुरवठा न करता एका डिलरमार्फत अग्निशमन यंत्रे कशी पुरवली यांची उत्तरे दिवसभराच्या खुलाशानंतरही मिळाली नाहीत, असे उच्चपदस्थांचे मत आहे. (विशेष प्रतिनिधी)