शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

ओबीसी वगळून सर्व नेत्यांना गावबंदी; ओबीसी समाजाकडून जालन्यात पहिला बॅनर लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 15:55 IST

दोन्ही समाजांच्या आरक्षणाचे केंद्र असलेल्या जालना जिल्ह्यात आरक्षणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

आरक्षण वादामुळे राज्यातील वातावरण दुषित होऊ लागले असून ओबीसी समाजाच्यावतीने जालन्यातील एका गावात गावबंदीचा पहिला बॅनर लावण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी राज्यभरात गावोगावी राजकीय नेत्यांना प्रवेशबंदीचे बॅनर लावण्यात आले होते. हे बंदी सर्वच नेत्यांना सरसकट घालण्यात आली होती. परंतू, ओबीसी समाजाने ओबीसी नेत्यांना परवानगी असल्याचे म्हणत इतर समाजाच्या नेत्यांना गावबंदी केली आहे. 

दोन्ही समाजांच्या आरक्षणाचे केंद्र असलेल्या जालना जिल्ह्यात आरक्षणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मनोज जरांगे यांनी ग्रामस्थांचा विरोध असला तरी अंतरवाली सराटीतूनच पुन्हा आंदोलन सुरु केले आहे. तर लक्ष्मण हाके यांनीही आंदोलनासाठी जालना जिल्हाच निवडला. ओबीसीतून आरक्षणासाठी जरांगे ठाम असून सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी राज्य सरकारला पुन्हा मुदत दिली आहे. तर हाके यांनी मराठा समाजाला काहीही केल्या ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून राज्य सरकारकडून शब्द घेतला आहे. या दोन्ही आरक्षणांच्या कात्रीत सरकारची मोठी कोंडी झाली आहे. 

राज्यात विधानसभा निवडणूक लागणार आहे. अशातच आता ओबीसी समाजाने नेत्यांना गाव बंदीला सुरुवात केल्याने खळबळ उडाली आहे. आजही गावागावात मराठा समाजाने नेत्यांना गावबंदी केल्याचे बॅनर झळकत आहेत. अशातच आता ओबीसी नेत्यांचेही बॅनर गावागावात लागण्याची शक्यता आहे. 

मराठा समाजाने सरसकट सर्वच नेत्यांना गावबंदी केली होती. ओबीसी समाजाने ओबीसी नेता वगळून इतर समाजाच्या नेत्यांना गावबंदी केली आहे. परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावात हा बॅनर लागला आहे. ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यांनी गावात प्रवेश करू नये, तसे झाल्यास मोठा अवमान करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. हाके यांनी हा निर्णय चुकीचा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.  

 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीMaratha Reservationमराठा आरक्षण