शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

शहरांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार

By admin | Updated: January 22, 2015 02:06 IST

राज्यातील शहरी शाळांमधील विद्यार्थ्यांचे मराठी आणि गणित विषयांमधील ज्ञान ग्रामीण विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

पुणे : ग्रामीण भागातील शाळांपेक्षा शहरी भागातील शाळांची गुणवत्ता अधिक चांगली असते, असा गवगवा केला जात असला तरी राज्यातील शहरी शाळांमधील विद्यार्थ्यांचे मराठी आणि गणित विषयांमधील ज्ञान ग्रामीण विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील एकूण २ हजार २९३७ शाळांमधील पाचवीच्या विद्यार्थ्यांचे मराठी व गणित विषयातील ज्ञानाचे मूल्यमापन करण्यात आले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ८१ शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे ४४ वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यात आले. हे प्रश्न श्रवण, वाचन, शब्दसंपत्ती, कार्यात्मक व्याकरण, लेखन यावर आधारित होते. तर गणित विषयातील ५० वस्तुनिष्ठ प्रश्न हे संख्यात्मक, अपूर्णांक, संख्यावरील क्रिया, अपूर्णांकावलील क्रिया, मापन, व्यवहारिक गणित, भूमितीवर आधरित होते.या प्रश्नांना विद्यार्थ्यांना दिलेल्या उत्तरांच्या आधारावरून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातही मराठी विषयामध्ये ग्रामीण भागातील मुलांपेक्षा मुलीच अधिक हुशार असल्याचे निदर्शनास आले आहे. यंदा प्रथमच विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेची प्रमाणीत चाचणी एससीईआरटीतर्फे करण्यात आली. या अहवालाची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.च्मराठीच्या चाचणीत २१ ते ५० गुण मिळविणाऱ्यांची टक्केवारी ७१.५७ टक्के आहे. तर गणिताच्या चाचणीमध्ये २१ ते ५० गुण मिळविणाऱ्यांची टक्केवारी ६३.७४ टक्के आहे. ० ते २० गुण मिळविणाऱ्या विद्यार्थांची संख्या २८.४२ आहे.च्एससीईआरटीने जातीनिहाय सर्वेक्षण केले असून त्यात अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय वर्ग आणि खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांची सुद्धा वेगळी नोंद या अहवालात आहे. त्यात भटक्या जमातीमधील विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालकांकडून घरी अभ्यासात मदत मिळत असलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी ७३.३२ टक्के आहे.