शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
4
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
5
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
6
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
7
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
8
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
9
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
10
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
11
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
12
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
13
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
14
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
15
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
16
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
17
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
18
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
19
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
20
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ

विक्रांत केणे खून प्रकरण : नऊ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2017 04:44 IST

शिवसेनेचे डोंबिवलीतील युवा अधिकारी विक्रांत केणे यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या काका श्रीराम आणि पुतण्या मंगेश भगत यांच्यासह

 लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शिवसेनेचे डोंबिवलीतील युवा अधिकारी विक्रांत केणे यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या काका श्रीराम आणि पुतण्या मंगेश भगत यांच्यासह नऊ मारेकऱ्यांच्या खारघर भागातून कारसह मुसक्या आवळण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला असून, यातील आणखी पाच जणांचा शोध सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. केणे कुटुंबीयांना श्रीराम भगत यांची डोंबिवलीतील आयरे गावातील जमीन विकत हवी होती. ती देण्यास भगत कुटुंबीयांचा विरोध होता. यातूनच उद्भवलेल्या वादातून विक्रांत यांचा मंगेशने श्रीरामच्या सांगण्यावरून रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून खून केल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी श्रीराम भगतसह नऊ जणांना एका कारसह अटक करण्यात आली आहे. श्रीराम भगत (४६), मंगेश भगत (२७), ओंकार भगत (२१), शुभम भगत (१९), पंकज म्हात्रे (२१), प्रदीप नायडू (२४), संजय तुळवे (२०), प्रशांत पवार (२०) आणि शशीकांत उर्फ शशी शांताराम कुळे (२४) रा. आयरे गाव, डोंबिवली अशी अटक केलेल्या कथित आरोपींची नावे आहेत. यापूर्वी यांच्यापैकी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. मारेकरी हे केणे कुटुंबीयांच्या शेजारीच राहत होते.भगत कुटुंबीयांना जमीन विकायची नसल्यामुळे ते आयरे गावातील त्या जागेवर बांधकाम करण्यासाठी जेसीबीने सफाई करीत होेते. त्याच वेळी ३० मे २०१७ रोजी दुपारी २ वा. च्या सुमारास श्रीराम यांनी त्या ठिकाणी उभा केलेला जेसीबी बाजूला घेण्यास सांगितल्याचा, तसेच दोन दिवसांपूर्वी झाडे तोडण्यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून, श्रीरामसह इतर १५ ते १६ जणांनी सचिन आणि विक्रांत केणे या दोघा भावांसह त्यांच्या नातेवाईकांना घेराव घातला. या धुमश्चक्रीत श्रीराम यांनी त्यांचे रिव्हॉल्व्हर काढून पुतण्या मंगेशकडे दिले. श्रीरामच्या इशाऱ्यावरूनच मंगेशने विक्रांतच्या पोटावर गोळीबार केला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. डोंबिवली पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू असताना मारेकरी भगत कुटुंबीय हे गोव्यात पळून जाणार असल्याची पक्की माहिती सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सोनसाखळी चोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक वाय. एस. चव्हाण यांच्या पथकाने, तळोजा रोड मुरबी गाव, कोपरा घरकूल येथे १ जून रोजी सापळा लावून, एका कारमधून सायंकाळी ७.१० वा. च्या सुमारास त्यांना पकडले. त्यांची कार खारघर रस्त्याने येत असताना दिसल्यानंतर, पोलिसांनी या कारला अडवून चौकशीअंती या नऊ जणांना अटक केली. या आरोपींना आता डोंबिवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.आणखी पाच जणांचा शोध सुरूया प्रकरणातील नऊ जणांचा शोध लागला असून, आणखी चार ते पाच फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. घटनेनंतर ते शेजारच्या जिल्ह्यात पसार झाले होते. त्यांच्या गाडीच्या मागावरच पोलीस होते. अखेर गाडीसह त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, हत्येसाठी वापरलेल्या मंगशचे परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरचाही शोध सुरू असल्याचे रानडे यांनी सांगितले.आता शस्त्र परवान्यांचा सर्व्हे करणारडोंबिवलीतील या घटनेमुळे आता शस्त्र परवाना असलेल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली भागातील वादग्रस्त परवानाधारकांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यातूनही आवश्यकता वाटल्यास संबंधितांच्या परवान्यांबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मकरंद रानडे यांनी स्पष्ट केले.