शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

विंधण विहिरींना मिळाला मुहूर्त

By admin | Updated: June 8, 2016 02:07 IST

पनवेल तालुक्यातील ३७ गावे पाणीटंचाईने त्रस्त झाली आहेत

पनवेल : पनवेल तालुक्यातील ३७ गावे पाणीटंचाईने त्रस्त झाली आहेत. यातील २ गावे आणि ११ वाड्यांतील १३ विंधण विहिरींना मंजुरी मिळाली होती, मात्र त्या खोदण्याकरिता एजन्सीच मिळत नव्हती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर संबंधित प्रशासनाला जाग आली असून १२ ठिकाणी विंधण विहिरी खोदण्यात आल्या आहेत. त्यापैकी ११ विंधण विहिरींना पाणी लागले आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे. तालुक्यातील अनेक गाव-पाडे पाण्याच्या टंचाईने हैराण आहेत. आदिवासी आणि दुर्गम भागात निर्माण होणारी पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात तालुक्यातील ३६ गावे आणि वाड्यांचा समावेश करण्यात आला होता. यात १३ विंधण विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. एजन्सीच मिळत नसल्याने विंधण विहिरी खोदण्याचे काम महिन्याभरापासून रखडले होते. १२ पैकी ११ विहिरींना पाणी लागल्याची माहिती पंचायत समितीचे पाणीपुरवठा उपअभियंता आर.डी.चव्हाण यांनी दिली. (वार्ताहर)येथे खोदल्या विहिरीतालुक्यातील मालडुंगे येथील देहरंग व धोदाणी ही दोन गावे तसेच बेलवाडी (नानोशी), गराडा (नानोशी), सावरमाळ (नानोशी), कामटवाडी (नानोशी), धामोळे (ओवे), बुर्दुलवाडी (तुर्भे), आदिवासी वाडी (मोरबे), ठाकूरवाडी (वलप), भल्याची वाडी (शिरवली), पेरूची वाडी (चावणे) या ठिकाणी विंधण विहिरी खोदण्यात आल्या आहेत.