शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना नजर लोकसभेवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 05:53 IST

नव्या घोषणांची अपेक्षा फोल : जुन्याच योजनांच्या कामगिरीचा मांडला लेखाजोखा

- यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चार महिन्यांसाठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना नवीन योजना जाहीर करण्याऐवजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी साडेचार वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा सादर केला.

आगामी चार महिन्यांसाठीच्या खर्चाची तरतूद करणे हाच मुख्यत्वे आज मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाचा (लेखानुदान) हेतू होता. त्या निमित्ताने मुनगंटीवार नवीन काही योजनांची घोषणा करतील, ही अपेक्षा फोल ठरली. शेतकरी आणि गरिबांचा राज्याच्या तिजोरीवर पहिला आणि शेवटचा हक्क आहे, अशी भावनिक पेरणी मुनगंटीवारांच्या भाषणात होती. ‘देशभरातच वाहू लागले प्रगतीचे वारे, या प्रगतीने जगी तळपला अपुला भारत देश, या वेगाला पुन्हा देवू महाराष्ट्राची साद, हिमालयाला जणू लाभावी सह्याद्रीची साथ’ अशी कविताही त्यांनी सादर केली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची व्याप्ती वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. पण त्याचा उल्लेखही मुनगंटीवार यांच्या भाषणात नव्हता.यापूर्वी मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करीत तेव्हा शिवसेनेकडून फारशी बाके वाजविली जात नसत. आज मात्र चित्र वेगळे होते. सरकारची महत्त्वाची उपलब्धी मुनगंटीवार यांनी नमूद केली की युतीतील दोन्ही पक्षांचे सदस्य त्याचे स्वागत करीत होते.

सिद्धीविनायकाचे दर्शनवित्त मंत्री मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सकाळी सिद्धीविनायकाचे सहकुटुंब दर्शन घेतले. तर ते अर्थसंकल्प सादर करीत असताना त्यांची पत्नी, कन्या आणि होणारे जावई प्रेक्षक दीर्घेत बसून होते. भाजपाच्या खा. प्रीतम मुंडेदेखील आल्या होत्या.

तुमच्या शिक्षकाची भेट झालीमध्यंतरी तुमचे एक शिक्षक मला भेटले. एकच गोष्ट तुम्हाला दोनदोन वेळा समजावून सांगावी लागते असे मला ते सांगत होते. त्यामुळे मी काही आकडेवारीचा पुनरुच्चार करतोय. तसेही तुम्हाला आणखी पाच वर्षे विरोधी बाकावरच बसायचे आहे, असा टोला मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना हाणला. त्यावर सभागृहात हशा पिकला. ‘पुन्हा तीच आकडेवारी सांगताय’ असा चिमटा पाटील यांनी मुनगंटीवार यांना काढला होता.विकासयात्रा अखंडित राखणारशेती-सिंचन, आरोग्य, महिला व बाल विकास या क्षेत्रांसह प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या लोककल्याणकारी उपक्रमांसाठी भरीव तरतूद करुन राज्याची विकासयात्रा अखंडित ठेवण्याचा निर्धार या अर्थसंकल्पात व्यक्त झाला आहे. शेतकरी, मजूर, महिला, बालके आणि वंचित-उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने गेल्या चार वर्षात सुरु केलेल्या लोककल्याणकारी योजना-उपक्रमांसाठी भरीव तरतूद केली गेली आहे. शेती व शेतीपूरक व्यवसाय, उद्योग व रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा, ग्रामविकास, कौशल्य विकास या कार्यक्रमांबरोबरच दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी या अर्थसंकल्पातील तरतुदी सहाय्यभूत ठरणार आहेत.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

भाजप-शिवसेना सरकारने मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प दुष्काळग्रस्तांना नैराश्याच्या खाईत ढकलणारा आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपए आर्थिक मदत देण्याची गरज होती. खरीप २०१८ पर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याची आवश्यकता होती. परंतु, यासंदर्भात सरकारने काहीही घोषणा न केल्याने शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. सरकारच्या कामात जोर नसल्यामुळे अर्थमंत्र्यांना आवाजात उसना जोर आणावा लागला.

- राधाकृष्ण विखे, विरोधीपक्षनेते, विधानसभा

टॅग्स :Maharashtra Budget 2019महाराष्ट्र बजेट 2019