शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
5
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
6
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
7
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
8
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
9
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
10
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
11
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
12
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
14
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
15
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
16
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
17
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
18
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
19
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
20
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

गावे महाराष्ट्राची, पीक सर्वेक्षण तेलंगणचे

By admin | Updated: October 3, 2015 03:51 IST

सीमावर्ती भागात असलेल्या महाराष्ट्रातील १४ गावांवर तेलंगणने अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे.

शंकर चव्हाण ल्ल जीवती (चंद्रपूर)सीमावर्ती भागात असलेल्या महाराष्ट्रातील १४ गावांवर तेलंगणने अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पहाडावरील या वादग्रस्त गावांसह परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र महाराष्ट्र शासनाने साधे पीक सर्वेक्षण करण्याचेही सौजन्य दाखविले नाही. याचाच फायदा घेत तेलंगण सरकारने येथील कापूस, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे.या गावांत मराठी भाषिक राहतात. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा १७ जुलै १९९७ रोजी ही १४ गावे महाराष्ट्र राज्याचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.दऱ्याखोऱ्या असलेल्या १४ गावांतील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून शेती करणाऱ्या जमिनीचा मालकी हक्क द्यावा, अशी निवेदने दिली. गावात मंत्री आले, पण आश्वासनाशिवाय त्यांना काहीच मिळाले नाही. शासनाने वनहक्क दाव्याअंतर्गत जमिनीचे पट्टे देण्याची योजना राबविली. मात्र जाचक अट लावल्याने पहाडावर अतिक्रमण केलेल्या या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता आला नाही. मात्र या शेतकऱ्यांना तेलंगण सरकारकडून मालकी हक्क मिळाले आहे, हे विशेष.सीमावादात असलेली परमडोली, तांडा, कोठा, येसापूर, मुकादमगुडा, महाराजगुडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, अंतापूर, इंदिरानगर, पद्मावती, पळसगुडा, भोलापठार, लेंडीगुडा ही १४ गावे फाजल अली समितीने निर्धारित केलेल्या आंतरराज्य सीमारेषेनुसार महाराष्ट्र राज्याचीच आहेत.मागील महिन्यात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे वादग्रस्त १४ गावांसह पहाडावरील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याबाबत सर्वांना सूचना केल्या होत्या. पण पीक सर्वेक्षण झाले नाही. त्यामुळे पुन्हा ५ आॅक्टोबर रोजी कृषी सहायक, पटवारी व ग्रामसेवकांची संयुक्त बैठक ठेवण्यात आली आहे. - के. वाय. कुणारपवार, तहसीलदार, जीवती