शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

“महापालिका निवडणुका होताच लाडकी बहीण योजना बंद करतील”; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 13:57 IST

Thackeray Group MP Vinayak Raut News: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट महापालिकेत निवडून येईल, असा दावा या नेत्यांनी केला आहे.

Thackeray Group MP Vinayak Raut News: राज्यात एकीकडे बीड आणि परभणी प्रकरणावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. या प्रकरणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट कंबर कसून तयारीला लागला असून, उद्धव ठाकरे जातीने सर्व गोष्टींचा आढावा, बैठका घेत आहेत. यातच आता ठाकरे गटातील खासदाराने लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर टीका केली आहे. 

लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांचे महायुती सरकारवर टीकास्त्र सुरूच असल्याचे दिसत आहे. यातच डिसेंबर महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात वळते करण्यात आले आहेत. तसेच लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आले आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लाडकी बहीण योजनेबाबत दावा करताना महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. 

महापालिका निवडणुका होताच लाडकी बहीण योजना बंद करतील

महाराष्ट्र कर्जामध्ये डुबलेला आहे, त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळण्याचे आव्हान अजित पवार कसे पेलणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकींपर्यंत लाडकी बहीण योजनेचा प्रयोग ते नक्की करतील. त्यानंतर ही योजना बंद पाडतील. या योजनेचा डोलारा सांभाळणे जिकरीचे काम आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका संपल्या की ही योजना बंद करण्यात येणार, असा मोठा दावा विनायक राऊत यांनी केला.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त  

संतोष देशमुख यांच्या हत्येमागे कोण आहे, हे दिसून आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची गांभीर्याने दखल घेतील याची मला खात्री आहे. पण मागच्या दोन महिन्यात ज्या पद्धतीने हत्या होताहेत, लैंगिक अत्याचार, खून होताहेत, दरोडे पडताहेत, त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त  झालेली आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही, गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत, अशी टीका विनायक राऊतांनी केली. 

दरम्यान, मुंबई महापालिकेवर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा डोळा आहे. त्यांना महापालिका हडप करायची आहे. मात्र मुंबईकर जनता जागृत आहे. कोणत्याही परिस्थितीत या लुटारूंच्या हातात मुंबईकर जनता महापालिका देणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट महापालिकेत निवडून येईल, असा दावा विनायक राऊतांनी केला.  

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाShiv Senaशिवसेना