शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

अधिवेशनात ‘फ्लोअर मॅनेजमेंट’चे आव्हान; मंत्र्यांना करावा लागेल होमवर्क, नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 06:47 IST

विधिमंडळ अधिवेशनाच्या ४० ते ४५ दिवस आधी आमदारांना  लेखी प्रश्न द्यावे लागतात. त्यानुसार आमदार प्रश्न पाठवतात.

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्याच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळात खातेवाटप आणि खातेबदल झाल्याने अनेक मंत्र्यांची तारांबळ उडणार आहे. 

अधिवेशनात आपल्या खात्यावरील प्रश्नाला मंत्र्यांना उत्तर द्यावे लागते. अनेक मंत्र्यांची खाती बदलल्याने या मंत्र्यांना तयारी करायलाही वेळ मिळणार नाही. त्यामुळे अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मंत्र्यांना कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. त्यातच विरोधकांनी अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी चालविली आहे. 

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे प्रश्न वगळलेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजातून या मंत्र्यांचे प्रश्न वगळण्यात आले आहेत. विधिमंडळ अधिवेशनाच्या ४० ते ४५ दिवस आधी आमदारांना  लेखी प्रश्न द्यावे लागतात. त्यानुसार आमदार प्रश्न पाठवतात. मात्र, अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ,  धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने त्यांचे प्रश्न आता वगळण्यात आले आहेत. तसेच इतर आमदारांच्या  प्रश्न सूचनेबाबत वरील  नावे जोडण्यात आली असतील तर ती वगळण्यात यावीत, असे विधान मंडळाने स्पष्ट केले आहे.

राज्यमंत्र्यांविना मंत्रिमंडळया मंत्रिमंडळात सगळे २९ मंत्री कॅबिनेट आहेत. एकही राज्यमंत्री नाही. कॅबिनेटमंत्री एका सभागृहात बसून दुसऱ्या सभागृहात राज्यमंत्र्यांना पाठवतात. त्यामुळे कोणत्याही सभागृहाचे कामकाज अडत नाही. मात्र, यावेळी कॅबिनेटमंत्र्यांना ही अडचण येऊ शकते. फ्लोअर मॅनेजमेंट करताना सत्तापक्षाची कसरत होऊ शकते.

अधिवेशनात काय होणार?मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्याकडील खाती अधिवेशनापुरती सहकारी मंत्र्यांना वाटून देतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र सगळ्या खात्यांची उत्तरे देतात. कार्यबाहुल्यामुळे शिंदे याहीवेळी काही खाती अधिवेशनात उत्तरे देण्यापुरती सहकाऱ्यांना देण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवन