शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
6
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
7
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
8
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
9
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
10
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
11
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
12
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
13
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
14
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
15
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
16
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
17
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
18
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
19
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
20
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   

विदर्भात संततधार

By admin | Updated: July 22, 2014 01:00 IST

विदर्भातील दोन जिल्हे वगळता उर्वरित नऊ जिल्ह्यांमध्ये रविवार रात्रीपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी दिवसभरात काही वेळ उसंत घेऊन पाऊस राहून-राहून बरसत होता.

पर्लकोटा नदीला पूर : भामरागडचा संपर्क तुटलानागपूर : विदर्भातील दोन जिल्हे वगळता उर्वरित नऊ जिल्ह्यांमध्ये रविवार रात्रीपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी दिवसभरात काही वेळ उसंत घेऊन पाऊस राहून-राहून बरसत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला पूर आल्याने ५० गावांचा संपर्क तुटला आहे. अहेरी आगारातून सोडण्यात आलेल्या बसफेऱ्यांनाही फटका बसला. दरम्यान, विदर्भात मान्सून सक्रिय झाल्यामुळे पेरण्यांना जोर आला आहे.अकोला व वाशिम वगळता नागपूर शहरासह ग्रामीण तालुके, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, बुलडाणा आदी जिल्ह्यांमध्ये सर्वत्र सोमवारी दि. २१ जुलै रोजी पाऊस झाला. या पावसामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील ५५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यात २ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन व तुरीसह विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात २७८ मिमीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. शिवाय रविवारी केवळ एका दिवसांत २५ ते ३० मिमी पाऊस झाला आहे. एका वरिष्ठ कृषी अधिकाऱ्याच्या मते, पुढील आठवडाभरात जिल्ह्यातील संपूर्ण पेरणी आटोपण्याची शक्यता आहे. दिवसभर ‘रिपरिप’रविवारी सकाळपासूनच नागपूर व आजूबाजूच्या परिसरात पावसाची रिपरिप सुरू असून सोमवारीदेखील असेच चित्र पाहायला मिळाले. दुपारच्या सुमारास पावसाचा जोरदेखील वाढल्याचे दिसून आले. दिवसभरात शहरात १०.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. वातावरणातील गारवादेखील वाढला होता. दरम्यान, येत्या २४ तासात अशाच प्रकारचे वातावरण राहील व पावसाच्या सरी येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.