शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

वायुबाधेच्या घटनास्थळाची पाहणी

By admin | Updated: December 1, 2014 02:10 IST

शहरात वायुबाधेच्या अफवेने नागरिकांत भीतीचे वातावरण असून आ. ज्योती कलानी यांनी ओटी सेक्शन ते मध्यवर्ती पोलीस ठाणेदरम्यान शांती मोर्चा काढून पोलिसांना कारवाईचे निवेदन दिले.

उल्हासनगर : शहरात वायुबाधेच्या अफवेने नागरिकांत भीतीचे वातावरण असून आ. ज्योती कलानी यांनी ओटी सेक्शन ते मध्यवर्ती पोलीस ठाणेदरम्यान शांती मोर्चा काढून पोलिसांना कारवाईचे निवेदन दिले. ओटी सेक्शन विभागातील दुकाने बंद ठेवण्यात आली असून, वायुबाधितांनी साडेपाचशेचा आकडा गाठला आहे. अपर जिल्हाधिकारी अशोक सिंगारे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक घेऊन घटनेची माहिती घेतली आहे. वालधुनी नदीपात्रात टँकरद्वारे घातक रासायनिक द्रव सोडल्याने नदीकिनाऱ्याच्या नागरिकांना त्रास झाल्याने शहरात खळबळ उडून हाहाकार उडाला होता. वायुबाधित नागरिकांवर वेळीच उपचार झाल्याने जीवितहानी टळली. टँकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यवर्ती रुग्णालयात रविवारी सकाळी ११पर्यंत ५२७ जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी दिली.वायुबाधितांसाठी एक कक्षच तयार केल्याची माहिती डॉ. अशोक नांदापूरकर यांनी दिली. या वेळी पालिकेचे उपायुक्त देवीदास पवार, उपविभागीय अधिकारी बी.जी. गावडे, तहसीलदार, पोलीस अधिकारी, प्रदूषण मंडळाने नदीत सांडपाणी सोडणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती उप प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे व मनोहर वाकळे यांनी दिली. वायुबाधेच्या निषेधार्थ ओटी सेक्शन परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली. अद्यापही उग्र दर्प येत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मातोश्री रमाबाई आंबेडकर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय संस्थाप्रमुख महादेव सोनावणे यांनी घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.