शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

वायुबाधेच्या घटनास्थळाची पाहणी

By admin | Updated: December 1, 2014 02:10 IST

शहरात वायुबाधेच्या अफवेने नागरिकांत भीतीचे वातावरण असून आ. ज्योती कलानी यांनी ओटी सेक्शन ते मध्यवर्ती पोलीस ठाणेदरम्यान शांती मोर्चा काढून पोलिसांना कारवाईचे निवेदन दिले.

उल्हासनगर : शहरात वायुबाधेच्या अफवेने नागरिकांत भीतीचे वातावरण असून आ. ज्योती कलानी यांनी ओटी सेक्शन ते मध्यवर्ती पोलीस ठाणेदरम्यान शांती मोर्चा काढून पोलिसांना कारवाईचे निवेदन दिले. ओटी सेक्शन विभागातील दुकाने बंद ठेवण्यात आली असून, वायुबाधितांनी साडेपाचशेचा आकडा गाठला आहे. अपर जिल्हाधिकारी अशोक सिंगारे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक घेऊन घटनेची माहिती घेतली आहे. वालधुनी नदीपात्रात टँकरद्वारे घातक रासायनिक द्रव सोडल्याने नदीकिनाऱ्याच्या नागरिकांना त्रास झाल्याने शहरात खळबळ उडून हाहाकार उडाला होता. वायुबाधित नागरिकांवर वेळीच उपचार झाल्याने जीवितहानी टळली. टँकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यवर्ती रुग्णालयात रविवारी सकाळी ११पर्यंत ५२७ जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी दिली.वायुबाधितांसाठी एक कक्षच तयार केल्याची माहिती डॉ. अशोक नांदापूरकर यांनी दिली. या वेळी पालिकेचे उपायुक्त देवीदास पवार, उपविभागीय अधिकारी बी.जी. गावडे, तहसीलदार, पोलीस अधिकारी, प्रदूषण मंडळाने नदीत सांडपाणी सोडणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती उप प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे व मनोहर वाकळे यांनी दिली. वायुबाधेच्या निषेधार्थ ओटी सेक्शन परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली. अद्यापही उग्र दर्प येत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मातोश्री रमाबाई आंबेडकर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय संस्थाप्रमुख महादेव सोनावणे यांनी घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.