शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
4
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
5
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
6
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
7
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
8
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
10
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
11
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
12
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
13
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
14
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
15
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
16
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
17
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
18
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
19
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
20
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

गावे महाराष्ट्राची, पीक सर्वेक्षण तेलंगणचे

By admin | Updated: October 3, 2015 03:51 IST

सीमावर्ती भागात असलेल्या महाराष्ट्रातील १४ गावांवर तेलंगणने अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे.

शंकर चव्हाण ल्ल जीवती (चंद्रपूर)सीमावर्ती भागात असलेल्या महाराष्ट्रातील १४ गावांवर तेलंगणने अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पहाडावरील या वादग्रस्त गावांसह परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र महाराष्ट्र शासनाने साधे पीक सर्वेक्षण करण्याचेही सौजन्य दाखविले नाही. याचाच फायदा घेत तेलंगण सरकारने येथील कापूस, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे.या गावांत मराठी भाषिक राहतात. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा १७ जुलै १९९७ रोजी ही १४ गावे महाराष्ट्र राज्याचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.दऱ्याखोऱ्या असलेल्या १४ गावांतील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून शेती करणाऱ्या जमिनीचा मालकी हक्क द्यावा, अशी निवेदने दिली. गावात मंत्री आले, पण आश्वासनाशिवाय त्यांना काहीच मिळाले नाही. शासनाने वनहक्क दाव्याअंतर्गत जमिनीचे पट्टे देण्याची योजना राबविली. मात्र जाचक अट लावल्याने पहाडावर अतिक्रमण केलेल्या या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता आला नाही. मात्र या शेतकऱ्यांना तेलंगण सरकारकडून मालकी हक्क मिळाले आहे, हे विशेष.सीमावादात असलेली परमडोली, तांडा, कोठा, येसापूर, मुकादमगुडा, महाराजगुडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, अंतापूर, इंदिरानगर, पद्मावती, पळसगुडा, भोलापठार, लेंडीगुडा ही १४ गावे फाजल अली समितीने निर्धारित केलेल्या आंतरराज्य सीमारेषेनुसार महाराष्ट्र राज्याचीच आहेत.मागील महिन्यात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे वादग्रस्त १४ गावांसह पहाडावरील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याबाबत सर्वांना सूचना केल्या होत्या. पण पीक सर्वेक्षण झाले नाही. त्यामुळे पुन्हा ५ आॅक्टोबर रोजी कृषी सहायक, पटवारी व ग्रामसेवकांची संयुक्त बैठक ठेवण्यात आली आहे. - के. वाय. कुणारपवार, तहसीलदार, जीवती